शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

पंजाब काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद, सिद्धू उपमुख्यमंत्रिपदासाठी आग्रही, तर अमरिंदर सिंग म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 13:15 IST

Punjab Politics News: पंजाबमधी विधानसभा निवडणूक एका वर्षावर आली आहे. मात्र निवडणूक तोंडावर असतानाच गटातटांनी विभागलेल्या पंजाब काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद उफाळून आले आहेत.

चंदिगड - पंजाबमधी विधानसभा निवडणूक एका वर्षावर आली आहे. मात्र निवडणूक तोंडावर असतानाच गटातटांनी विभागलेल्या पंजाबकाँग्रेसमध्ये तीव्र मतभेद उफाळून आले आहेत. एकीकडे काँग्रेसकडून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांच्यातील वाद दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. दोन्ही नेत्यांमधील वाद असाच सुरू राहिला तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसू शकतो अशी चिंता काँग्रेसकडून व्यक्त करण्यात येत आहे.  नवज्योतसिंग सिद्धू हे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदासह पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र कॅप्टन अमरिंदर सिंग हे कुठल्याही परिस्थितीत सिद्धू यांना मंत्रिपदाखेरीज अधिक काही देण्यास इच्छुक नाही आहेत. दरम्यान, राज्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती पक्षनेतृत्वाला असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी सांगितले.    जाखड म्हणाले की, दोन्ही नेत्यामधील वाद शमवून पक्षसंघटनेतील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र पक्षावर दबाव आणण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धूंकडून अशाप्रकारचे राजकारण खेळले जात आहे, असे पक्षातील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थिती पक्षाने सिद्धूच्या म्हणण्याकडे फार लक्ष देता कामा नये. काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार नवज्योतसिंग सिद्धू यांचा प्रभाव अमृतसरपुरताच मर्यादित आहे. तसेच त्यांनी तिथे भाजपाचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनी अमृतसर येथून पराभूत केले होते. 

दरम्यान, पंजाबमध्ये काँग्रेसकडे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यापेक्षा मोठा चेहरा सध्या नाही आहे. जर पक्षाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे दुर्लक्ष केले तर पक्षाला राज्यात विजय मिळवणे शक्य होणार नाही. दुसरीकडे नुकत्याच झालेल्या चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे सध्यातरी पक्ष नेतृत्व कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर दबाव आणण्याच्या स्थिती नाही आहे. त्यामुळे काँग्रेस पुढील निवडणूक अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालीच लढणार आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या अंदाजानुसार पंजाबमध्ये सिद्धूंकडे फारसे पर्याय उपलब्ध नाही आहेत. शेतकरी आंदोलनामुळे राज्यात पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपाला फारसे यश मिळण्याची शक्यता नाही आहे. तर आम आदमी पक्ष पंजाबमध्ये दुर्बळ होत चालला आहे. त्यामुळे पंजाबमधील पुढील विधानसभा निवडणुकीत मुख्य लढत ही काँग्रेस आणि अकाली दल यांच्यातच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कितीही नाराज असले तरी सिद्धू हे काँग्रेससोबतच राहतील, असा काँग्रेस नेतृत्वाचा अंदाज आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसPunjabपंजाबNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPoliticsराजकारण