शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Sachin Vaze: परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’ने आरोपांचा बाण सेनेकडून राष्ट्रवादीकडे; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 04:21 IST

Mukesh Ambani Bomb Scare: भाजपकडून शिवसेनेवर सभागृहात हल्ला होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे एरवी आक्रमक राहणारे मंत्री शांत बसून होते

यदू जोशीमुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटरबॉम्ब’मुळे अँटिलिया-वाझे प्रकरणात आतापर्यंतच्या टीकेचा आणि आरोपांचा रोख आता शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे सरकला आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा शिवसेनेकडून बचाव केला जात असल्याचा आरोप भाजप सुरुवातीपासून करत आहे. वाझे यांच्या निलंबनाची मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावेळी त्यांनी वाझे यांना का वाचवले जात आहे? असा सवाल करत टीकेचा रोख शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवला होता.

भाजपकडून शिवसेनेवर सभागृहात हल्ला होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे एरवी आक्रमक राहणारे मंत्री शांत बसून होते. तसेच, राष्ट्रवादीचे आमदारही फारसे शिवसेनेच्या मदतीला धावले नाहीत. या प्रकरणात जे पोलीस अधिकारी दोषी असतील त्यांना प्रायश्चित्त घ्यावेच लागेल, मात्र अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची गरज नाही. त्यांनी कुठलीही चूक केलेली नाही, असे जोरदार समर्थन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी पूर्णपणे देशमुख यांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र समोर आले. अँटिलिया प्रकरण, त्यातील सचिन सचिन वाझे यांचा कथित सहभाग या गोष्टी पूर्णपणे पोलीस अधिकारी  पातळीवरील आहेत आणि त्यात गृहमंत्र्यांचा कुठलाही सहभाग नाही, अशी भूमिका एकप्रकारे राष्ट्रवादीकडून घेतली गेली.

शिवसेनेच्या मुंबई ठाण्यातील काही स्थानिक नेत्यांची नावेही या प्रकरणात जोडली गेली होती. शिवसेनेच्या बड्या नेत्यांपर्यंत या प्रकरणाची तार पोहोचेल, अशा पद्धतीने भाजपचे काही नेते दावे करत होते. युवा शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांच्याबाबतही आरोप केले गेले. ते ठाकरे यांचे जवळचे नातेवाईक आहेत. याबाबत काय ती चौकशी होईल ती होवो, पण परमबीर सिंग यांच्या पत्राने आरोपांची दिशा मात्र बदलली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची किंवा त्यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने आरोप केल्यानंतर त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादीकडून त्यांचा बचाव करण्यात आला. आता देशमुख यांचा बचाव करण्यात राष्ट्रवादीला यश येते का आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता आहे.

आरोपांची दिशा बदलण्यावर सेनेत खलबतेयानिमित्ताने महाविकास आघाडी सरकारमधील दोन प्रमुख पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील अंतर्गत ‘ब्लेमगेम’ समोर येताना दिसत आहे. अँटिलिया प्रकरण समोर आल्यापासून विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांमुळे शिवसेनेत अस्वस्थता होती. आरोपांची दिशा कशी बदलायची, याबद्दल खलबते सुरू होती, अशी माहिती आहे. गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे असतानादेखील संपूर्ण प्रकरण शिवसेनेवर शेकविले जात होते. 

त्यातच वाझे हा ओसामा बिन लादेन आहे का? वाझे हे अत्यंत प्रामाणिक  आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, अशी पावती शिवसेना नेत्यांकडून दिली गेल्याने शिवसेनेभोवती संशयाचे धुके अधिकच दाट झाले होते. परमबीर सिंग यांच्या पत्राने त्याचा रोख राष्ट्रवादीकडे वळला आहे.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगShiv Senaशिवसेनाsachin Vazeसचिन वाझेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारAnil Deshmukhअनिल देशमुख