शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal election: "भाजप युपीतून टिळा लावलेले गुंड बोलवतायत, मोदींसारखी खोटी व्यक्ती पाहिली नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 18:24 IST

विष्णूपूरमध्ये ममता बॅनर्जींचा हल्लाबोल, उत्तर प्रदेशातून पान मसाला खाणारे गुंड बोलावले जात आहे, ममता बॅनर्जींची टीका

ठळक मुद्देविष्णूपूरमध्ये ममता बॅनर्जींचा हल्लाबोलउत्तर प्रदेशातून पान मसाला खाणारे गुंड बोलावले जात आहे, ममता बॅनर्जींची टीका

पुढील काही दिवसांत पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. एकीकडे तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये आपला गड राखण्याचे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपही आपली ताकद वाढवण्याच्या तयारीत आहे. सध्या दोन्ही बाजूनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अशातच पश्चिम बंगालमध्ये आलेल्या पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. तसंच ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत तृणमूलच्या कार्यकर्त्यांना गुंड म्हटलं होतं. आता ममता बॅनर्जी यांनी पलटवार करत भाजप उत्तर प्रदेशातून गुंड मागवत असल्याचं म्हणत जोरदार निशाणा साधला. ममता बॅनर्जी यांनी विष्णूपूर येथील रॅलीत जनतेला संबोधित केलं. "पान मसाला खाणारे आणि टिळा लावणाऱ्या लोकांना उत्तर प्रदेश सारख्या राज्यातून निवडणुकीपूर्वी समस्या निर्माण करण्यासाठी पाठवलं गेलं. ते आमच्यासाठी बाहेरील गुंड आहेत. आम्ही अनेक वर्षांपासून बंगालमध्ये राहत आहोत आम्ही अन्य राज्यातील लोकांवर बाहेरचे असण्याचा ठपका लावत नाही," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

मोदींचा सन्मान करत होते, पण....ममता बॅनर्जी यांनी बुधवारी रॅलीदरम्यान बोलताना पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना खोटी व्यक्ती म्हटलं. तसंच भाजप बाहेरील राज्यातून गुंड आणत असल्याचा आरोपही केला. "यापूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करत होते. परंतु ते असे असतील हे माहित नव्हतं.  मी पंतप्रधान मोदींसारखी खोटी व्यक्ती पाहिली नाही. नरेंद्र मोदी खोटं बोलतात हे म्हणतानाही आपल्याला खेद वाटत आहे. कोण गुंड आहेत? आज उत्तर प्रदेशात भाजपच्या त्रासामुळे आयपीएस अधिकारी आपली नोकरी सोडत आहेत," असंही त्या म्हणाल्या.मोदी, शाह, अदानी लुटणारभाजप पश्चिम बंगालची संस्कृती नष्ट करण्यासाठी उत्तर प्रदेशातून गुंज आणत आहे, असा आरोपही बॅनर्जी यांनी यावेळी केला. शेतकरी मोठ्या कालावधीपासून सस्त्यावर आहे. हे मोदी, अमित शाह आणि अदानी या तीन सिंडीकेट्समुळे आहे. अदानी सर्व पैसा आणि उत्पादन लुटतील. केवळ अदानी, मोदी आणि शाहंनाचं खाणं मिळेल आणि बाकी जनता रडत राहिल, असंही त्या म्हणाल्या. "पंतप्रधान मोदींनी सर्वांना १५ लाख रूपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु त्यांनी कोणाला काही दिलं? तर आता १५ लाख रूपये नाही तर भाजपला मतही नाही. भाजपनं सांगितलं मुलींना शिकवा, मुलींना वाचवा, परंतु ते एकही रूपया खर्च करत नाही. आमचं सरकार सर्व मुलींना १००० ते २५०० रूपये शिष्यवृत्ती देत आहे," असंही ममता बॅनर्जींनी यावेळी नमूद केलं. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीChief Ministerमुख्यमंत्रीNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानUttar Pradeshउत्तर प्रदेश