शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

राज्यात महाआघाडीचा सुरात सूर; जिल्ह्यात मात्र तीन पक्षांचा ताल जमेना, शिवसेनेकडून इतरांना सोबत न घेण्याची भूमिका कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 13:18 IST

Maharashtra News: दोन वर्षापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. या आघाडीचा संसार दोन वर्षे यशस्वीरित्या सुरूही आहे. मात्र राज्यात नेत्यांचे सूर जुळले असले तरी अजून जिल्हा, तालुका पातळीवर मात्र हे सूर जुळलेले नाहीत.

- मनोज मुळ्ये रत्नागिरी : दोन वर्षापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. या आघाडीचा संसार दोन वर्षे यशस्वीरित्या सुरूही आहे. मात्र राज्यात नेत्यांचे सूर जुळले असले तरी अजून जिल्हा, तालुका पातळीवर मात्र हे सूर जुळलेले नाहीत. चिपळूण नगर परिषद आणि चिपळूण पंचायत समितीवगळता अन्य कोठेही हे तीन पक्ष एकत्र आलेले नाहीत.राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मात्र पंचायत समिती सभापती, विषय समिती सभापती निवडणुकीत चिपळूण वगळता कोठेही महाविकास आघाडी दिसलेली नाही. (Mahavikas Aghadi News)

केवळ चिपळूण पंचायत समितीत महाआघाडीचिपळूण पंचायत समिती वगळता इतर आठही पंचायत समित्यांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्रच आहेत. चिपळुणात सभापती निवडीसाठी महाआघाडी झाली आहे.

राजापुरात सेना - काँग्रेस आमनेसामनेचथेट नगराध्यक्ष निवडणुकीत राजापुरात काँग्रेसचे जमीन खलिफे विजयी झाले. राज्यात महाविकास आघाडी असली तरी राजापुरात मात्र काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष कायमच एकमेकांसमोर उभे असतात.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला पद नाहीजिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती निवडणूक झाली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून उपाध्यक्ष पदाची मागणी होत होती. पण शिवसेनेचे संख्याबळ खूपच मोठे असल्याने शिवसेनेने राष्ट्रवादीला कोणतेही पद दिले नाही.

चिपळुणात भाजपविरोधासाठी महाविकास आघाडीनगर परिषदांच्या निवडणुका झाल्या तेव्हा राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता होती. मात्र दोघांमध्येही वितुष्ट आले होते. त्यात चिपळूणमध्ये थेट नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने बाजी मारली. शिवसेनेचे संख्याबळ अधिक असले तरी नगराध्यक्ष पद म्हणून सत्ता भाजपकडे होती. त्यावेळी भाजपला शह देण्यासाठी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची महाआघाडी झाली. ही आघाडी राज्याच्या सुत्रानुसार झालेली नसून, भाजपवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर झाली आहे. त्यामुळेच अनेक विषयांबाबत महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता दिसत नाही. भाजपला विरोध हेच मुख्य सूत्र असल्याने येणाऱ्या  निवडणुकांमध्ये हे तीन पक्ष एकत्र निवडणूक लढतील, असे दिसत नाही.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव म्हणतात...पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा निर्णय घेतला असल्याने आम्ही त्याला बांधिल आहोत. स्थानिक पातळीवरही आघाडी करण्याची आमची तयारी आहे. मात्र शिवसेनेकडून अजून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीRatnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस