शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पक्षात पुन्हा परतणाऱ्यांनी आधी कार्यकर्ता म्हणून काम करावे - रुपाली चाकणकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 10:08 PM

Rupali Chakankar : येणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेच्या २०२२ च्या निवडणुकी आधी महिला कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झालेली दिसेल, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

मीरारोड  - पक्षाला गरज होती, त्या अडचणीच्यावेळी पक्ष सोडून गेले. त्यांना पक्षात पुन्हा घेऊ नये, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, तेच माझे म्हणणे आहे. त्यामुळे पक्षात पुन्हा परतणाऱ्यांनी आधी कार्यकर्ता म्हणून काम करावे, पदांसाठी गडबड करू नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाईंदर येथील महिला कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्ष सोडून जाणाऱ्यांना लगावला. 

मीरा भाईंदर महापालिकेत २००२ पासून २०१५ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला महापौर, आमदार, खासदार देणाऱ्या ह्या शहरात २०१७ च्या पालिका निवडणुकी आधी सर्वच्या सर्व नगरसेवक राष्ट्रवादी सोडून वेगवेगळ्या पक्षात गेले. माजी आमदार , जिल्हाध्यक्षासह अनेक पदाधिकारी यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शहरात नाममात्र उरली. सध्या राष्ट्रवादीत सक्षम असा चेहरा वा नेतृत्व नाही, हे देखील तितकेच खरे आहे. 

राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आल्या नंतर तसेच व्यक्तिगत हित पाहून माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसुरे आदी अनेक जण पुन्हा राष्ट्रवादीत परतले आहेत. तर काहींच्या नावाची चर्चा आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद मिळवण्यासाठी देखील कदम, पाटील आदीं मध्ये चुरस लागली आहे. हे सर्व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे फिल्डिंग लावून आहेत. 

महामंडळचे अध्यक्ष पद, विरोधीपक्ष नेता, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष पद आदी अनेक पदे राष्ट्रवादीमध्ये मिळून देखील २०१७ च्या पालिका निवडणुकीत पक्ष सोडून भाजपात गेलेले आसिफ शेख सुद्धा राष्ट्रवादीत परतण्यासाठी वरिष्ठ नेत्यां कडे साखरपेरणी करत आहेत . त्यामुळे अडचणीच्या पडत्या काळात स्वतःच्या स्वार्था साठी राष्ट्रवादी सोडून अन्यत्र पळ काढणाऱ्या ह्या पळपुट्याना पुन्हा पक्षात घेऊ नये अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यां कडून होत आहे. त्याचे पडसाद चाकणकर यांनी घेतलेल्या महिला कार्यकर्त्यांच्या बैठकी प्रसंगी देखील दिसून आले . 

चाकणकर म्हणाल्या की , "पक्ष सोडून गेलेल्यांऐवजी पक्षासोबत निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देणार. महिला आघाडीत तरी हाच निर्णय. पुन्हा आले तर त्यांना आधी कार्यकर्ता म्हणून कामे करण्यास सांगणार. त्यांनी पदांसाठी गडबड करू नये. आज निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे. पक्ष संघटना म्हटली की बेरजेचे गणित असते. त्यामुळे पक्षात नव्याने आणि पुन्हा येणारे ही प्रक्रिया सुरूच असते. पदे द्यायला उशीर झाला, कारण कोरोना संसर्गाचे संकट होते व अजूनही कायम आहे."

याचबरोबर, पदे येतात - जातात. पदे आणखी काही महिन्यांनी वाटली तरी चालतील . काही फरक पडणार नाही. पण महाराष्ट्रवरील कोरोनाचा संकट दूर करणे महत्वाचे. मधली पाच वर्ष सत्तेत नव्हतो, आता सत्तेत आहोत. त्यामुळे आमदार - खासदार वाढतील. येणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेच्या २०२२ च्या निवडणुकी आधी महिला कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झालेली दिसेल, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. यावेळी पक्षाचे पौर्णिमा काटकर , संतोष पेंडुरकर , साजिद पटेल , सुप्रिया माईणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .  

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस