शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

'मतदारसंघात गीतेंनी एकही लोकोपयोगी काम केले नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 12:22 AM

सलग ३० वर्षे खासदार आणि दहा वर्षे केंद्रात मंत्री असणाऱ्या शिवसेनेच्या अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात एकही मोठे लोकोपयोगी काम केलेले नाही,

अलिबाग : सलग ३० वर्षे खासदार आणि दहा वर्षे केंद्रात मंत्री असणाऱ्या शिवसेनेच्या अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात एकही मोठे लोकोपयोगी काम केलेले नाही, त्यामुळे त्यांच्याकडे विकासावर बोलण्याचा कोणताच मुद्दा शिल्लक राहिलेला नाही, त्याचमुळे ते जाहीर सभेत लोटांगण घालून माझ्यावर टीका करून आपल्या निष्क्रियतेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील जाहीर सभेत केला.तालुक्यातील थळ, मापगाव, शहापूर आणि कुर्डूस येथील जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आघाडीतील घटक पक्ष असणाºया काँग्रेसने त्यांच्या प्रचारसभांचा कार्यक्रम आखला होता. त्यांनी या ठिकाणी प्रचार रॅली आणि झंझावती सभा घेतल्या. त्या सभांमधून तटकरे यांनी भाजप सरकार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जबरदस्त टीकास्त्र सोडले. गेल्या ७० वर्षांमध्ये काँग्रेसने देशात काय केले, असा अपप्रचार भाजप आणि शिवसेना करत आहे. याचा समाचार घेताना तटकरे म्हणाले, विविध कंपन्या, शेती क्षेत्रामध्ये अन्नधान्य आयात करणारा अशी ओळख पुसून तो निर्यात करणारा देश अशी केली. संगणक, मोबाइल हे सर्व काँग्रेसच्या राजवटीत घेतलेले निर्णय आहेत. भाजप सरकारेन जनतेला फसवण्याचे काम केले आहे.

देशाला आज धर्मनिरपेक्ष विचारांची आणि सरकाची गरज आहे. देशात परिवर्तन करण्यासाठी भाजपला सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन त्यांनी केले. भाजप सरकाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न सोडवलेला नाही, त्यांच्या मालाला आधारभूत किंमत त्यांना देता आलेली नाही. पीक विम्यात भाजप सरकारने भ्रष्टाचार केला आहे, अशी टीका त्यांनी केली.
युतीचे उमेदवार गीते यांनी रायगड मतदारसंघात विकास केलेला नाही. दिवेआगर, मुरुड, माणगाव, गोरेगाव या ठिकाणी विविध कंपन्यांचा सीएसआर फंड घेऊन तेथे फक्त सार्वजनिक शौचालय उभारण्याचे काम केले. मी आणलेला विकासनिधी त्यांनी आणल्याचे खोटे सांगण्याचा ‘उद्योग’ अवजड उद्योगमंत्र्यांनी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. गीतेंनी केलेली कामे मी दुर्बीण लावून शोधत असल्याची मार्मिक टीकाही त्यांनी केली.अवजड उद्योगमंत्री म्हणून काँग्रेसचे तत्कालीन दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी लातूर येथे तब्बल १२०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणून तेथे कंपनी उभारली, तसेच त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही गोंदियामध्ये कंपनी उभारून हजोरो बेराजगार तरुणांच्या हाताला काम दिले. मात्र, गीते यांना ती किमया साधता आली नाही. त्यांनी फक्त रेल्वे आणण्याचे आणि रोहे आणि रत्नागिरी येथे पेपर इंडस्ट्री आणण्याच्या फक्त घोषणाच केल्या. आरसीएफच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ते अद्याप सोडवू शकलेले नाहीत, असे असतानाही ते त्याच प्रकल्पग्रस्तांना प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन पुन्हा मते मागत असल्याची टीका तटकरे यांनीकेली.१९९५ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे रिमोटकंट्रोल असल्याने भाजप त्यांचे ऐकत होती, आता मात्र चित्र उलटे झाले आहे. शिवसेना भाजप सोबत फरफरटत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना अफजल खानाची उपमा दिली, तर मोंदीना चौकीदार चोर आहे, असे संबोधल्याची आठवण त्यांनी करून दिली. भाजप सरकारच्या कालावधीत महिला, दलित यांच्यावरील अत्याचारात वाढ झाली आहे. बेरोजगारांचा प्रश्न आकाशाला भिडला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्यटन उद्योग, रेवस-रेड्डी सागरी मार्ग पूर्ण करण्याबाबत मंत्री असताना दिलेला शब्द खरा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर, सुनील थळे, राजा ठाकूर यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019raigad-pcरायगडAnant Geeteअनंत गीते