शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

"गांधी कुटुंबाने काँग्रेस सोडावी; मोदी, शहा, नड्डा सेल्फमेड नेते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 10:41 IST

Ramachandra Guha Over BJP And Congress : सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत कारण त्यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे असं गुहा यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या एका लेखामध्ये गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी असं परखड मत व्यक्त केलं आहे. गुहा यांनी आपल्या लेखामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस कधीच भाजपाला पर्याय म्हणून पुढे येऊ शकत नाही असंही म्हटलं आहे. तसेच रामचंद्र गुहा यांनी आपल्या या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा देखील उल्लेख केला आहे. भाजपाचे हे तिन्ही प्रमुख नेते एकमेकांशी वैचारिक पातळीवर जोडलेले आहेत. तसेच या तिघांनाही राजकारण हे वारसा म्हणून मिळालेलं नाही.

मोदी, शहा आणि नड्डा या तिघांमध्येही हिंदुत्वावर आधारित राजकारण पुढे घेऊन जाण्याची ताकद असून सध्या ते तेच करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती उलट असून तिथे तिन्ही मोठे नेते वैचारिक पातळीवर एकमेकांशी जोडलेले दिसत नाहीत. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत कारण त्यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे असं गुहा यांनी म्हटलं आहे. गांधींनी आता जाणं गरजेचे का आहे? असा एक लेख गुहा यांनी लिहिला आहे. या लेखात त्यांनी आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे. 

"मोदी, शहा आणि नड्डांमध्येही हिंदुत्वावर आधारित राजकारण पुढे नेण्याची ताकद"

गुहा यांनी राहुल गांधी हे राजकारणासंदर्भात किती गंभीर आहेत हे सांगताना बिहार निवडणुकीचे उदाहरण दिलं आहे. निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये राहुल गांधी सुट्ट्यांसाठी निघून गेले होते असं म्हटलं आहे. राहुल यांच्या या दौऱ्याचा उल्लेख राष्ट्रीय जनता दलाच्या एका नेत्याही केल्याची आठवण गुहा यांनी करुन दिली. तसेच गुहा यांनी याच बाबतीत भाजपाचं कौतुक केलं आहे. काँग्रेसच्या उलट भाजपाने निवडणूक जिंकल्यानंतर लगेच अध्यक्ष असणारे जे. पी. नड्डा हे अशा ठिकाणी दौरा करण्याची घोषणा केली जिथे पक्षाने वाईट कामगिरी केली आहे असं आपल्या लेखात म्हटलं आहे. 

"भाजपा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या विचारसरणीमध्ये मोठा फरक"

भाजपा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या विचारसरणीमध्ये मोठा फरक आहे. काँग्रेसचे जेवढे टीकाकार आहेत त्याहून अधिक भाजपाचे आहेत मोदी सरकारच्या धोरणांचे विश्लेषण केले आहे. मी ज्या काँग्रेसचा समर्थक होतो ती महात्मा गांधीची काँग्रेस आहे. त्या काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवू देत देशामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या मुल्यांची जोपासना करण्याला प्राधान्य दिलं होतं. मात्र आज काँग्रेस स्वत:ला स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणवते आणि दुसरीकडे मवाळ हिंदुत्वाचे धोरण अवलंबताना दिसत आहे असं गुहा यांनी म्हटलं आहे.

"सेल्फमेड नेते, भाजपाचे हे तिन्ही प्रमुख नेते एकमेकांशी वैचारिक पातळीवर जोडलेले"  

काँग्रेस एकीकडे आपण उदारमतवादी असल्याचे सांगत त्याचे श्रेय घेते. तर दुसऱ्या दिवशी ते उद्योजकांना विरोध करताना दिसतात असं गुहा यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि भाजपाच्या नेतृत्वामध्ये तीन मुद्द्यांवरुन खूप मोठा फरक लक्षात येतो असं गुहा यांनी लेखात म्हटलं आहे. भाजपाचे नेतृत्व हे सेल्फ मेड म्हणजेच स्वत: घडवलेलं नेतृत्व आहे. ते वैचारिक स्तरावर एका पातळीवर आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते कोणत्याही मोठ्या कुटुंबातून आलेले नाहीत असं म्हटलं आहे.

"विरोधी पक्षांना एकत्र घेऊन आघाडी स्थापन करुन कणखर पर्याय निर्माण केला पाहिजे"

पुढच्या लोकसभा निवडणुकींसाठी अजूनही तीन वर्षे बाकी आहेत. या कालावधीमध्ये काँग्रेसने स्वत:ला पुन्हा उभं केलं पाहिजे. भविष्यातील नेतृत्व पक्षबांधणीच्या माध्यमातून समोर आणलं पाहिजे. इतर विरोधी पक्षांना एकत्र घेऊन आघाडी स्थापन करुन कणखर पर्याय निर्माण केला पाहिजे असं गुहा यांनी म्हटलं आहे. गुहा यांनी आपल्या लेखात स्पष्टपणे गांधी कुटुंबाने केवळ काँग्रेसच्या प्रमुख नेतृत्वावरुनच नाही तर पक्षापासूनच दूर जाण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबते वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Ramchandra Guhaरामचंद्र गुहाcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाSonia Gandhiसोनिया गांधी