शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण मोदी सरकारने शेतकऱ्यांचे पाय अश्रूंनी धुवायला हवेत, पण...; संजय राऊत यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 13:56 IST

Shivsena Sanjay Raut And Narendra Modi : शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे. याच दरम्यान शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. "शेतकऱ्यांसाठी कोणाच्याही डोळ्यात अश्रू येत नाही" असं म्हणत पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. "संपूर्ण मोदी सरकारने आपल्या अश्रूंनी शेतकऱ्यांचे पाय धुवायला हवेत पण त्याच्यावर सर्वजण मौन बाळगून आहेत आणि त्या आंदोलनाची चेष्टा आणि थट्टा करताहेत, ते नौटंकी आहे असं म्हणताहेत. हा फार विचित्र प्रकार आहे" असं म्हणत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.  

"नरेंद्र मोदी यांनी फार चांगल्या पद्धतीने कारभार पाहिला आहे. मुख्यमंत्री असताना त्यांच्या भावनेचा कधी बांध फुटला नाही तर ते कठोर राज्यकर्ते म्हणून काम करत होते. पण जेव्हा ते दिल्लीत आले तेव्हा पहिल्या दिवसापासून अधूनमधून भावनेचा बांध फुटतोय. त्यांच्या अश्रूंच्या संदर्भात कोणीही राजकारण करू नये अथवा चेष्टा करू नये" असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी आंदोलनाबाबत विचारलं असता संपूर्ण मोदी सरकारने शेतकऱ्यांचे पाय अश्रूंनी धुवायला हवेत असं म्हटलं आहे. "लाखोंच्या संख्येने शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यावर आहेत. दोनशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण आजारी पडलेत. घर दार टाकून थंडी वाऱ्यात म्हातारे शेतकरी कुडकुडत बसले आहेत. अश्रुंचा महापूर यावा, राज्यकर्त्यांच्या डोळ्यात, असा हा प्रसंग असल्याचं देखील राऊत यांनी म्हटलं आहे. 

"कोणत्या परिस्थितीत शेतकरी राहतोय हे पाहून राज्यकर्त्यांच्या भावना अनावर व्हायला पाहिजेत"

"एकटे नरेंद्र मोदी नाही तर संपूर्ण मोदी सरकारने आपल्या अश्रूंनी शेतकऱ्यांचे पाय धुवायला हवेत. पण त्याच्यावर आता सर्वजण मौन बाळगून आहेत आणि त्या आंदोलनाची चेष्टा आणि थट्टा करताहेत, ते नौटंकी आहे असं म्हणताहेत. हा फार विचित्र प्रकार आहे. कोणत्या परिस्थितीत शेतकरी राहतोय हे पाहून आपल्या राज्यकर्त्यांच्या भावना अनावर व्हायला पाहिजेत. हाथरसच्या घटनेवर कोणी अश्रू ढाळले नाहीत. महाराष्ट्रात पूर्वी काही प्रकार घडले त्यावर अश्रू येत नाहीत. खरं तर यायला पाहिजेत. राज्यकर्ता हा भावनाविवश असायला पाहिजे. तरच तो राज्यकर्ता" असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. 

पंतप्रधान स्वत:ही 'आंदोलनजीवी' होते; हा देश आंदोलनातूनच तयार झाला : संजय राऊत

नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आपल्या संबोधनादरम्यान आंदोलनजीवी असा उल्लेख केला होता. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. "आम्ही सर्वकाही आहोत, आम्ही बुद्धीजीवी आहोत, आम्ही आंदोलनजीवी आहोत, आम्ही कमलजीवी आहोत. हा देश जीवांनीच तयार झाला आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी हे स्वत: एक आंदोलनजीवी होते," अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम अयोध्येचा प्रवास केला. ते श्रीनगरच्या लाल चौकातही गेले. महाराष्ट्रात भाजप आंदोलन करत आहे. तर काय भाजपा पंतप्रधानांविरोधात आंदोलन करत आहे का? पंतप्रधानांनी ही गोष्ट मजेत घेतली हे योग्य नाही. हा देश जनआंदोलनातूनच तयार झाला आहे," असंही राऊत यावेळी म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. 

पंतप्रधानांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. परंतु लोकांनाही त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीदेखील आंदोलन केल्याचं ते म्हणाले. "देशभक्त आणि देशद्रोहींची आता वेगळी व्याख्या तयार झाली आहे. जे भाजप विरोधी सरकार आहे त्यांनी काहीही केलं तर तो देशद्रोह होतो. मुंबईमध्ये आम्ही टीआरपीचा तपास केला तर बड्या व्यक्तींनी आपल्या शेतकऱ्यांच्या विरोधात जे ट्वीट केले ते कोणाच्या दबावाखाली केले का याचा तपास सरकार करत आहे," असं राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदी