शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

निवडणूक संपता-संपता ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम', बंगलामध्ये दिसला अमित शाहंचा रुद्रावतार

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 11, 2021 14:38 IST

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. बंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? (West Bengal cooch behar home minister Amit Shah)

ठळक मुद्देममता बॅनर्जींना गुंडं लोक निवडणूक जिंकूण देतात. त्यांच्या 'दंगा प्रमुखां'सोबत भाजपचे 'ब्लॉक प्रमुख' लढतील आणि जिंकतीलही - शाहबंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? - शाहबंगालच्या जनतेने परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे, असेही शाह म्हणाले.

कोलकाता - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) आज पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या (West Bengal) रणांगणात उतरले. "यावेळी बंगालमधील निवडणूक ऐतिहासिक होईल. ममता बॅनर्जींना गुंडं लोक निवडणूक जिंकूण देतात. त्यांच्या 'दंगा प्रमुखां'सोबत भाजपचे 'ब्लॉक प्रमुख' लढतील आणि जिंकतीलही," अशा शब्दात शाह यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. ते कूचबिहारमध्ये (cooch behar) रॅलीला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी जनतेला भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. (West Bengal cooch behar home minister Amit Shah in Poriborton yatra)

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. बंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? निवडणूक संपता-संपता ममता बॅनर्जी देखील जय श्रीराम म्हणायला लागतील. ममता बॅनर्जी केवळ एका समाजाची मते घेण्यासाठीच असे करतात. यावेळी ते म्हणाले हिंदुस्तानात प्रत्येक धर्माचा आदर होईल. 

समाजात दुही पाडण्यासाठी रथयात्रेचा भाजपकडून वापर; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

यावेळी, भाजपचे सरकार आल्यास एका आठवड्याच्या आत बंगालमध्ये आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात येईल, अशी घोषणा अमित शाह यांनी केली. ममता आणि त्यांचा भाचा मे महिन्यानंतर बंगालमध्ये केंद्राच्या योजना लागू करण्यापासून रोखू शकणार नाहीत. एवढेच नाही, तर भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जाईल, असेही शाह म्हणाले.

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, येथील विकासासाठी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने काही केले नाही. भाजप सरकार, मोदींचे सूत्र 'सबका साथ-सबका विकास', या मार्गाने चालत आहे. आम्ही सर्व समाजांची संस्कृती, भाषा, संगीत आणि साहित्य पुढे घेऊन जाणारे लोक आहोत. यामुळेच हळू-हळू संपूर्ण देश मोदींच्या नेतृत्वात भाजपशी जोडला जात आहे. यावेळी, ममता दीदी, ही लढाई आपण जिंकू शकणार नाही. कारण बंगालच्या जनतेने परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे, असेही शाह म्हणाले.

व्हायरल झालं ममता बॅनर्जींचं 'हंबा-हंबा, रंबा-रंबा, कांबा-कांबा'; पाहा का म्हणाल्या त्या असं 

टॅग्स :Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगाल