शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

“...तर दिल्लीत कोणीही विचारणार नाही; शरद पवारांनी दिलेला ‘तो’ सल्ला कायम लक्षात ठेवते”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 11:45 IST

पवार कुटुंब म्हणजे पक्ष नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस हाच एक पक्ष आहे. हे कुटुंब हा पक्ष वाढावा अशीच प्रत्येक नेत्याची इच्छा आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेश, गुजरात वगळता इतर राज्यात सत्ता मिळवणं भाजपासाठी कठीण झालं होतं.स्वत:ला चाणक्य वैगेरे म्हणवून घेणारे त्यांचा फुगा पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर फुटला आहे मुख्यमंत्रिपद मिळावं अशी सगळ्यांची इच्छा असते. त्यात गैर वाटण्यासारखं काही नाही

मुंबई – महाराष्ट्र आहे म्हणूनच दिल्लीच राजकारण आहे, राज्यातील कामं, निवडणुका सोडल्या तर दिल्लीत कोणीही विचारणार नाही हे वास्तव आहे आणि याची मला जाणीव आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलं आहे. एका वेबिनारच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भविष्यात तुमचं राजकारण महाराष्ट्रात असणार का? या प्रश्नाच्या उत्तरानंही राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

यावर सुप्रिया सुळे(NCP Supriya Sule) म्हणाल्या की, मी बारामतीतून निवडून आले त्यामुळे महाराष्ट्रातून निवडून जात असल्याने महाराष्ट्राशिवाय मला दिल्ली मिळणारच नाही. आपली ताकद वाढवण्यासाठी सगळेच काम करतात. मुख्यमंत्रिपद मिळावं अशी सगळ्यांची इच्छा असते. त्यात गैर वाटण्यासारखं काही नाही असं सूचक विधान त्यांनी केले आहे. त्याचसोबत कोणावरही वैयक्तिक टीका करू नका, महाविकास आघाडी सरकारवर टीका करा असा सल्लाही सुप्रिया सुळेंनी भाजपाला(BJP) दिला आहे.

तसेच पवार कुटुंब म्हणजे पक्ष नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस हाच एक पक्ष आहे. हे कुटुंब हा पक्ष वाढावा अशीच प्रत्येक नेत्याची इच्छा आहे. राज्याच्या स्थैर्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली. यापूर्वी पुलोदचा प्रयोगही झाला होता. उत्तर प्रदेश, गुजरात वगळता इतर राज्यात सत्ता मिळवणं भाजपासाठी कठीण झालं होतं. मध्य प्रदेशातून फोडाफोडीचं राजकारण करून सरकार स्थापन केले. त्यामुळे जे स्वत:ला चाणक्य वैगेरे म्हणवून घेणारे त्यांचा फुगा पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर फुटला आहे असा टोला सुप्रिया सुळेंनी भाजपाला लगावला.

बाबा शरद पवारांचा‘तो’ सल्ला कायम लक्षात ठेवते

जेव्हा मी बारामती मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर बाबांनी मला चांगला सल्ला दिला होता. एकतर माझे वडील शरद पवार(Sharad Pawar) आणि आई प्रतिभा हे खूप कमी सल्ले देतात पण त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या आहेत. मी संसदेची पहिल्यांदा पायरी चढले ती पायरी चढण्याची भाग्य तुला लाभलं ही संधी बारामतीच्या लोकांमुळे मिळाली आहे. ज्यावेळी तू या बारामतीकरांना विसरशील तेव्हा त्यादिवशी तुला ती पायरी चढता येणार नाही असा सल्ला बाबांनी मला दिला होता ते मी कायम लक्षात ठेवते अशी आठवण सुप्रिया सुळेंनी सांगितली.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा