शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Sanjay Raut : "महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी", संजय राऊतांनी दिली कबुली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 19:29 IST

Sanjay Raut reaction on "Mahavikas Aghadi : राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे कमालीचे अडचणीत आले आहे.

मुंबई - राज्यात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे कमालीचे अडचणीत आले आहे. या काळात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आघाडीवर राहून विरोधकांचे मुद्दे खोडून काढत सरकारचा बचाव करत आहे. मात्र आज एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्यातील महाविकास आघाडीबाबत धक्कादायक विधान केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी ही राजकीय मजबुरीमधून जन्माला आली आहे. त्याला भाजपा कारणीभूत आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. ("Mahavikas Aghadi is Shiv Sena's political compulsion", confessed Sanjay Raut)

महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीबाबत भाष्य करणारी मुलाखत संजय राऊत यांनी दैनिक भास्कर या वृत्तपत्राला दिली आहे. त्या मुलाखतीत संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही राजकीय अपरिहार्यता आहे. हे भाजपामुळे घडले आहे. हे तिन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीचे आहे. मात्र आम्ही हिंदुत्वासोबत कुठलीही तडजोड केलेली नाही. तसेच आमचा हिंदुत्वाचा अजेंडाही बदललेला नाही, असे संजय राऊत म्हणाले. ॉयावेळी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात शिवसेना परमबीर सिंग यांचं कौतुक करायची मात्र आता दोघेही आमने-सामने का आले आहेत, असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हे तेच पोलीस आयुक्त आहेत ज्यांच्यावर सुशांत आणि कंगना प्रकरणामध्ये भाजपाने विश्वास ठेवला नव्हता. मात्र आता त्यांच्याच एका पत्राच्या बाजूने भाजपा गोंधळ घालत आहे. महाराष्ट्रात मोठे पोलीस दल आहे. यामध्ये एक असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टरसाख्या छोट्या पदावरील व्यक्ती कसा काय मोहरा, असू शकतो असे सांगत राऊत यांनी फडणवीसांचा दावा फेटाळून लावला आहे. यावेळी यूपीएबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, सोनिया गांधी ह्या दीर्घकाळापासून यूपीएचे नेतृत्व करत आहेत. मात्र आज यूपीए खूप कमकुवत झाली आहे. ती एवढी कमकुवत झाली आहे की भाजपासमोर उभी राहू शकत नाही आहे. यूपीएमध्ये आज खूप कमकुवत नेते आहेत आणि देशातील सर्व प्रादेशिक पक्ष ना काँग्रेससोबत जाऊ इच्छित आहेत ना भाजपासोबत जाऊ इच्छित आहेत. देशात जेव्हा जेव्हा तिसरी आघाडी उभी राहिली आहे तेव्हा तेव्हा ती अपयशी ठरली आहे. त्यामुळे यूपीएला भक्कम बनवण्यासाठी काँग्रेसला मन मोठं करावं लागेल. यूपीएचे नेतृत्व अनुभवी नेत्याकडे असले पाहिजे. अशी व्यक्ती केवळ शरद पवार आहे, असेही राऊत यांनी सांगितले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस