शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

...तर वातावरण बिघडवायचेच हा डाव उधळला; शिवसेनेचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 07:24 IST

नामदेवांच्या चरित्रामध्ये अनेक लोकविलक्षण चमत्कारांचा उल्लेख आहे. तसा एक विलक्षण चमत्कार  प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात माऊलीचे दर्शन घेऊन केला.

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचे स्वागतचएक विलक्षण चमत्कार  प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात माऊलीचे दर्शन घेऊन केलाप्रकाश आंबेडकर यांच्या चतुरपणाविषयी कुणाला शंका असण्याचे कारण नाही

मुंबई -  प्रकाश आंबेडकरांच्या मंदिर प्रवेश आंदोलनाला भाजप नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला. हे त्रांगडे कधी सुटेल असे वाटत नाही.  आंबेडकरांनी पंढरपुरात गर्दी जमवली व ती गर्दी मंदिरासमोरचे बॅरिकेडस् तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी पोलिसांनी कोणताही बलप्रयोग केला नाही. पोलिसांनी संयम राखला हे महत्त्वाचे. पोलिसांनी लाठी जरी उगारली तरी वातावरण बिघडवायचेच हा डाव त्यामुळे उधळला गेला असा गंभीर आरोप सामना अग्रलेखातून शिवसेनेने प्रकाश आंबडेकर यांच्या पंढरपूर येथील आंदोलनावर केला आहे.

तसेच देह विसर्जन करण्यासाठी नामदेव पंढरीला आले आणि विठ्ठलाच्या महाद्वारी त्यांनी समाधी घेतली. तीच ‘नामदेवाची पायरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. नामदेवांच्या चरित्रामध्ये अनेक लोकविलक्षण चमत्कारांचा उल्लेख आहे. तसा एक विलक्षण चमत्कार  प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात माऊलीचे दर्शन घेऊन केला. कपाळास बुक्का, चंदन लावून आंबेडकर मंदिरात गेले. एक प्रकारे त्यांनी भगवी पताकाच खांद्यावर घेतली. आंबेडकर व त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचे स्वागतच करावे लागेल असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

सरकारच्या मनात कोरोनासंदर्भात भीती आहे व ती रास्त आहे. इतके असूनही अॅड. प्रकाश आंबेडकर व त्यांच्या पंधरा सहकाऱ्यांना विठ्ठल मंदिरात जाऊन माऊलीचे दर्शन घेण्याची परवानगी दिली. अॅड. आंबेडकरांनी ‘नामदेव पायरी’चेही दर्शन घेतल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने मंदिरे उघडण्यासाठी जागोजाग घंटानाद आंदोलन केले व आता वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रवेशासाठी मोठे आंदोलन केले व अखेर सरकारी हस्तक्षेपाने त्यांनी मंदिरात प्रवेश मिळवला.

मंदिरांसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आंदोलनाचा संबंध भाजपच्या घंटानादाशी जोडला जातो, हा निव्वळ योगायोग समजायला हवा. अॅड. आंबेडकर व भाजपचे आतून साटेलोटे आहे, असा आरोप नेहमी केला जातो. त्यात काही तथ्य असावे असे वाटत नाही. लोक दहा तोंडांनी बोलतात व शंभर कानांनी ऐकतात त्याला इलाज नाही.

कोरोनाच्या संकटात निदान मंदिर-मशिदीचे राजकारण करू नये, पण विरोधकांना येनकेनप्रकारेण फक्त गोंधळाचे वातावरण निर्माण करायचे आहे. पंढरपुरात मराठी जनतेची विठाई माऊली आहे. पंढरीनाथाखेरीज मराठी माणसांना इतर देवतांना भजण्याचे कारण नाही असे आचार्य अत्रे म्हणत ते खरेच आहे.

पंढरपूर हे आपल्या सगळय़ांचेच मोक्षपीठ आहे व आषाढी-कार्तिकीची वारी हाच महाराष्ट्राचा धर्म आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार याच धर्माशी बांधील आहे. त्यामुळे उगाच थाळय़ांचा नाद करून विरोधकांनी ध्वनिप्रदूषण वाढवू नये. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठाई माऊली आहे. जनतेचा, सरकारचा माऊलीशी थेट संबंध आहे. त्यामुळे जे लोक आज मंदिरात घुसण्यासाठी आंदोलन करत आहेत त्यांनी सरकार व देवांत भांडण लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नाही.

जगात भांडल्यावाचून काही मिळत नाही. परमेश्वराशीदेखील भक्ताला भांडावे लागले; पण इथे सरकारविरोधी पुढारीच मंदिराबाहेर उभे राहून भक्तांना भांडण्याचे उत्तेजन देत आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा हट्ट असा आहे की, ‘नियम मोडीन, पण मंदिरात जाईन. मंदिराचे दरवाजे उघडा. मी येथे नियम मोडण्यासाठीच आलो आहे.’ कायद्याची जाण असलेल्या आंबेडकरांसारख्या व्यक्तीने कायद्याचे पालन करणार नाही अशी भाषा वापरणे योग्य नाही.

मंदिरे उघडा ही जनतेची मागणी आहे, असे आता आंबेडकर सांगत आहेत. जनतेची मागणी आहे हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे; पण राज्यातील आरोग्यविषयक आणि बाकीच्या संकटांचे भानही जनतेला आहे. वारकरी संप्रदायाने याचे भान राखले हे महत्त्वाचे.

आंबेडकर यांचे म्हणणे असे की, राज्यकर्ते ऐकत नसतील तर लोकांनी आंदोलन करावे. हा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनेच बहाल केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या चतुरपणाविषयी कुणाला शंका असण्याचे कारण नाही, पण मंदिरे उघडणार नाहीत किंवा मंदिरात कोणाला प्रवेश दिला जाणार नाही असे कधीच कोणी जाहीर केलेले नाही.

मंदिरे उघडण्याची ही वेळ नाही इतकेच सरकारने सांगितले. यावर वारकरी संप्रदायाचे प्रमुख लोक थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू शकतात. गर्दीतील एकमेकांच्या संपर्कामुळे कोरोना होतो हा गैरसमज यानिमित्ताने संपवायचा आहे असे पंढरपुरात सांगण्यात आले. असे सांगणे म्हणजे संपूर्ण डॉक्टरी क्षेत्राला व जागतिक आरोग्य संघटनेलाच आव्हान आहे.

प्रकाश आंबेडकर हे बौद्ध धर्माचे उपासक आहेत, पण राज्यातील बहुजन वंचित आघाडीचे नेतृत्व ते करतात. जे देश बौद्धधर्मीय आहेत त्या देशांतही बौद्ध प्रार्थनास्थळांत लोकांना प्रवेश नाही अशी स्थिती आहे. प्रकाश आंबेडकर यांना जनतेचे प्रश्न समजतात व वारे कोणत्या दिशेला वाहतात हेसुद्धा समजते.

मंदिरे उघडा ही लोकभावनाच आहे हे जसे आंबेडकरांना समजते तसे सरकारलाही समजत असावे व कोणतेही सरकार लोकभावनेला चिरडू शकत नाही. तरीही विरोधक बेबंद वागतात तसे सरकारला वागता येत नाही. सरकारच्या मनात कोरोनासंदर्भात भीती आहे व ती रास्त आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाPandharpurपंढरपूरUddhav Thackerayउद्धव ठाकरे