शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

...तर ममता बॅनर्जींनाही गमवावे लागू शकते मुख्यमंत्रिपद, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने वाजवली धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 14:27 IST

Mamata Banerjee News: तीरथ सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदावर आलेले हे संकट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठीही डोकेदुखी बनू शकते.

ठळक मुद्देचार महिन्यांपूर्वीच उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा घेण्याची नामुष्की भाजपावर ओढवली तीरथ सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदावर आलेले हे संकट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठीही डोकेदुखी बनू शकतेतीरथ सिंह रावत यांच्याप्रमाणे ममता बॅनर्जी ह्यासुद्धा राज्याच्या विधानसभेच्या सदस्य नाही आहेत

नवी दिल्ली - चार महिन्यांपूर्वीच उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा घेण्याची नामुष्की भाजपावर ओढवली आहे. तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) हे विधानसभेचे सदस्य नव्हते. त्यामुळे सहा महिन्यांच्या आत त्यांना विधानसभेचे सदस्य होणे आवश्यक होते. मात्र कोरोनामुळे राज्यात विधानसभेची पोटनिवडणूक होत नाही आहे. त्यामुळे हे घटनात्मक संकट तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्याचे कारण ठरले आहे. आता तीरथ सिंह रावत यांच्या पदावर आलेले हे घटनात्मक संकट ममता बॅनर्जींचीही ( Mamata Banerjee) चिंता वाढवणारे आहे. ( then Mamata Banerjee may have to lose CM post too, alarm bell rings with resignation of Uttarakhand CM Tirath Singh Rawat)

तीरथ सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदावर आलेले हे संकट पश्चिम बंगालच्यामुख्यमंत्रीममता बॅनर्जी यांच्यासाठीही डोकेदुखी बनू शकते. तीरथ सिंह रावत यांच्याप्रमाणे ममता बॅनर्जी ह्यासुद्धा राज्याच्या विधानसभेच्या सदस्य नाही आहेत. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे पश्चिम बंगालमध्ये जर पुढच्या काही महिन्यांमध्ये निवडणुका झाल्या नाहीत तर ममता बॅनर्जी यांच्यासमोरही तीरथ सिंह रावत यांच्याप्रमाणे घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो.

विधानसभा किंवा विधानपरिषदेचा सदस्य नियुक्त न होता केवळ सहा महिन्यांपर्यंत कुठलीही व्यक्ती मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदावर राहू शकते. भारतीय राज्य घटनेतील कलम १६४ (४) नुसार मुख्यमंत्री किंवा मंत्री जर सहा महिन्यांपर्यंत राज्याच्या विधानमंडळाचा सदस्य होऊ शकला नाही तर त्याच्या पदाचा कार्यकाळ हा सहा महिन्यांत संपुष्टात येईल.

तीरथ सिंह रावत हे १० मार्च २०२१ रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनले होते. ते राज्याच्या विधानसभेचे सदस्य नाही आहेत. १० सप्टेंबर २०२१ पूर्वी त्यांना विधानसभेचे सदस्य होणे आवश्यक होते. राज्यात विधानसभेच्या दोन जागा रिक्त आहेत. मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्यावर निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. तसेच राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळही आता केवळ ८ महिन्यांचाच उरला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ४ मे २०२१ रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र ममतांच्या नंदिग्राम मतदारसंघातून पराभव झाला होता. त्यामुळे कलम १६४ अन्वये त्यांना सहा महिन्यांच्या आत म्हणजे ४ नोव्हेंबर २०२१ पूर्वी विधानसभेचे सदस्य होणे आवश्यक आहे. ते घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे. सध्या पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त आहे. मात्र निर्धारित कालावधीत निवडणूक झाली तरच ममता बॅनर्जी यांनी विधानसभेचे सदस्य होऊन मुख्यमंत्रिपद वाचवता येईल. अन्यथा कोरोनामुळे निवडणूक घेणे निवडणूक आयोगाला शक्य झाले नाही तर ४ नोव्हेंबर रोजी ममता बॅनर्जी यांनाही तीरथ सिंह रावत यांच्याप्रमाणे राजीनामा द्यावा लागेल.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगालChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाPoliticsराजकारण