शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

“शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना कायमची शत्रू नाही”; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर भाजपा नेत्याचं विधान

By प्रविण मरगळे | Updated: February 3, 2021 08:23 IST

शिवसेनेच्या या राजकीय खेळीनंतर सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं

ठळक मुद्देराज्यातील सत्तासंघर्षाला १ वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, शिवसेना आणि भाजपा यांच्यातील तणाव वाढतच आहे. भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही शिवसेना-भाजपा यांची २५ वर्षांची युती तुटली होती, पण अखेर आम्ही पुन्हा एकत्र आलो

मुंबई – गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून बिनसलं आणि त्यानंतर थेट शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला, राज्याच्या राजकारणात झालेली ही उलथापालथ सगळ्यांसाठीच मोठा धक्का होती, एकमेकांचे कट्टर विरोधक मित्र बनले. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली, मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले.

शिवसेनेच्या या राजकीय खेळीनंतर सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं, शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. राज्यातील सत्तासंघर्षाला १ वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, शिवसेना आणि भाजपा यांच्यातील तणाव वाढतच आहे. मात्र यातच भाजपा नेत्याने बंददाराआड मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमाशी बोलताना केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय की, शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना आमचा कायमचा शत्रू नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही शिवसेना-भाजपा यांची २५ वर्षांची युती तुटली होती, पण अखेर आम्ही पुन्हा एकत्र आलो असं ते म्हणाले.

त्याचसोबत भविष्यात काही होईल हे आगामी काळात ठरेल. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली कारण त्यांना माहिती आहे सोनिया गांधी या प्रत्येक हालचालींवर नजर ठेऊन आहेत. पण उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. ते सोनिया गांधी यांच्या दबावाखाली येणार नाहीत असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, माझ्या मतदारसंघातील वने आणि वीजबिलांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.   

सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, मुनगंटीवारांनी जे काही सांगितले ते योग्य आहेच, शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही कोणाचं शत्रू नसतं, त्यामुळेच आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. आमचं महाविकास आघाडीचं सरकार मागील १ वर्षापासून यशस्वीरित्या कामकाज करत आहे, हे सरकार ५ वर्षाचा कार्यकाळ पार पाडेल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.  

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारSanjay Rautसंजय राऊत