शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Sanjay Raut : "महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी", संजय राऊतांनी दिली कबुली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 19:29 IST

Sanjay Raut reaction on "Mahavikas Aghadi : राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे कमालीचे अडचणीत आले आहे.

मुंबई - राज्यात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे कमालीचे अडचणीत आले आहे. या काळात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आघाडीवर राहून विरोधकांचे मुद्दे खोडून काढत सरकारचा बचाव करत आहे. मात्र आज एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्यातील महाविकास आघाडीबाबत धक्कादायक विधान केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी ही राजकीय मजबुरीमधून जन्माला आली आहे. त्याला भाजपा कारणीभूत आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. ("Mahavikas Aghadi is Shiv Sena's political compulsion", confessed Sanjay Raut)

महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीबाबत भाष्य करणारी मुलाखत संजय राऊत यांनी दैनिक भास्कर या वृत्तपत्राला दिली आहे. त्या मुलाखतीत संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही राजकीय अपरिहार्यता आहे. हे भाजपामुळे घडले आहे. हे तिन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीचे आहे. मात्र आम्ही हिंदुत्वासोबत कुठलीही तडजोड केलेली नाही. तसेच आमचा हिंदुत्वाचा अजेंडाही बदललेला नाही, असे संजय राऊत म्हणाले. ॉयावेळी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात शिवसेना परमबीर सिंग यांचं कौतुक करायची मात्र आता दोघेही आमने-सामने का आले आहेत, असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हे तेच पोलीस आयुक्त आहेत ज्यांच्यावर सुशांत आणि कंगना प्रकरणामध्ये भाजपाने विश्वास ठेवला नव्हता. मात्र आता त्यांच्याच एका पत्राच्या बाजूने भाजपा गोंधळ घालत आहे. महाराष्ट्रात मोठे पोलीस दल आहे. यामध्ये एक असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टरसाख्या छोट्या पदावरील व्यक्ती कसा काय मोहरा, असू शकतो असे सांगत राऊत यांनी फडणवीसांचा दावा फेटाळून लावला आहे. यावेळी यूपीएबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, सोनिया गांधी ह्या दीर्घकाळापासून यूपीएचे नेतृत्व करत आहेत. मात्र आज यूपीए खूप कमकुवत झाली आहे. ती एवढी कमकुवत झाली आहे की भाजपासमोर उभी राहू शकत नाही आहे. यूपीएमध्ये आज खूप कमकुवत नेते आहेत आणि देशातील सर्व प्रादेशिक पक्ष ना काँग्रेससोबत जाऊ इच्छित आहेत ना भाजपासोबत जाऊ इच्छित आहेत. देशात जेव्हा जेव्हा तिसरी आघाडी उभी राहिली आहे तेव्हा तेव्हा ती अपयशी ठरली आहे. त्यामुळे यूपीएला भक्कम बनवण्यासाठी काँग्रेसला मन मोठं करावं लागेल. यूपीएचे नेतृत्व अनुभवी नेत्याकडे असले पाहिजे. अशी व्यक्ती केवळ शरद पवार आहे, असेही राऊत यांनी सांगितले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस