शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
2
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
3
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं करण कळताच पती हादरला!
4
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
5
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
6
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
7
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
8
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
9
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
10
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
11
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
12
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
13
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
14
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
15
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
16
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
17
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
18
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
19
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
20
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 17:09 IST

Prithviraj Chavan: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलेल्या काँग्रेसचे नेते अजूनही राज्यभर मुद्दे घेऊन भूमिका मांडताना दिसत नाहीये, असा एक सूर लोकांमधून लावला जात आहे. याबद्दलच्या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

Prithviraj Chavan Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसला लोकसभेला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं. पण, विधानसभेची निवडणूक लागली तरी काँग्रेसचे नेते मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाताना दिसत नसल्याचे चित्र आहे. याचबद्दल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडताना काँग्रेसकडून होत असलेल्या चुकीवर बोट ठेवलं.   

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लोकमत'ला विशेष मुलाखत दिली. लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव आणि लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली. 

काँग्रेसचे जे नेते आहेत, विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहेत. बाळासाहेब थोरात जेष्ठ नेते आहेत. हे लोकं हे विषय का बोलत नाहीत? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांना विचारण्यात आला. 

काँग्रेसची रणनीती कुठे फसतेय? पृथ्वीराज चव्हाणांनी मांडला मुद्दा

प्रश्नाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "ते बोलताहेत की नाही, मी बघितलं नाही. काय झालं की, काही जणांनी निवडणुकीच सूत्रसंचलन करण्यासाठी मुंबईला राहिले पाहिजे. नागपूरला बसून राहिले पाहिजे. आणि संपूर्ण भागाचं सूत्रसंचलन केलं पाहिजे. पण, सगळेच उभे राहिले की, इथे कुणीच नसतं. आणि ही चूक जी आहे, ती मध्य प्रदेशमध्ये झाली, आमच्या काँग्रेस पक्षाची. राजस्थानमध्ये झाली. हरयाणामध्ये झाली आणि आता इथेही (महाराष्ट्र) होतेय", असे स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले. 

"आता समजा तुम्हाला एकाला मुख्यमंत्री करायचे... त्याला कानात सांगा ना. तू मुख्यमंत्री आहे, तू उभं राहायचं नाही. तू प्रचार कर", अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना मांडली. 

हरयाणासारखंच महाराष्ट्रात होईल का? पृथ्वीराज चव्हाणांचा अंदाज काय?

हरयाणातील पराभवाच्या मुद्द्यावर ते म्हणाले, "त्याचं विश्लेषण पक्ष करतोय. समिती नेमली आहे. त्यामध्ये चुका नक्की झाल्या. मी पण हरयाणाचा प्रभारी होतो, एका निवडणुकीमध्ये. कदाचित जाट मते एका बाजूला झाली आणि त्याच्याविरोधात विना जाट गट झाला." 

हरयाणात आपसातील मतभेदांमुळे पराभव झाला, अस बोललं जातंय. महाराष्ट्रात असं होणार नाही, म्हणून काँग्रेसनं काय केलं पाहिजे. यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "महाराष्ट्रात असं होणार नाही. कारण तिथं आमच्या एक दलित नेत्या आणि जाट नेते होते, त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला असं चित्र समोर आलं. खरं खोटं मला माहिती नाही."

"महाराष्ट्रात भाजपाकडून ओबीसी-मराठा हा वाद निर्माण केला गेला आहे. हिंदू दलित आणि बौद्ध दलित हा वाद निर्माण केला गेला आहे. आणि यातून मग एखादा पक्ष आपल्याबरोबर येईल, अशी कल्पना आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं अतोनात नुकसान होतंय", असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा