शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेची हातमिळवणी; काँग्रेस नेत्याच्या आरोपानं खळबळ

By कुणाल गवाणकर | Updated: January 4, 2021 18:46 IST

मुंबई महापालिका निवडणुकीआधी राजकीय गणितं बदलण्याची शक्यता

मुंबई: जवळपास तीन दशकं एकमेकांचे मित्र राहिलेले शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एकमेकांचे शत्रू झाले. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपपासून दूर जात थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत घरोबा केला. त्यामुळे राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपला विरोधात बसावं लागलं. तेव्हापासून भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना अनेकदा पाहायला मिळाला. मात्र आता हेच दोन पक्ष मुंबई महापालिकेत एकत्र येऊन दबाव आणत असल्याचा आरोप काँग्रेस नेते रवी राजा यांनी केला आहे."कंगना राणौतने भाजपला खुश करण्यासाठी केली महाराष्ट्राची बदनामी"२०१७ मध्ये शिवसेना आणि भाजपनं स्वतंत्रपणे मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली. त्यात शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला. तर भाजपला शिवसेनेखालोखाल जागा मिळाल्या. यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर भाजपनं विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे पद तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेसला मिळालं. नगरसेवक रवी राजा यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं. मात्र आता रवी राजा यांनी शिवसेना, भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.ठाणे जिल्ह्यात काँग्रेसचा शिवसेनेला धक्का; नेत्याने शिवबंधन सोडून काँग्रेसचा 'हात' धरलामहापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी भाजपनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ती याचिका न्यायालयानं फेटाळून लावली. त्यानंतर भाजपनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आता शिवसेना, भाजप काँग्रेसवर दबाव आणत आहेत. भाजपला विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी दबावतंत्राचा वापर होत आहेत. मात्र काँग्रेस कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडणार नसल्याचं राजा म्हणाले.राज्यातील मोठी राजकीय घडामोड; बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?'आधी भाजपनं विरोधी पक्षनेते स्वीकारण्यास नकार दिल्यानं महापौर किशोरी पेडणेकर यांनी ते पद काँग्रेसला दिलं. त्यानंतर राजकीय समीकरणं बदलल्यानंतर भाजपला विरोधी पक्षनेतेपदात रस वाटू लागला. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र न्यायालयानं महापौरांनी केलेली नेमणूक योग्य असल्याचं म्हटलं. मात्र आता विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना, भाजपकडून दबाव आणला जात आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. शिवसेनेनं भाजपच्या पाठिशी राहू, अशा स्वरुपाची भाषा सुरू केली आहे,' असा आरोप राजा यांनी केला.

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBJPभाजपाKishori Pednekarकिशोरी पेडणेकर