शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

“शिवसेनेवर आरोप करणारे मुंबई अन् मुंबादेवीचा अपमान करतायेत" - खासदार संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 14:35 IST

शिवसेना नेहमीच महिलांच्या हक्कासाठी यापुढेही संघर्ष करेल. शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला हीच शिकवण दिली आहे असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

ठळक मुद्देशिवसेना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्यासारख्या राजांना आदर्श मानतेकाही लोकांकडून द्वेषाने शिवसेना महिलांचा अपमान करत आहे असं पसरवलं जात आहेशिवसेना नेहमीच महिलांच्या हक्कासाठी यापुढेही संघर्ष करेल ही बाळासाहेबांची शिकवण आहे.

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटला आहे. कंगना राणौतला अर्वाच्च भाषा वापरल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली. कंगना जे मुंबईबद्दल बोलली ते चुकीचेच आहे परंतु एका महिलेबाबत अर्वाच्च भाषेचा वापर करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नाही असं सांगत अनेकांनी संजय राऊतांच्या भूमिकेचा विरोध केला होता.

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे असं म्हटलं होतं. त्यावरुन आता संजय राऊत यांनी ट्विटवरुन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, शिवसेना हिंदुचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्यासारख्या राजांना आदर्श मानते. त्यांनी आम्हाला महिलांचा सन्मान राखणे शिकवलं आहे. पण काही लोकांकडून द्वेषाने शिवसेना महिलांचा अपमान करत आहे असं पसरवलं जात आहे असा आरोप त्यांनी केला.

तसेच जे लोक अशाप्रकारे शिवसेनेवर आरोप करत आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, ते मुंबई आणि मुंबादेवीचा अपमान करत आहेत. शिवसेना नेहमीच महिलांच्या हक्कासाठी यापुढेही संघर्ष करेल. शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला हीच शिकवण दिली आहे असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

काय म्हणाली होती कंगना राणौत?

संजयजी तुम्ही माझ्याबद्दल अपशब्द वापरले..तुम्ही एक नेते आहात आणि हे तुम्हाला माहितच असेल की या देशात तासाला अनेक महिलांवर बलात्कार होत आहे, त्यांच्यावर अत्याचार केला जात आहे, अॅसिड हल्ला केला जातोय. तुम्हाला माहित्येय याला जबाबदार कोण आहे? तुम्ही माझ्याप्रती अपशब्द वापरून जी मानसिकता दर्शवलीत, ही त्याला जबाबदार आहे. या देशातील मुलगी तुम्हाला कधीच माफ करणार नाही,' असे तिनं म्हटलं होतं.

आमीर खान, नसरुद्दीन त्यांना कुणीच काही म्हटलं नाही.

''या देशात राहण्याची भीती वाटते, असं जेव्हा आमीर खान म्हटला होता. त्यावेळी कुणीच असे अपशब्द वापरले नाहीत. नसरुद्दीन शाह यांनाही कुणीच प्रत्युत्तर दिलं नाही. मुंबई पोलिसांचे मी कौतुक करताना थकत नव्हती. पण, पालघर साधू हत्या असेल किंवा सुशांत सिंग राजपूत प्रकरण असेल त्यावरून मी त्यांच्यावर टीका केली, तर ती माझी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे,असंही ती म्हणाली.

संजय निरुपमांची शिवसेनेवर टीका

कंगना राणौतनं मुंबईबद्दल जे भाष्य केले आहे ते आम्हा कोणालाच मान्य नाही. तिच्या वक्तव्याचा आम्ही निषेध केला. पण शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन कंगनावर अर्वाच्च भाषेचा वापर केला. ही शिवसेनेची निराशा आहे. छत्रपतींच्या नावावर उघडपणे शिविगाळ करणे हा महाराजांचा अपमान आहे. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे अशी मागणी संजय निरुपम यांनी केली होती.

कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतKangana Ranautकंगना राणौतcongressकाँग्रेस