शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

राज्यात तीन पक्षांचं सरकार, चर्चा करुनच मंत्रिमंडळात निर्णय होईल – पृथ्वीराज चव्हाण

By प्रविण मरगळे | Published: September 28, 2020 6:49 PM

सरकारने विधेयकं तात्पुरतं स्थगित करुन त्यावर चर्चा घडवून आणावी. राज्यात तिन्ही पक्षाचं सरकार आहे, या विधेयकाबाबत चर्चा करुन मंत्रिमंडळात याबाबत निर्णय होईल अशी माहितीही पृथ्वीराज चव्हाणांनी दिली.

ठळक मुद्देनोटबंदीनंतर देशाची आर्थिक व्यवस्था ढासळत गेली, कृषी विधेयकाबाबतही केंद्र सरकारने हट्टी भूमिका घेतलीराज्यात तिन्ही पक्षाचं सरकार आहे, या विधेयकाबाबत चर्चा करुन मंत्रिमंडळात याबाबत निर्णय होईलशेतकऱ्यांशी चर्चा न करता सरकारने भांडवलदारांना पुरक विधेयक आणली,

मुंबई – संसदेने पारित केलेल्या कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली. या भेटीत पृथ्वीराज चव्हाणांनीकेंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकरीविरोधी असून सरकारने याला स्थगिती द्यावी अशी मागणी राज्यपालांकडे केली.

याबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसनं देशव्यापी आंदोलन छेडलं आहे, त्यासाठी प्राथमिक स्वरुपात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली, घाईगडबडीने संसदेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं, २५० शेतकरी संघटनांनी या विधेयकाला विरोध केला आहे. शेतकऱ्यांशी चर्चा न करता सरकारने भांडवलदारांना पुरक विधेयक आणली, सरकारने तात्काळ यावर स्थगिती देऊन पुन्हा विधेयकावर चर्चा करावी असं त्यांनी सांगितले.

तसेच नोटबंदीवेळीही सरकारने असाच हट्ट केला, नोटबंदीनंतर देशाची आर्थिक व्यवस्था ढासळत गेली, कृषी विधेयकाबाबतही केंद्र सरकारने हट्टी भूमिका घेतली, संसदेत चर्चा करुन विधेयक आणायला हवं होतं, परंतु विरोधकांना चर्चा करण्याची वेळच दिली नाही. सरकारने विधेयकं तात्पुरतं स्थगित करुन त्यावर चर्चा घडवून आणावी. राज्यात तिन्ही पक्षाचं सरकार आहे, या विधेयकाबाबत चर्चा करुन मंत्रिमंडळात याबाबत निर्णय होईल अशी माहितीही पृथ्वीराज चव्हाणांनी दिली.

राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभीकरण) विधेयक, 2020 आणि शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) करार किंमत आश्वासन आणि कृषीसेवा विधेयक, 2020 ही दोन कृषी विधेयके राज्यसभेत गदारोळात मंजूर करण्यात आली आहेत.  केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात विरोधकांसह शेतकरी संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. "कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा" असं म्हणत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच कृषी विधेयकं मंजूर करताना उपसभापतींनी केलेल्या दाव्याचं त्यांनी खंडन केलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. विधेयकं मंजूर करताना विरोधक जागेवर बसले नाही असं राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी म्हटलं होतं. मात्र वेगळंच चित्र दिसत आहे. यावरून राहुल यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.  

शेतकरी का संतापले आहेत? राजू शेट्टींनी दिलं उत्तर...

मोदी सरकारने तीन कृषी विधेयके मंजूर केली आहेत. पंतप्रधान सांगतात त्यापद्धतीने आधारभूत किंमत अस्तित्वात राहील, पण ती कागदावरच राहील. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणे अशक्यप्राय वाटते. आजही हमीभाव ही एक शिफारसच आहे. तिला कायदेशीर स्वरूप नाही. पण तरीही शेतकऱ्यांना हमीभावाच्या जवळपास भाव मिळतो. कारण एकूण उत्पादनाच्या ३० टक्के अन्नधान्याचे उत्पादन स्वत: केंद्र सरकार भारतीय खाद्य निगम तसेच नाफेड यासारख्या सरकारी कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी करते. ही खरेदी हमीभावाच्या दरात होते. त्यामुळे बाजारातील भाव हमीभावाच्या आसपास स्थिर राहतात. तोट्याचे कारण सांगून केंद्र सरकारने सरकारी कंपन्या व महामंडळे विकायला काढलेली आहेत. त्या रांगेत भारतीय खाद्य निगम व नाफेडसारख्या संस्था आहेत.

या संस्था जर विक्रीस काढल्या तर एकतर केंद्र सरकार अन्नधान्य खरेदी करण्याचे बंद करेल, किंवा खुल्या बाजारातून ग्लोबल टेंडर काढून खरेदी करेल, ज्याचा गैरफायदा कॉर्पोरेट कंपन्या घेतील. यामुळे सुगीच्या काळात शेतकऱ्यांना आपला शेतीमाल हमीभावापेक्षा कितीतरी कमी किमतीमध्ये विकावा लागेल.आता हमीभावाचा कायदा असूनही लुबाडणूक होते, त्याचे संरक्षण हिरावून घेतल्यास शेतकरी नागवला जाईल. हमीभाव कागदावरच राहील. या तिन्ही विधेयकांबद्दल शेतकऱ्यांच्या मनांमध्ये हीच भीती सर्वाधिक आहे, म्हणूनच देशभरातील शेतकरी त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण