शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

उत्तर प्रदेशात सपा साफ, भाजपा टॉप! ७५ जिप अध्यक्षपदांपैकी ६७ पदांवर केला कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 20:45 IST

Uttar Pradesh District Panchayat President Election Result: उत्तर विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल मानल्या जात असलेल्या राज्यातील पंचायत निवडणुकीतील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला ७५ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांपैकी ६७ ठिकाणी भाजपाने बाजी मारलीप्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला पाच जिल्हा परिषद अध्यक्षपदांवर समाधान मानावे लागले

लखनौ - उत्तर विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल मानल्या जात असलेल्या राज्यातील पंचायत निवडणुकीतील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. ७५ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांपैकी ६७ ठिकाणी भाजपाने (BJP) बाजी मारली आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) पाच जिल्हा परिषद अध्यक्षपदांवर समाधान मानावे लागले. तर रालोदला (RLD) एक, तर अन्य दोन ठिकाणी अपक्ष आणि इतर पक्षांनी बाजी मारली. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशाचे श्रेय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेला दिले आहे. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी या विजयावर एपी साफ, बीजेपी टॉप अशी प्रतिक्रिया दिली आहे. (SP clean in Uttar Pradesh, BJP on top! Out of 75 ZP president posts, 67 posts were occupied by BJP)

एप्रिल मे महिन्यामध्ये झालेल्या उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर आज जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या सदस्यांमधून ५३ जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मतदान झालेय यामध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली. तर याआधी बिनविरोध निवडल्या गेलेल्या २२ पैकी २१ जिल्हा परिषद अध्यक्षपदांवरही भाजपाने कब्जा केला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे मुलायम सिंह यादव यांचा वरचष्मा असलेल्या मैनपुरी आणि सोनिया गांधींचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमध्येही भाजपा उमेदवाराने विजय मिळवला.

शनिवारी झालेल्या ५३ जिल्ह्यांतील मतदानामध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली. केवळ एटा, संतकबीरनगर, आझमगड, बलिया, बागपत, जौनपूर आणि प्रतापगड जिल्ह्यात भाजपाचा पराभव झाला, तर अन्य ४४ ठिकाणी भाजपाने बाजी मारली. राज्यातील ७५ जिल्ह्यांपैकी भाजपाने पश्चिम उत्तर प्रदेशातील १४ पैकी १३, बृज क्षेत्रातील १२ पैकी ११, कानपूर क्षेत्रातील १४ पैकी १३, अवध क्षेत्रातील १३ पैकी १३, काशी क्षेत्रातील १२ पैकी १० आणि गोरखपूर क्षेत्रातील १० पैकी ७ ठिकाणी विजय मिळवला.

भाजपाने समाजवादी पार्टीचे गड समजल्या जाणाऱ्या मैनपुरी, रामपूर, बदायूं आणि आझमगडसह काँग्रेसच्या राजबरेली या बालेकिल्ल्यातही विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपाला अपक्ष उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. त्यासह भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या अपना दल (एस) पक्षालाही दोन पैकी एका जागेवर विजय मिळाला.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारणBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी