"मुंबई महापौर काँग्रेसचा, नेत्यांनी केला स्वबळाचा निर्धार; मतभेद विसरून काम करूयात" 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 02:31 PM2021-02-02T14:31:11+5:302021-02-02T14:33:44+5:30

आरएसएसचे लोक राममंदिरसाठी पावती घेऊन घराघरात पोहचत आहेत, आपण मात्र पदयात्रा काढून प्रत्येक घरात घरात जाऊन मुंबईकरांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्या सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले

"Will be Mumbai Mayor of Congress,Says Congress leader Bhai Jagtap, Sanjay Nirupam | "मुंबई महापौर काँग्रेसचा, नेत्यांनी केला स्वबळाचा निर्धार; मतभेद विसरून काम करूयात" 

"मुंबई महापौर काँग्रेसचा, नेत्यांनी केला स्वबळाचा निर्धार; मतभेद विसरून काम करूयात" 

Next
ठळक मुद्देआता रस्त्यावर उतरून काम करण्याची वेळ आलेली आहे.आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर २२७ जागांवर आपण लढणार आहोत, तेव्हा जोमाने कामाला लागातन मन धन लावून आपण सगळे काम करूयात. सर्वांनी मतभेद विसरायची वेळ आली आहे.

मुंबई:  आत्तापासून एक वर्ष मेहनत करा, महानगरपालिकेवर तिरंगा फडकल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचा महापौर किंवा काँग्रेस शिवाय महापौर नाही, असा  ठाम विश्वास मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी नुकताच जोगेश्वरीत व्यक्त केला.
 मुंबईतील प्रत्येक घरात पोहचण्यासाठी लवकरच प्रत्येक वार्डात पदयात्रा काढणार आहे अशी माहिती त्यांनी  जोगेश्वरीतील उत्तर पश्चिम कार्यकर्ता मेळाव्यात दिली.यावेळी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, माजी खासदार संजय निरुपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी आमदार अशोक भाऊ जाधव व बलदेव खोसा, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष कलाइव्ह डायस तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

आरएसएसचे लोक राममंदिरसाठी पावती घेऊन घराघरात पोहचत आहेत, आपण मात्र पदयात्रा काढून प्रत्येक घरात घरात जाऊन मुंबईकरांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्या सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता रस्त्यावर उतरून काम करण्याची वेळ आलेली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर २२७ जागांवर आपण लढणार आहोत, तेव्हा जोमाने कामाला लागा, असा स्वबळाचा पुरुच्चार भाई जगताप त्यांनी या मेळाव्यात केला. 

मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा म्हणाले की देशाची अर्थव्यवस्था डबगाईला पोहचली आहे, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, गॅस सिलेंडर ७०० रुपये झाला, पेट्रोल ९३ रुपये पोहचले, भाजप जातीयवाद, भाषा वाद व प्रांत वाद पसरवतात, काँग्रेस नेहमी सर्व धर्म समभाव विचाराने चालते, सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाते, भेदभाव करत नाही. इस्त्रायल दूतावासात बॉम्बस्फोट झाला, या प्रकरणात दिल्ली पोलिसांचे व गृहमंत्रालयाचे अपयश आहे. गृहमंत्री अमित शहाचे अपयश असून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी चरणसिंग सप्रा यांनी यावेळी केली.  
   
माजी खासदार संजय निरुपम म्हणाले की, मनपा निवडणूक समोर आहे, काँग्रेसचे रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक निवडून आले पाहिजेत. आपण भाई जगताप आणि चरणसिंग सप्रा या दोघांच्या सोबत आहे. तन मन धन लावून आपण सगळे काम करूयात. सर्वांनी मतभेद विसरायची वेळ आली आहे. मुंबईत आजही काँग्रेस सर्वात मोठी पार्टी आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Web Title: "Will be Mumbai Mayor of Congress,Says Congress leader Bhai Jagtap, Sanjay Nirupam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.