शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

“शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना कायमची शत्रू नाही”; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर भाजपा नेत्याचं विधान

By प्रविण मरगळे | Updated: February 3, 2021 08:23 IST

शिवसेनेच्या या राजकीय खेळीनंतर सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं

ठळक मुद्देराज्यातील सत्तासंघर्षाला १ वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, शिवसेना आणि भाजपा यांच्यातील तणाव वाढतच आहे. भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही शिवसेना-भाजपा यांची २५ वर्षांची युती तुटली होती, पण अखेर आम्ही पुन्हा एकत्र आलो

मुंबई – गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून बिनसलं आणि त्यानंतर थेट शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला, राज्याच्या राजकारणात झालेली ही उलथापालथ सगळ्यांसाठीच मोठा धक्का होती, एकमेकांचे कट्टर विरोधक मित्र बनले. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली, मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले.

शिवसेनेच्या या राजकीय खेळीनंतर सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं, शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. राज्यातील सत्तासंघर्षाला १ वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, शिवसेना आणि भाजपा यांच्यातील तणाव वाढतच आहे. मात्र यातच भाजपा नेत्याने बंददाराआड मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमाशी बोलताना केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय की, शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना आमचा कायमचा शत्रू नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही शिवसेना-भाजपा यांची २५ वर्षांची युती तुटली होती, पण अखेर आम्ही पुन्हा एकत्र आलो असं ते म्हणाले.

त्याचसोबत भविष्यात काही होईल हे आगामी काळात ठरेल. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली कारण त्यांना माहिती आहे सोनिया गांधी या प्रत्येक हालचालींवर नजर ठेऊन आहेत. पण उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. ते सोनिया गांधी यांच्या दबावाखाली येणार नाहीत असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, माझ्या मतदारसंघातील वने आणि वीजबिलांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.   

सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, मुनगंटीवारांनी जे काही सांगितले ते योग्य आहेच, शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही कोणाचं शत्रू नसतं, त्यामुळेच आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. आमचं महाविकास आघाडीचं सरकार मागील १ वर्षापासून यशस्वीरित्या कामकाज करत आहे, हे सरकार ५ वर्षाचा कार्यकाळ पार पाडेल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.  

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारSanjay Rautसंजय राऊत