शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

निवडणूक संपता-संपता ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम', बंगलामध्ये दिसला अमित शाहंचा रुद्रावतार

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 11, 2021 14:38 IST

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. बंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? (West Bengal cooch behar home minister Amit Shah)

ठळक मुद्देममता बॅनर्जींना गुंडं लोक निवडणूक जिंकूण देतात. त्यांच्या 'दंगा प्रमुखां'सोबत भाजपचे 'ब्लॉक प्रमुख' लढतील आणि जिंकतीलही - शाहबंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? - शाहबंगालच्या जनतेने परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे, असेही शाह म्हणाले.

कोलकाता - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) आज पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या (West Bengal) रणांगणात उतरले. "यावेळी बंगालमधील निवडणूक ऐतिहासिक होईल. ममता बॅनर्जींना गुंडं लोक निवडणूक जिंकूण देतात. त्यांच्या 'दंगा प्रमुखां'सोबत भाजपचे 'ब्लॉक प्रमुख' लढतील आणि जिंकतीलही," अशा शब्दात शाह यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. ते कूचबिहारमध्ये (cooch behar) रॅलीला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी जनतेला भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. (West Bengal cooch behar home minister Amit Shah in Poriborton yatra)

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. बंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? निवडणूक संपता-संपता ममता बॅनर्जी देखील जय श्रीराम म्हणायला लागतील. ममता बॅनर्जी केवळ एका समाजाची मते घेण्यासाठीच असे करतात. यावेळी ते म्हणाले हिंदुस्तानात प्रत्येक धर्माचा आदर होईल. 

समाजात दुही पाडण्यासाठी रथयात्रेचा भाजपकडून वापर; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

यावेळी, भाजपचे सरकार आल्यास एका आठवड्याच्या आत बंगालमध्ये आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात येईल, अशी घोषणा अमित शाह यांनी केली. ममता आणि त्यांचा भाचा मे महिन्यानंतर बंगालमध्ये केंद्राच्या योजना लागू करण्यापासून रोखू शकणार नाहीत. एवढेच नाही, तर भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जाईल, असेही शाह म्हणाले.

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, येथील विकासासाठी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने काही केले नाही. भाजप सरकार, मोदींचे सूत्र 'सबका साथ-सबका विकास', या मार्गाने चालत आहे. आम्ही सर्व समाजांची संस्कृती, भाषा, संगीत आणि साहित्य पुढे घेऊन जाणारे लोक आहोत. यामुळेच हळू-हळू संपूर्ण देश मोदींच्या नेतृत्वात भाजपशी जोडला जात आहे. यावेळी, ममता दीदी, ही लढाई आपण जिंकू शकणार नाही. कारण बंगालच्या जनतेने परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे, असेही शाह म्हणाले.

व्हायरल झालं ममता बॅनर्जींचं 'हंबा-हंबा, रंबा-रंबा, कांबा-कांबा'; पाहा का म्हणाल्या त्या असं 

टॅग्स :Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगाल