शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

"मी राज्यपालांचा लाडका मंत्री, कायम संपर्कात असतो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 19:09 IST

आपण राज्यपालांचे लाडके मंत्री आहोत आणि त्यामुळे आपल्याला कोणतीही अडचण येत नाही असं वक्तव्यही त्या मंत्र्यांनी केलं.

ठळक मुद्दे१५ तारखेपासून राज्यातील महाविद्यालये होणार सुरूवर्षभराचा कार्यक्रम पाहिल्यास आमचे दोघांचेही संबंध उत्तम, सामंत यांची माहिती

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यातील वादाबद्दल अनेकदा वृत्त समोर येत असतं. परंतु राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीदेखील राज्यपालांशी असलेल्या त्यांच्या संबंधांबाबत भाष्य केलं आहे. "माझा राज्यपालांशी कायम संपर्क असतो. मी त्यांचा लाडका मंत्री आहे. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही," असं उदय सामंत म्हणाले. सोलापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं. काही महिन्यांपूर्वी परीक्षांच्या मुद्द्यावरून उदय सामंत आणि राज्यपाल यांच्यातील वाद समोर आला होता. परंतु आता आपण त्यांचं लाडके मंत्री असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. "आठ दिवसांपूर्वीदेखील राज्यपालांशी माझी चर्चा झाली होती. राजकीय कार्यक्रम आणि राजकीय गोष्टी या वेगळ्या आहेत. परंतु आपलं खातं चालवत असताना राज्यपालांकडे आपल्याला जावं लागतं, त्यांची भेट घ्याी लागते. कुलपती म्हणून काही कामकाजही त्यांच्यासोबत करावं लागतं," असं उदय सामंत म्हणाले. "वर्षभराचा जर आमचा कार्यक्रम पाहिला असेल तर आमचे दोघांचेही चांगले संबंध आहेत," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवजयंतीवरही भाष्य केलं. यावेळी शिवजयंती आपल्याला साधेपणानं साजरी करावी लागणार आहे. आंगणेवाडीची यात्रदेखील कोरोनाचे नियम पाळूनच केली. महाराष्ट्राच्या सहनशीलतेमुळेच राज्य कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. जनता शिवजयंतीदेखील साधेपणानंच साजरी करेल याचा विश्वास आहे," असंही सामंत यावेळी म्हणाले. १५ तारखेपासून महाविद्यालये सुरू१५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालयं सुरू करण्यात येतील. यंदाच्या वर्षी ७५ टक्के उपस्थितीचं बंधन नसेल, अशी महत्त्वाची माहिती यापूर्वी सामंत यांनी दिली होती. सध्या ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयं सुरू केले जातील. तसंच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय खुले असतील. महाविद्यालयात ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक नसेल. मात्र महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना शासनानं घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं पालन करावं लागेल, असं सामंत म्हणाले होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रUday Samantउदय सामंतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीEducationशिक्षण