शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

West Bengal election: "भाजप युपीतून टिळा लावलेले गुंड बोलवतायत, मोदींसारखी खोटी व्यक्ती पाहिली नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 18:24 IST

विष्णूपूरमध्ये ममता बॅनर्जींचा हल्लाबोल, उत्तर प्रदेशातून पान मसाला खाणारे गुंड बोलावले जात आहे, ममता बॅनर्जींची टीका

ठळक मुद्देविष्णूपूरमध्ये ममता बॅनर्जींचा हल्लाबोलउत्तर प्रदेशातून पान मसाला खाणारे गुंड बोलावले जात आहे, ममता बॅनर्जींची टीका

पुढील काही दिवसांत पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. एकीकडे तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये आपला गड राखण्याचे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपही आपली ताकद वाढवण्याच्या तयारीत आहे. सध्या दोन्ही बाजूनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अशातच पश्चिम बंगालमध्ये आलेल्या पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. तसंच ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत तृणमूलच्या कार्यकर्त्यांना गुंड म्हटलं होतं. आता ममता बॅनर्जी यांनी पलटवार करत भाजप उत्तर प्रदेशातून गुंड मागवत असल्याचं म्हणत जोरदार निशाणा साधला. ममता बॅनर्जी यांनी विष्णूपूर येथील रॅलीत जनतेला संबोधित केलं. "पान मसाला खाणारे आणि टिळा लावणाऱ्या लोकांना उत्तर प्रदेश सारख्या राज्यातून निवडणुकीपूर्वी समस्या निर्माण करण्यासाठी पाठवलं गेलं. ते आमच्यासाठी बाहेरील गुंड आहेत. आम्ही अनेक वर्षांपासून बंगालमध्ये राहत आहोत आम्ही अन्य राज्यातील लोकांवर बाहेरचे असण्याचा ठपका लावत नाही," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

मोदींचा सन्मान करत होते, पण....ममता बॅनर्जी यांनी बुधवारी रॅलीदरम्यान बोलताना पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना खोटी व्यक्ती म्हटलं. तसंच भाजप बाहेरील राज्यातून गुंड आणत असल्याचा आरोपही केला. "यापूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करत होते. परंतु ते असे असतील हे माहित नव्हतं.  मी पंतप्रधान मोदींसारखी खोटी व्यक्ती पाहिली नाही. नरेंद्र मोदी खोटं बोलतात हे म्हणतानाही आपल्याला खेद वाटत आहे. कोण गुंड आहेत? आज उत्तर प्रदेशात भाजपच्या त्रासामुळे आयपीएस अधिकारी आपली नोकरी सोडत आहेत," असंही त्या म्हणाल्या.मोदी, शाह, अदानी लुटणारभाजप पश्चिम बंगालची संस्कृती नष्ट करण्यासाठी उत्तर प्रदेशातून गुंज आणत आहे, असा आरोपही बॅनर्जी यांनी यावेळी केला. शेतकरी मोठ्या कालावधीपासून सस्त्यावर आहे. हे मोदी, अमित शाह आणि अदानी या तीन सिंडीकेट्समुळे आहे. अदानी सर्व पैसा आणि उत्पादन लुटतील. केवळ अदानी, मोदी आणि शाहंनाचं खाणं मिळेल आणि बाकी जनता रडत राहिल, असंही त्या म्हणाल्या. "पंतप्रधान मोदींनी सर्वांना १५ लाख रूपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु त्यांनी कोणाला काही दिलं? तर आता १५ लाख रूपये नाही तर भाजपला मतही नाही. भाजपनं सांगितलं मुलींना शिकवा, मुलींना वाचवा, परंतु ते एकही रूपया खर्च करत नाही. आमचं सरकार सर्व मुलींना १००० ते २५०० रूपये शिष्यवृत्ती देत आहे," असंही ममता बॅनर्जींनी यावेळी नमूद केलं. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीChief Ministerमुख्यमंत्रीNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानUttar Pradeshउत्तर प्रदेश