शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

Anvay Naik: हिशेब होईल, तो ही व्याजासकट; अर्णब गोस्वामीप्रकरणी नितेश राणेंचा सरकारला इशारा 

By हेमंत बावकर | Updated: November 4, 2020 15:14 IST

Arnab Goswami arrest: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी रायगडपोलिसांनी अटक केली. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे.

मुंबई : अलिबागचे इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचेअर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. यावरून देशभरात राजकीय वातावरण तापू लागले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीदेखील ट्विट करत लोकशाहीचा गळा घोटल्याचे म्हटले आहे. तर शिवसेनेचे कट्टर विरोधक आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. 

सत्ता आज आहे, उद्या नाही. आज तुमची आहे, उद्या आमची असेल. फक्त एवढे लक्षात ठेवा, हिशेब तर होणार, तेही व्य़ाज लावून, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. 

यावर नारायण राणे यांनीदेखील टीका केली आहे. राज्‍यात बलात्‍कारी, खुनी, अतिरेकी यांच्‍यावर कारवाई नाही. एकदा चौकशी दप्‍तरी दाखल झालेल्‍या प्रकरणात अर्णब गोस्‍वामी यांना अटक का? सरकारने सूडबुध्‍दीने ही कारवाई केली असून अर्णब गोस्‍वामी आणि कंगना राणौत यांना देण्‍यात आलेल्‍या वागणुकीचा मी निषेध करतो. या सरकारला जनहितासाठी राज्‍य चालविण्‍यात संपूर्ण अपयश आले असून अधिकाराचा स्‍वार्थी दुरुपयोग केला जात आहे. कायद्याची जाण आणि अंमलबजावणी करण्‍याची क्षमता ज्‍यांच्‍यामध्‍ये नाही त्यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्‍यांना बदनाम करु नये, अशी टीका केली आहे. 

तसेच नितेश राणे यांनी म्हटले की, नाईक कुटुंबाला न्याय मिळायलाच हवा. परंतू शिवसेना 2014 पासून सत्ते नव्हती का? त्यांच्याकडे तेव्हा गृह राज्यमंत्री पद होते. तेव्हा का नाही एकाही शिवसेनेच्या आमदाराने विधानसभेत न्यायासाठी आवाज उठविला? जर सुशांत आणि दिशाची मृत्यू झालाच नसता तर आजचा हा तमाशा देखील झाला नसता, असे आरोप केले आहेत. 

अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीने पैसे थकवल्यानेच पतीची आत्महत्या; अन्वय नाईक यांच्या पत्नीचा गंभीर आरोपरिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी रायगडपोलिसांनी अटक केली. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात आता, 'अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीने पैसे थकवल्यानेच आपल्या पतीने आत्महत्या केली. अन्यथा माझा पती आज जिवंत असला असता, असा गंभीर आरोप अन्वय यांच्या पत्नीने केला आहे.' त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांची मुलगीही त्यांच्यासोबत होती.

अन्वय यांच्या मुलीने सांगितले, की संबंधित लोकांनी आपल्या पतीचे 83 लाख रुपये थकवल्याचे सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी न्याय देणे अपेक्षित होते. आम्हाला राजकारणात पडायचे नाही. आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही याआधी सर्वाना विनंती केली, तपास अधिकाऱ्यांनी दबाब आणला. आज झालेली अटक आधीच होणे गरजेचे होते. वडिलांनी रिपब्लिकचे टिव्हीचे अर्णब गोस्वामी, आयकास्ट एक्सचे फिरोज शेख आणि नितीन सार्डा या 3 जणांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिले होती. हा वडिलांचा शेवटचा प्रोजेक्ट होता.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे arnab goswamiअर्णब गोस्वामीNarayan Raneनारायण राणे PoliceपोलिसRepublic TVरिपब्लिक टीव्ही