शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे-पवार-यादव महाआघाडी?; मुंबई मनपा अन् उत्तर प्रदेश विधानसभेसाठी नवा राजकीय प्रयोग

By प्रविण मरगळे | Updated: January 20, 2021 11:06 IST

भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी शरद पवारांनी घ्यावी असं दिल्लीतील राजकीय नेते बोलत असतात. पण अद्याप या प्रयत्नांना यश आलं नाही

ठळक मुद्देएकीकडे २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांची जंगी तयारी राजकीय पक्षांनी आतापासून सुरू केली आहे.काँग्रेसने आजतागायत अनेकदा मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं सांगितले आहे.उत्तर भारतीय आता समजूतदार झाला आहे त्यामुळे तो भाजपाच्या प्रभावाखाली येणार नाही.

मुंबई – मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली, मुख्यमंत्रिपदावरून भाजपासोबत बिनसल्याने शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेला केंद्रातील सत्तेचा वाटा सोडावा लागला, एनडीएतून बाहेर पडत शिवसेनेच्या केंद्रीय मंत्र्यांने राजीनामा दिला. राज्यात झालेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग देशात होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात नेहमी असते.

भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी शरद पवारांनी घ्यावी असं दिल्लीतील राजकीय नेते बोलत असतात. पण अद्याप या प्रयत्नांना यश आलं नाही. त्यातच सपा नेते रामचरित्र निषाद यांनी मुंबई महापालिका आणि येणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी एका नवीन राजकीय प्रयोगासाठी प्रयत्न केला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

एकीकडे २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांची जंगी तयारी राजकीय पक्षांनी आतापासून सुरू केली आहे. भाजपाने यंदा कोणत्याही परिस्थितीत मुंबईची सत्ता ताब्यात घ्यायची असा चंग बांधला आहे. तर गेल्या २५ वर्षापासून महापालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेने गड कायम राखण्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. अद्याप मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का यावर प्रश्नचिन्ह आहे, कारण काँग्रेसने आजतागायत अनेकदा मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं सांगितले आहे. इतकचं नाही तर काँग्रेसकडून सातत्याने पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर विविध आरोप करण्यात येत आहेत.

रामचरित्र निषाद हे भाजपाचे मछली शहराचे खासदार होते, मात्र मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाने त्यांचे तिकीट कापल्याने नाराज होत निषाद यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. निषाद यांनी याबाबत सांगितले की, उत्तर भारतीय आता समजूतदार झाला आहे त्यामुळे तो भाजपाच्या प्रभावाखाली येणार नाही. आगामी काळात उत्तर भारतीय समाज त्याच आघाडीसोबत जाणार ज्याठिकाणी त्याची चिंता होईल, त्याला सुरक्षा मिळेल असं ते म्हणाले.

रामचरित्र निषाद यांनी याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला समाजवादी पक्षाचा पाठिंबा आहे. सपाचे आमदार अबु आझमी हेदेखील सरकारमधील वाटेकरी आहेत. त्यामुळे २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत समाजवादी पक्ष पूर्ण ताकदीनं उतरणार आहे. यात महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी सपाने केली आहे. रामचरित्र निषाद यांचे तिकीट भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समर्थक असल्यानं कापलं होतं, त्यानंतर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात निषाद यांनी प्रवेश केला होता

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारAkhilesh Yadavअखिलेश यादवMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकNitin Gadkariनितीन गडकरी