शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुत्वाची खरी शिकवण नागपूरला जाऊन घ्यावी, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 12:04 IST

Ashish Shelar : शिवसेना सध्या अमिबालाही लाज वाटेल, अशा भूमिका घेत असल्याची टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.

ठळक मुद्देमुंबईतून शरजीलला पळून जाण्यास कुणी मदत केली, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आशिष शेलार म्हणाले. 

मुंबई : हिंदुत्वाची खरी शिकवण मिळते ती नागपूरच्या कार्यालयात, आपण याआधी सतत भेटलो आहोत. आताही त्याठिकाणी जाऊन यावे, असा टोला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

दरम्यान, एकीकडे हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपाकडे नाही. देशातील सद्य:स्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते. जनता पर्याय शोधू लागते, तेव्हा तो निर्माणही होतो, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले होते. यावर प्रतिक्रिया देताना भाजपाला बाजूला ठेवायच्या कुहेतूचा पर्याय म्हणून दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन जे सत्तेत आले, त्यांना हे बोलणे शोभत नाही, असे आशिष शेलार म्हणाले.

याचबरोबर, एल्गार परिषदेत काही ना काही गडबड होते व धार्मिक भावना दुखावल्या जातात, अशी पार्श्वभूमी असतानाही परवानगी का दिली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यापर्यंत आणि मुंबईतून शरजीलला पळून जाण्यास कुणी मदत केली, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आशिष शेलार म्हणाले. 

याशिवाय, शिवसेनेची कृषी कायद्यावरून राज्यसभेत एक भूमिका, लोकसभेत वेगळी भूमिका, आझाद मैदानात आणि आघाडीच्या बैठकीतही वेगवेगळी भूमिका आहे. शिवसेना सध्या अमिबालाही लाज वाटेल, अशा भूमिका घेत असल्याची टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?"मी अयोध्येला गेलो तेव्हाच स्पष्ट केले होते, की भाजपापासून दूर गेलो आहे, हिंदुत्वापासून नाही. हिंदुत्वाचे ‘पेटंट’ भाजपाने घेतलेले नाही; पण शिवसेना महाराष्ट्रापुरती राहिल्याने दरम्यानच्या काळात हिंदुत्वाचा पर्याय उभा करण्याबाबत देशात एक पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्याची गरज आहे. एखादा पक्ष ती एकटा भरून काढेल किंवा काही जण एकत्र येऊन भरून काढतील; पण आता पर्याय हवा असे लोकांना वाटू लागले असून, लोकांना वाटते तेव्हा पर्याय उभा राहतो,"असे विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात देशात नवी समीकरणे उदयाला येऊ शकतात, असे सूचित केले आहे. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना