शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर ममता बॅनर्जींनाही गमवावे लागू शकते मुख्यमंत्रिपद, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने वाजवली धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 14:27 IST

Mamata Banerjee News: तीरथ सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदावर आलेले हे संकट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठीही डोकेदुखी बनू शकते.

ठळक मुद्देचार महिन्यांपूर्वीच उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा घेण्याची नामुष्की भाजपावर ओढवली तीरथ सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदावर आलेले हे संकट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठीही डोकेदुखी बनू शकतेतीरथ सिंह रावत यांच्याप्रमाणे ममता बॅनर्जी ह्यासुद्धा राज्याच्या विधानसभेच्या सदस्य नाही आहेत

नवी दिल्ली - चार महिन्यांपूर्वीच उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा घेण्याची नामुष्की भाजपावर ओढवली आहे. तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) हे विधानसभेचे सदस्य नव्हते. त्यामुळे सहा महिन्यांच्या आत त्यांना विधानसभेचे सदस्य होणे आवश्यक होते. मात्र कोरोनामुळे राज्यात विधानसभेची पोटनिवडणूक होत नाही आहे. त्यामुळे हे घटनात्मक संकट तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्याचे कारण ठरले आहे. आता तीरथ सिंह रावत यांच्या पदावर आलेले हे घटनात्मक संकट ममता बॅनर्जींचीही ( Mamata Banerjee) चिंता वाढवणारे आहे. ( then Mamata Banerjee may have to lose CM post too, alarm bell rings with resignation of Uttarakhand CM Tirath Singh Rawat)

तीरथ सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदावर आलेले हे संकट पश्चिम बंगालच्यामुख्यमंत्रीममता बॅनर्जी यांच्यासाठीही डोकेदुखी बनू शकते. तीरथ सिंह रावत यांच्याप्रमाणे ममता बॅनर्जी ह्यासुद्धा राज्याच्या विधानसभेच्या सदस्य नाही आहेत. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे पश्चिम बंगालमध्ये जर पुढच्या काही महिन्यांमध्ये निवडणुका झाल्या नाहीत तर ममता बॅनर्जी यांच्यासमोरही तीरथ सिंह रावत यांच्याप्रमाणे घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो.

विधानसभा किंवा विधानपरिषदेचा सदस्य नियुक्त न होता केवळ सहा महिन्यांपर्यंत कुठलीही व्यक्ती मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदावर राहू शकते. भारतीय राज्य घटनेतील कलम १६४ (४) नुसार मुख्यमंत्री किंवा मंत्री जर सहा महिन्यांपर्यंत राज्याच्या विधानमंडळाचा सदस्य होऊ शकला नाही तर त्याच्या पदाचा कार्यकाळ हा सहा महिन्यांत संपुष्टात येईल.

तीरथ सिंह रावत हे १० मार्च २०२१ रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनले होते. ते राज्याच्या विधानसभेचे सदस्य नाही आहेत. १० सप्टेंबर २०२१ पूर्वी त्यांना विधानसभेचे सदस्य होणे आवश्यक होते. राज्यात विधानसभेच्या दोन जागा रिक्त आहेत. मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्यावर निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. तसेच राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळही आता केवळ ८ महिन्यांचाच उरला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ४ मे २०२१ रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र ममतांच्या नंदिग्राम मतदारसंघातून पराभव झाला होता. त्यामुळे कलम १६४ अन्वये त्यांना सहा महिन्यांच्या आत म्हणजे ४ नोव्हेंबर २०२१ पूर्वी विधानसभेचे सदस्य होणे आवश्यक आहे. ते घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे. सध्या पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त आहे. मात्र निर्धारित कालावधीत निवडणूक झाली तरच ममता बॅनर्जी यांनी विधानसभेचे सदस्य होऊन मुख्यमंत्रिपद वाचवता येईल. अन्यथा कोरोनामुळे निवडणूक घेणे निवडणूक आयोगाला शक्य झाले नाही तर ४ नोव्हेंबर रोजी ममता बॅनर्जी यांनाही तीरथ सिंह रावत यांच्याप्रमाणे राजीनामा द्यावा लागेल.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगालChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाPoliticsराजकारण