शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

राज्यात महाआघाडीचा सुरात सूर; जिल्ह्यात मात्र तीन पक्षांचा ताल जमेना, शिवसेनेकडून इतरांना सोबत न घेण्याची भूमिका कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 13:18 IST

Maharashtra News: दोन वर्षापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. या आघाडीचा संसार दोन वर्षे यशस्वीरित्या सुरूही आहे. मात्र राज्यात नेत्यांचे सूर जुळले असले तरी अजून जिल्हा, तालुका पातळीवर मात्र हे सूर जुळलेले नाहीत.

- मनोज मुळ्ये रत्नागिरी : दोन वर्षापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. या आघाडीचा संसार दोन वर्षे यशस्वीरित्या सुरूही आहे. मात्र राज्यात नेत्यांचे सूर जुळले असले तरी अजून जिल्हा, तालुका पातळीवर मात्र हे सूर जुळलेले नाहीत. चिपळूण नगर परिषद आणि चिपळूण पंचायत समितीवगळता अन्य कोठेही हे तीन पक्ष एकत्र आलेले नाहीत.राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मात्र पंचायत समिती सभापती, विषय समिती सभापती निवडणुकीत चिपळूण वगळता कोठेही महाविकास आघाडी दिसलेली नाही. (Mahavikas Aghadi News)

केवळ चिपळूण पंचायत समितीत महाआघाडीचिपळूण पंचायत समिती वगळता इतर आठही पंचायत समित्यांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्रच आहेत. चिपळुणात सभापती निवडीसाठी महाआघाडी झाली आहे.

राजापुरात सेना - काँग्रेस आमनेसामनेचथेट नगराध्यक्ष निवडणुकीत राजापुरात काँग्रेसचे जमीन खलिफे विजयी झाले. राज्यात महाविकास आघाडी असली तरी राजापुरात मात्र काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष कायमच एकमेकांसमोर उभे असतात.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला पद नाहीजिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती निवडणूक झाली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून उपाध्यक्ष पदाची मागणी होत होती. पण शिवसेनेचे संख्याबळ खूपच मोठे असल्याने शिवसेनेने राष्ट्रवादीला कोणतेही पद दिले नाही.

चिपळुणात भाजपविरोधासाठी महाविकास आघाडीनगर परिषदांच्या निवडणुका झाल्या तेव्हा राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता होती. मात्र दोघांमध्येही वितुष्ट आले होते. त्यात चिपळूणमध्ये थेट नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने बाजी मारली. शिवसेनेचे संख्याबळ अधिक असले तरी नगराध्यक्ष पद म्हणून सत्ता भाजपकडे होती. त्यावेळी भाजपला शह देण्यासाठी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची महाआघाडी झाली. ही आघाडी राज्याच्या सुत्रानुसार झालेली नसून, भाजपवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर झाली आहे. त्यामुळेच अनेक विषयांबाबत महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता दिसत नाही. भाजपला विरोध हेच मुख्य सूत्र असल्याने येणाऱ्या  निवडणुकांमध्ये हे तीन पक्ष एकत्र निवडणूक लढतील, असे दिसत नाही.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव म्हणतात...पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा निर्णय घेतला असल्याने आम्ही त्याला बांधिल आहोत. स्थानिक पातळीवरही आघाडी करण्याची आमची तयारी आहे. मात्र शिवसेनेकडून अजून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीRatnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस