शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

“भाजपा नेत्याचं ज्या सचिनसोबत फोनवर बोलणं झालं; ‘तो’ पायलट नव्हे तर तेंडुलकर”, दिल्लीत हालचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 13:04 IST

Rajasthan Political Crisis: भाजपामधील कोणासोबतही माझं बोलणं झालं नाही. रिता बहुगुणा जोशी यांनीही मला कॉल केला नाही असं स्पष्टीकरण सचिन पायलट यांनी दिलं आहे.

ठळक मुद्देआज संध्याकाळी ४ च्या सुमारास सचिन पायलट दिल्लीत पोहचतील. दुसरीकडे पायलट यांच्या दिल्ली वारीमुळे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे टेन्शन वाढलं आहे. सचिन पायलट यांच्या घरी ८ आमदारांची बैठक झाली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत.

नवी दिल्ली – राजस्थानच्या राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस नेते जितिन प्रसाद यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर सचिन पायलट यांच्याविषयीही अनेक चर्चांना उधाण आलं आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटकाँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे. भाजपा नेत्या रिता बहुगुणा जोशी यांनी त्यांच्याशी बोलणं केल्याचं दावा केला होता. मात्र आता या चर्चेवर खुद्द सचिन पायलट यांनी भाष्य केले आहे.

याबाबत सचिन पायलट यांनी सांगितले की, भाजपामधील कोणासोबतही माझं बोलणं झालं नाही. रिता बहुगुणा जोशी यांनीही मला कॉल केला नाही. त्या सचिनशी फोनवर बोलल्या आहेत. मग तो सचिन तेंडुलकर असावा. माझ्याशी बोलण्याची त्यांची हिंमत नाही असा पलटवार त्यांनी केला आहे. आज संध्याकाळी ४ च्या सुमारास सचिन पायलट दिल्लीत पोहचतील. दिल्लीत भाजपा यूपीसाठी प्लॅन बनवत असताना काँग्रेसमध्ये राजस्थानच्या राजकीय हालचालींवर चर्चा होणार आहे.

सचिन पायलट हे दिल्लीत पोहचून काँग्रेस हायकमांडची भेट घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रियंका गांधी आणि सचिन पायलट यांच्या बैठकीची वेळ ठरली नाही. तर दुसरीकडे पायलट यांच्या दिल्ली वारीमुळे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे टेन्शन वाढलं आहे. त्यांनी मंत्री आणि आमदारांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. मंत्री आणि आमदारांच्या प्रत्येक हालचालींबाबत डिटेल्स देण्याचं काम त्यांनी विश्वासू शिलेदारांवर सोपवलं आहे. सचिन पायलट यांच्या घरी ८ आमदारांची बैठक झाली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत.

माजी काँग्रेस नेते आणि केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपात प्रवेश घेतला आहे. या राजकीय उलथापालथीनंतर काँग्रेसमध्ये वातावरण पेटू लागलं आहे. राजस्थानच्या काँग्रेसवरही याचा परिणाम पाहायला मिळालं आहे. जवळपास १० महिन्यानंतर पुन्हा एकदा सचिन पायलट यांनी जाहीरपणे पक्षाच्या नेतृत्वासमोर नाराजी उघड केली आहे. काँग्रेसच्या ३ सदस्यीय कमिटीचा अद्याप रिपोर्ट आला नाही. १० महिने झाले तरी मला दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण झाला नाही. सरकारला अडीच वर्ष झाली तरी वाद शमताना दिसत नाही  

काय म्हणाल्या होत्या रिता बहुगुणा जोशी?

'पायलट लवकरच भाजपमध्ये येतील. माझं त्यांच्याशी फोनवरून बोलणं झालं आहे,' असं रिटा म्हणाल्या होत्या. काँग्रेस पक्ष आता उत्तर भारतात संपल्यात जमा असल्याचं त्या पुढे म्हणाल्या. सचिन पायलट काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं समजतं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यावेळी त्यांची समजूत काढण्यात आली. मात्र तेव्हा पायलट यांना देण्यात आलेली आश्वासनं अद्यापही पूर्ण झालेली नाहीत असं त्यांनी सांगितले होते.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटSachin Tendulkarसचिन तेंडुलकरBJPभाजपाcongressकाँग्रेस