शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ काय, घरी पाणी भराही म्हणतील, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 14:09 IST

: देशात लोकशाही आहे, हसन मुश्रीफ उद्या त्यांच्या घरात येवून पाणी भरा अशीही मागणी करू शकतात. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना शनिवारी टोला लगावला.

ठळक मुद्देमुश्रीफ काय, घरी पाणी भराही म्हणतील, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा टोला माफी मागण्याचा विषय

कोल्हापूर : देशात लोकशाही आहे, हसन मुश्रीफ उद्या त्यांच्या घरात येवून पाणी भरा अशीही मागणी करू शकतात. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना शनिवारी टोला लगावला.मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पश्चिम बंगालमधील निकालानंतर टीका केली. त्यावर पाटील यांनी भुजबळ यांचा तिखट शब्दात समाचार घेतला. मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेवून पाटील यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.आमदार पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या गायकवाड अहवालाचे इंग्रजी भाषांतर करताना काही चुका झाल्यात का हे देखील स्पष्ट व्हायला हवे. याबाबत मी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजूनही मराठा आरक्षणाचा चेंडू राज्य सरकारच्याच कोर्टात आहे हे लक्षात घेवून राज्य सरकारने कार्यवाही करण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण चांगल्या पध्दतीने काम करू शकू असे वाटल्याने त्यांनी पहिल्यांदा सारथी आणि नंतर आण्णासाहेब पाटील महामंडळ आपल्या नियोजन विभागातंर्गत घेतले आहे. आता बघू ते काय करतात ते.गडकरींना जमले ते शासनाला का नाहीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बंद पडलेल्या औषध कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठबळ दिले आणि तेथून आता ३० हजार रेमडेसिविर इंजक्शन्सचे उत्पादन सुरू झाले. जे गडकरींना जमते ते राज्य शासनाला का जमत नाही असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.गायकवाडना एकदा तरी बोलावले काआम्ही नेमलेल्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम. जी गायकवाड यांनी याकामी इतके झोकून देवून काम केले की त्यांच्या डोळ्याची पापणी पॅरालाईज झाली. माझा एक अधिकारी त्यांना रोज रूग्णालयात नेवून आणत असे. तिथे उपचार झाले की पुन्हा ते कार्यालयात येवून काम करत होते. इतके योगदान देणाऱ्या गायकवाड यांना एकदाही चर्चेसाठी बोलवावे असे गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना का वाटलं नाही अशीही विचारणा पाटील यांनी केली.

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर