शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

“ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी स्मारकावर बोलू नये”; शिवसेनेचा मनसेला टोला

By प्रविण मरगळे | Updated: November 17, 2020 12:24 IST

Shiv Sena Balasaheb Thackeray, MNS News: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ३ वर्षापूर्वी मुंबईच्या महापौरांचा बंगला हस्तांतरित करण्यात आला होता.

ठळक मुद्देही खासगी संपत्ती नसून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काय झालं?बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ३ वर्षापूर्वी मुंबईच्या महापौरांचा बंगला हस्तांतरित करण्यात आला होता. जेएनयूचं नाव बदलल्याने काय होणार? पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे अभिमान आणि गौरव होते

मुंबई – शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना-मनसे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील मुंबईच्या महापौरांचा बंगला घेण्यात आला होता. याठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक होणार होतं, परंतु अद्याप स्मारकाची कोणतीही हालचाल होत नसल्याने मनसेने शिवसेनेला प्रश्न विचारले होते.

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, स्मारक की मातोश्री ३ असं ट्विट केलं होतं, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ३ वर्षापूर्वी मुंबईच्या महापौरांचा बंगला हस्तांतरित करण्यात आला होता. परंतु मागील ३ वर्षात याठिकाणी कोणतीही हालचाल नाही, बंगला बंदिस्त अवस्थेत ठेवण्यात आला आहे. ही खासगी संपत्ती नसून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काय झालं? हे जनतेला सांगावे असं आवाहन त्यांनी शिवसेनेला केलं होतं.

त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावत म्हटलं की, ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर बोलू नये अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे. तर भाजपावर टीका करता राऊत म्हणाले की, आम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. स्वामी विवेकानंद आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत, जेएनयूचं नाव बदलल्याने काय होणार? पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे अभिमान आणि गौरव होते, त्यामुळे फक्त द्वेष भावनेतून नाव बदलणं, राजकीय हेतूने प्रेरित असणं हे ठीक नाही असं त्यांनी सांगितले.

शिवसेना हिंदुत्ववादी

आजच्या दिवशी शिवसेना प्रमुखांना आम्ही फक्त देहाने निरोप दिला, मात्र त्यांचा आत्मा, हिंदुत्व, विचार आणि मराठी बाणा हे सगळं आमच्यासोबत कायमस्वरुपी आहे. आजही देशाचं राजकारण भूमिपुत्र, बेरोजगार या दोन विषयांवर केंद्रीत आहे. बाळासाहेबांनी ५५ वर्षापूर्वी हा विषय मांडला होता. आज देशात सगळं राजकारण याच विषयावर आहे. शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी आहे, कालही होती, आणि यापुढेही राहील असं संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेब आमच्यासोबतच

गेल्यावर्षी या काळात सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरु होती, लोकांच्या मनात शंका होत्या. मात्र यंदा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिवसेनेचा मुख्यमंत्री तोसुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यारुपाने मानवंदना द्यायला आलेत, बाळासाहेब आमच्यात नाहीत ती वेदना कायम आहे, मात्र बाळासाहेब ठाकरे आमच्यासोबत सतत आहेत आणि राहतील प्रेरणा देत हा विश्वास आहे असं संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :MNSमनसेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv SenaशिवसेनाSandeep Deshpandeसंदीप देशपांडेSanjay Rautसंजय राऊत