शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

Yogi Adityanath: मंत्रिमंडळात फेरबदल होणार, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाणार? योगी आदित्यनाथ अखेर बोलले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 10:23 IST

Yogi Adityanath: उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्याचदरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

ठळक मुद्दे, काही लोक नेत्यांचे होत असलेले दौरे आणि बैठकांचा वेगवेगळा अर्थ लावत आहेत त्याला वेगळे राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते पूर्णपणे चुकीचे आहे२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपा दोन तृतियांश बहुमताने विजयी होईल

लखनौ - उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. (Uttar Pradesh Politics) त्याचदरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, मुख्यमंत्री बदलला जाणार अशा चर्चांना वेग आला आहे. आरएसएस तसेच भाजपा नेत्यांनी एका पाठोपाठ एक केलेले दौरे आणि वक्तव्यांमुळे तर्कवितर्कांना अधिकच उधाण आले. (Yogi Adityanath) दरम्यान, या सर्व हालचालीवंर अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Will there be a reshuffle in the cabinet, will the Chief Minister's chair go? Yogi Adityanath finally spoke)

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या असून, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपा दोन तृतियांश बहुमताने विजयी होईल, असा दावा योगींनी केला आहे. 

ते म्हणाले की, काही लोक नेत्यांचे होत असलेले दौरे आणि बैठकांचा वेगवेगळा अर्थ लावत आहेत. तसेच त्याला वेगळे राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते पूर्णपणे चुकीचे आहे. या सर्व घटनाक्रमाला प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधून घेण्यासाठी सनसनाटी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे. 

नेत्यांच्या दौऱ्याबाबत योगी म्हणाले की, पक्षाच्या नेत्यांनी दौरे करणे ही बाब काही नवीन नाही. भाजपा हा कॅडरबेस पक्ष आहे. तो घराणेशाहीवर चालत नाही. पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवतो. त्यासाठी दर दोन महिन्यांनी वरिष्ठ नेते भेटी घेतात. तसेच राज्याच्या कार्यकारिणीसोबत बैठका घेतात. आमचे राज्य प्रभारी राधामोहन सिंह महिन्यातून दोन वेळा उत्तर प्रदेशात येतात. पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी चार महिन्यांपूर्वी स्वत:ही लखनौचा दौरा केला होता. 

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रीय राजकारणात उतरण्याची शक्यताही फेटाळून लावली आहे. ते म्हणाले की, जेव्हा मी खासदार होतो तेव्हाही माझी खास अशी महत्त्वाकांक्षा नव्हती. आज सुद्धा माझी काही महत्त्वाकांक्षा नाही आहे. मी भाजपाचा एक सामान्य सैनिक आहे जो भाजपाचे व्हिजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास, सुरक्षा आणि समृद्धी या कँपेनसाठी काम करत आहे. कोरोनाची साथ वाढत असतानाही राज्याने आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यात यश मिळवले आहे, असेही योगींनी अधोरेखित केले. 

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाPoliticsराजकारण