शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ठाकरे-पवार-यादव महाआघाडी?; मुंबई मनपा अन् उत्तर प्रदेश विधानसभेसाठी नवा राजकीय प्रयोग

By प्रविण मरगळे | Updated: January 20, 2021 11:06 IST

भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी शरद पवारांनी घ्यावी असं दिल्लीतील राजकीय नेते बोलत असतात. पण अद्याप या प्रयत्नांना यश आलं नाही

ठळक मुद्देएकीकडे २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांची जंगी तयारी राजकीय पक्षांनी आतापासून सुरू केली आहे.काँग्रेसने आजतागायत अनेकदा मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं सांगितले आहे.उत्तर भारतीय आता समजूतदार झाला आहे त्यामुळे तो भाजपाच्या प्रभावाखाली येणार नाही.

मुंबई – मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली, मुख्यमंत्रिपदावरून भाजपासोबत बिनसल्याने शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेला केंद्रातील सत्तेचा वाटा सोडावा लागला, एनडीएतून बाहेर पडत शिवसेनेच्या केंद्रीय मंत्र्यांने राजीनामा दिला. राज्यात झालेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग देशात होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात नेहमी असते.

भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी शरद पवारांनी घ्यावी असं दिल्लीतील राजकीय नेते बोलत असतात. पण अद्याप या प्रयत्नांना यश आलं नाही. त्यातच सपा नेते रामचरित्र निषाद यांनी मुंबई महापालिका आणि येणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी एका नवीन राजकीय प्रयोगासाठी प्रयत्न केला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

एकीकडे २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांची जंगी तयारी राजकीय पक्षांनी आतापासून सुरू केली आहे. भाजपाने यंदा कोणत्याही परिस्थितीत मुंबईची सत्ता ताब्यात घ्यायची असा चंग बांधला आहे. तर गेल्या २५ वर्षापासून महापालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेने गड कायम राखण्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. अद्याप मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का यावर प्रश्नचिन्ह आहे, कारण काँग्रेसने आजतागायत अनेकदा मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं सांगितले आहे. इतकचं नाही तर काँग्रेसकडून सातत्याने पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर विविध आरोप करण्यात येत आहेत.

रामचरित्र निषाद हे भाजपाचे मछली शहराचे खासदार होते, मात्र मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाने त्यांचे तिकीट कापल्याने नाराज होत निषाद यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. निषाद यांनी याबाबत सांगितले की, उत्तर भारतीय आता समजूतदार झाला आहे त्यामुळे तो भाजपाच्या प्रभावाखाली येणार नाही. आगामी काळात उत्तर भारतीय समाज त्याच आघाडीसोबत जाणार ज्याठिकाणी त्याची चिंता होईल, त्याला सुरक्षा मिळेल असं ते म्हणाले.

रामचरित्र निषाद यांनी याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला समाजवादी पक्षाचा पाठिंबा आहे. सपाचे आमदार अबु आझमी हेदेखील सरकारमधील वाटेकरी आहेत. त्यामुळे २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत समाजवादी पक्ष पूर्ण ताकदीनं उतरणार आहे. यात महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी सपाने केली आहे. रामचरित्र निषाद यांचे तिकीट भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समर्थक असल्यानं कापलं होतं, त्यानंतर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात निषाद यांनी प्रवेश केला होता

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारAkhilesh Yadavअखिलेश यादवMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकNitin Gadkariनितीन गडकरी