शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

“...तर दिल्लीत कोणीही विचारणार नाही; शरद पवारांनी दिलेला ‘तो’ सल्ला कायम लक्षात ठेवते”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 11:45 IST

पवार कुटुंब म्हणजे पक्ष नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस हाच एक पक्ष आहे. हे कुटुंब हा पक्ष वाढावा अशीच प्रत्येक नेत्याची इच्छा आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेश, गुजरात वगळता इतर राज्यात सत्ता मिळवणं भाजपासाठी कठीण झालं होतं.स्वत:ला चाणक्य वैगेरे म्हणवून घेणारे त्यांचा फुगा पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर फुटला आहे मुख्यमंत्रिपद मिळावं अशी सगळ्यांची इच्छा असते. त्यात गैर वाटण्यासारखं काही नाही

मुंबई – महाराष्ट्र आहे म्हणूनच दिल्लीच राजकारण आहे, राज्यातील कामं, निवडणुका सोडल्या तर दिल्लीत कोणीही विचारणार नाही हे वास्तव आहे आणि याची मला जाणीव आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलं आहे. एका वेबिनारच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भविष्यात तुमचं राजकारण महाराष्ट्रात असणार का? या प्रश्नाच्या उत्तरानंही राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

यावर सुप्रिया सुळे(NCP Supriya Sule) म्हणाल्या की, मी बारामतीतून निवडून आले त्यामुळे महाराष्ट्रातून निवडून जात असल्याने महाराष्ट्राशिवाय मला दिल्ली मिळणारच नाही. आपली ताकद वाढवण्यासाठी सगळेच काम करतात. मुख्यमंत्रिपद मिळावं अशी सगळ्यांची इच्छा असते. त्यात गैर वाटण्यासारखं काही नाही असं सूचक विधान त्यांनी केले आहे. त्याचसोबत कोणावरही वैयक्तिक टीका करू नका, महाविकास आघाडी सरकारवर टीका करा असा सल्लाही सुप्रिया सुळेंनी भाजपाला(BJP) दिला आहे.

तसेच पवार कुटुंब म्हणजे पक्ष नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस हाच एक पक्ष आहे. हे कुटुंब हा पक्ष वाढावा अशीच प्रत्येक नेत्याची इच्छा आहे. राज्याच्या स्थैर्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली. यापूर्वी पुलोदचा प्रयोगही झाला होता. उत्तर प्रदेश, गुजरात वगळता इतर राज्यात सत्ता मिळवणं भाजपासाठी कठीण झालं होतं. मध्य प्रदेशातून फोडाफोडीचं राजकारण करून सरकार स्थापन केले. त्यामुळे जे स्वत:ला चाणक्य वैगेरे म्हणवून घेणारे त्यांचा फुगा पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर फुटला आहे असा टोला सुप्रिया सुळेंनी भाजपाला लगावला.

बाबा शरद पवारांचा‘तो’ सल्ला कायम लक्षात ठेवते

जेव्हा मी बारामती मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर बाबांनी मला चांगला सल्ला दिला होता. एकतर माझे वडील शरद पवार(Sharad Pawar) आणि आई प्रतिभा हे खूप कमी सल्ले देतात पण त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या आहेत. मी संसदेची पहिल्यांदा पायरी चढले ती पायरी चढण्याची भाग्य तुला लाभलं ही संधी बारामतीच्या लोकांमुळे मिळाली आहे. ज्यावेळी तू या बारामतीकरांना विसरशील तेव्हा त्यादिवशी तुला ती पायरी चढता येणार नाही असा सल्ला बाबांनी मला दिला होता ते मी कायम लक्षात ठेवते अशी आठवण सुप्रिया सुळेंनी सांगितली.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा