शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

Sanjay Raut: “या देशात कोणीही सेक्युलर नाही, सेक्युलरची भाषा करणारे सर्वात जास्त धर्मांध"

By प्रविण मरगळे | Updated: November 14, 2020 11:44 IST

Sanjay Raut interview with Kunal Kamra News: सेक्युलरमुळेच हिंदू आणि मुस्लिम विभाजन झालं, हिंदूंना शिवीगाळ करणं म्हणजे सेक्युलर आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी मुलाखतीत विचारला.

ठळक मुद्देशिवसेना हिंदुत्ववादी पार्टी आहे, सर्वांना सोबत घेऊन आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन पुढे जात आहेराजकारण साधुसंताचा खेळ नाही, आम्ही तपस्या करण्यासाठी आलो नाहीबंदुकीतून सुटलेली गोळी पुन्हा येत नाही असं बाळासाहेब म्हणायचे त्यांचेच आम्ही शिष्य आहोत

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून उत्कंठा असलेली प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची मुलाखत अखेर प्रदर्शित झाली आहे. या मुलाखतीत संजय राऊत यांनी भाजपा, सुशांत राजपूत, कंगना राणौत यासारख्या विविध मुद्द्यांवर सडेतोडपणे भाष्य केले आहे. यात राऊतांनी मुस्लिमांचे राजकारण करणाऱ्या औवेसींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

सामना अग्रलेखात एकेकाळी मुस्लिमांचा मतांचा अधिकार काढून घ्यावं असं विधान आलं होतं, त्यावर स्पष्टीकरण देताना संजय राऊत म्हणाले की, मुसलमान हे देशाचे नागरिक आहेत, त्यांना देशात राहण्याचा संपूर्ण हक्क आहे. परंतु काही पक्ष मुसलमानांचे राजकारण करतात, ते मुस्लिमांना अंधारात ठेवतात. ज्यादिवशी या मतांचे राजकारण बंद होईल तेव्हा देश पुढे जाईल असं बाळासाहेब म्हणायचे, म्हणून त्यांनी हे विधान म्हटलं होतं, एकदा मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, मग मुस्लिमांवर राजकारण करणारे सगळेच पळून जातील, बाळासाहेब ठाकरेंनी विचारपूर्वक ते विधान केले होते असं त्यांनी सांगितले.

तसेच हा पाकिस्तान नाही, हा हिंदुस्तान आहे, या देशात सगळ्यांना समान अधिकार आहे. या देशात मुस्लिम राजकारणाला आमचा विरोध आहे. कोर्टात साक्ष देताना कुराण, भगवतगीतावर शपथ दिली जाते, हे चुकीचं आहे, देशाची घटना आहे संविधानावर शपथ घ्यायला हवी अशी बाळासाहेब ठाकरे म्हणाले, तीच आमची भूमिका आहे. सामनात काय लिहिलं आहे हे सगळे वाचत असतात, सामनात जे लिहिलं ते लिहिलं..बोललो तर बोललो, ते कधी माघार घेतली नाही. बंदुकीतून सुटलेली गोळी पुन्हा येत नाही असं बाळासाहेब म्हणायचे त्यांचेच आम्ही शिष्य आहोत असंही संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसेना हिंदुत्ववादी पार्टी आहे, सर्वांना सोबत घेऊन आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन पुढे जात आहे, घटनेच्या चौकटीत राहून काम करतोय, या देशात कोणीही सेक्युलर नाही, सेक्युलरची भाषा करतात ते सर्वात जास्त धर्मांध असतात. सेक्युलर ही शिवी आहे. राजकारणात सेक्युलर शब्दाचा चुकीच्या अर्थाने वापर केला गेला, सेक्युलरमुळेच हिंदू आणि मुस्लिम विभाजन झालं, हिंदूंना शिवीगाळ करणं म्हणजे सेक्युलर आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी मुलाखतीत विचारला.

दरम्यान, राजकारण साधुसंताचा खेळ नाही, आम्ही तपस्या करण्यासाठी आलो नाही, राजकारणात तपस्या हवी असते त्यातून यश मिळतं. शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा राजकारण का करायचं नाही? असं बाळासाहेबांनी विचारलं होतं, पण आपल्या माणसांना न्याय देण्यासाठी सत्तेत जावं लागतं, अन्यथा फक्त आंदोलन करायचं, केसेस घ्यायचं हेच झालं असतं. शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला होता. देशात ज्यारितीचं वातावरण त्याकाळी बनलं होतं, तेव्हा बाळासाहेबांनी आणीबाणीला समर्थन देण्याची भूमिका घेतली. बाळासाहेब ठाकरेंनी उघडपणे पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरेंनी भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला त्यामागे काहीतरी कारण असेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले हे जनतेचे स्वप्न होतं असं सांगत संजय राऊत यांनी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचं समर्थन केले.

 राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षाची जागा घेऊ शकत नाही

भाजपा स्थानिक पक्षांना संपवतोय का? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षाची जागा घेऊ शकत नाही. पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, झारखंड अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष आहे. प्रादेशिक पक्षाला घेतल्याशिवाय राष्ट्रीय पक्षाचं राजकारण होऊ शकत नाही. तसेच मनसे पक्षाबाबत राऊतांनी सांगितले की, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. या देशात कायद्याच्या चौकटीत राहून पक्ष चालवण्याचा अधिकार आहे. मनसेचे एकेकाळी १३ आमदार आले होते असं ते म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतHindutvaहिंदुत्वBJPभाजपाMuslimमुस्लीम