शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

“ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी स्मारकावर बोलू नये”; शिवसेनेचा मनसेला टोला

By प्रविण मरगळे | Updated: November 17, 2020 12:24 IST

Shiv Sena Balasaheb Thackeray, MNS News: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ३ वर्षापूर्वी मुंबईच्या महापौरांचा बंगला हस्तांतरित करण्यात आला होता.

ठळक मुद्देही खासगी संपत्ती नसून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काय झालं?बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ३ वर्षापूर्वी मुंबईच्या महापौरांचा बंगला हस्तांतरित करण्यात आला होता. जेएनयूचं नाव बदलल्याने काय होणार? पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे अभिमान आणि गौरव होते

मुंबई – शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना-मनसे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील मुंबईच्या महापौरांचा बंगला घेण्यात आला होता. याठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक होणार होतं, परंतु अद्याप स्मारकाची कोणतीही हालचाल होत नसल्याने मनसेने शिवसेनेला प्रश्न विचारले होते.

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, स्मारक की मातोश्री ३ असं ट्विट केलं होतं, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ३ वर्षापूर्वी मुंबईच्या महापौरांचा बंगला हस्तांतरित करण्यात आला होता. परंतु मागील ३ वर्षात याठिकाणी कोणतीही हालचाल नाही, बंगला बंदिस्त अवस्थेत ठेवण्यात आला आहे. ही खासगी संपत्ती नसून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काय झालं? हे जनतेला सांगावे असं आवाहन त्यांनी शिवसेनेला केलं होतं.

त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावत म्हटलं की, ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर बोलू नये अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे. तर भाजपावर टीका करता राऊत म्हणाले की, आम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. स्वामी विवेकानंद आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत, जेएनयूचं नाव बदलल्याने काय होणार? पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे अभिमान आणि गौरव होते, त्यामुळे फक्त द्वेष भावनेतून नाव बदलणं, राजकीय हेतूने प्रेरित असणं हे ठीक नाही असं त्यांनी सांगितले.

शिवसेना हिंदुत्ववादी

आजच्या दिवशी शिवसेना प्रमुखांना आम्ही फक्त देहाने निरोप दिला, मात्र त्यांचा आत्मा, हिंदुत्व, विचार आणि मराठी बाणा हे सगळं आमच्यासोबत कायमस्वरुपी आहे. आजही देशाचं राजकारण भूमिपुत्र, बेरोजगार या दोन विषयांवर केंद्रीत आहे. बाळासाहेबांनी ५५ वर्षापूर्वी हा विषय मांडला होता. आज देशात सगळं राजकारण याच विषयावर आहे. शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी आहे, कालही होती, आणि यापुढेही राहील असं संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेब आमच्यासोबतच

गेल्यावर्षी या काळात सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरु होती, लोकांच्या मनात शंका होत्या. मात्र यंदा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिवसेनेचा मुख्यमंत्री तोसुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यारुपाने मानवंदना द्यायला आलेत, बाळासाहेब आमच्यात नाहीत ती वेदना कायम आहे, मात्र बाळासाहेब ठाकरे आमच्यासोबत सतत आहेत आणि राहतील प्रेरणा देत हा विश्वास आहे असं संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :MNSमनसेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv SenaशिवसेनाSandeep Deshpandeसंदीप देशपांडेSanjay Rautसंजय राऊत