शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Yogi Adityanath: मंत्रिमंडळात फेरबदल होणार, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाणार? योगी आदित्यनाथ अखेर बोलले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 10:23 IST

Yogi Adityanath: उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्याचदरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

ठळक मुद्दे, काही लोक नेत्यांचे होत असलेले दौरे आणि बैठकांचा वेगवेगळा अर्थ लावत आहेत त्याला वेगळे राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते पूर्णपणे चुकीचे आहे२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपा दोन तृतियांश बहुमताने विजयी होईल

लखनौ - उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. (Uttar Pradesh Politics) त्याचदरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, मुख्यमंत्री बदलला जाणार अशा चर्चांना वेग आला आहे. आरएसएस तसेच भाजपा नेत्यांनी एका पाठोपाठ एक केलेले दौरे आणि वक्तव्यांमुळे तर्कवितर्कांना अधिकच उधाण आले. (Yogi Adityanath) दरम्यान, या सर्व हालचालीवंर अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Will there be a reshuffle in the cabinet, will the Chief Minister's chair go? Yogi Adityanath finally spoke)

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या असून, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपा दोन तृतियांश बहुमताने विजयी होईल, असा दावा योगींनी केला आहे. 

ते म्हणाले की, काही लोक नेत्यांचे होत असलेले दौरे आणि बैठकांचा वेगवेगळा अर्थ लावत आहेत. तसेच त्याला वेगळे राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते पूर्णपणे चुकीचे आहे. या सर्व घटनाक्रमाला प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधून घेण्यासाठी सनसनाटी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे. 

नेत्यांच्या दौऱ्याबाबत योगी म्हणाले की, पक्षाच्या नेत्यांनी दौरे करणे ही बाब काही नवीन नाही. भाजपा हा कॅडरबेस पक्ष आहे. तो घराणेशाहीवर चालत नाही. पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवतो. त्यासाठी दर दोन महिन्यांनी वरिष्ठ नेते भेटी घेतात. तसेच राज्याच्या कार्यकारिणीसोबत बैठका घेतात. आमचे राज्य प्रभारी राधामोहन सिंह महिन्यातून दोन वेळा उत्तर प्रदेशात येतात. पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी चार महिन्यांपूर्वी स्वत:ही लखनौचा दौरा केला होता. 

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रीय राजकारणात उतरण्याची शक्यताही फेटाळून लावली आहे. ते म्हणाले की, जेव्हा मी खासदार होतो तेव्हाही माझी खास अशी महत्त्वाकांक्षा नव्हती. आज सुद्धा माझी काही महत्त्वाकांक्षा नाही आहे. मी भाजपाचा एक सामान्य सैनिक आहे जो भाजपाचे व्हिजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास, सुरक्षा आणि समृद्धी या कँपेनसाठी काम करत आहे. कोरोनाची साथ वाढत असतानाही राज्याने आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यात यश मिळवले आहे, असेही योगींनी अधोरेखित केले. 

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाPoliticsराजकारण