शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

राज्यात महाआघाडीचा सुरात सूर; जिल्ह्यात मात्र तीन पक्षांचा ताल जमेना, शिवसेनेकडून इतरांना सोबत न घेण्याची भूमिका कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 13:18 IST

Maharashtra News: दोन वर्षापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. या आघाडीचा संसार दोन वर्षे यशस्वीरित्या सुरूही आहे. मात्र राज्यात नेत्यांचे सूर जुळले असले तरी अजून जिल्हा, तालुका पातळीवर मात्र हे सूर जुळलेले नाहीत.

- मनोज मुळ्ये रत्नागिरी : दोन वर्षापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. या आघाडीचा संसार दोन वर्षे यशस्वीरित्या सुरूही आहे. मात्र राज्यात नेत्यांचे सूर जुळले असले तरी अजून जिल्हा, तालुका पातळीवर मात्र हे सूर जुळलेले नाहीत. चिपळूण नगर परिषद आणि चिपळूण पंचायत समितीवगळता अन्य कोठेही हे तीन पक्ष एकत्र आलेले नाहीत.राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मात्र पंचायत समिती सभापती, विषय समिती सभापती निवडणुकीत चिपळूण वगळता कोठेही महाविकास आघाडी दिसलेली नाही. (Mahavikas Aghadi News)

केवळ चिपळूण पंचायत समितीत महाआघाडीचिपळूण पंचायत समिती वगळता इतर आठही पंचायत समित्यांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्रच आहेत. चिपळुणात सभापती निवडीसाठी महाआघाडी झाली आहे.

राजापुरात सेना - काँग्रेस आमनेसामनेचथेट नगराध्यक्ष निवडणुकीत राजापुरात काँग्रेसचे जमीन खलिफे विजयी झाले. राज्यात महाविकास आघाडी असली तरी राजापुरात मात्र काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष कायमच एकमेकांसमोर उभे असतात.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला पद नाहीजिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती निवडणूक झाली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून उपाध्यक्ष पदाची मागणी होत होती. पण शिवसेनेचे संख्याबळ खूपच मोठे असल्याने शिवसेनेने राष्ट्रवादीला कोणतेही पद दिले नाही.

चिपळुणात भाजपविरोधासाठी महाविकास आघाडीनगर परिषदांच्या निवडणुका झाल्या तेव्हा राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता होती. मात्र दोघांमध्येही वितुष्ट आले होते. त्यात चिपळूणमध्ये थेट नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने बाजी मारली. शिवसेनेचे संख्याबळ अधिक असले तरी नगराध्यक्ष पद म्हणून सत्ता भाजपकडे होती. त्यावेळी भाजपला शह देण्यासाठी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची महाआघाडी झाली. ही आघाडी राज्याच्या सुत्रानुसार झालेली नसून, भाजपवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर झाली आहे. त्यामुळेच अनेक विषयांबाबत महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता दिसत नाही. भाजपला विरोध हेच मुख्य सूत्र असल्याने येणाऱ्या  निवडणुकांमध्ये हे तीन पक्ष एकत्र निवडणूक लढतील, असे दिसत नाही.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव म्हणतात...पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा निर्णय घेतला असल्याने आम्ही त्याला बांधिल आहोत. स्थानिक पातळीवरही आघाडी करण्याची आमची तयारी आहे. मात्र शिवसेनेकडून अजून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीRatnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस