शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

फारुख अब्दुल्ला म्हणाले, "श्रीराम सर्वांचेच, देव आणि अल्लाहमध्ये फरक करता येणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 20:44 IST

भगवान श्रीराम हे सर्वांचे आहेत. तसंच अल्लाह आणि देवात फरक केला तर हा देश विभागला जाईल, अब्दुल्ला यांचं वक्तव्य

ठळक मुद्देकाश्मीरमध्ये ४ जी सेवा सुरू केल्याबद्दल आनंद केला व्यक्तशेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचं सरकारला केलं आव्हान

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेत सहभाग घेतला. "आज भारतानं मोठा पल्ला गाठला आहे. केवळ आपल्यालाच नाही तर पूर्ण जगाला भारत धान्य पुरवत आहे," असं ते यावेळी म्हणाले. तसंच भगवान श्रीराम हे सर्वांचे आहेत. तसंच अल्लाह आणि देवात फरक केला तर हा देश विभागला जाईल, असंही ते म्हणाले. "प्रभू श्रीराम हे संपूर्ण जगाचे राम आहेत. जर ते संपूर्ण जगाचे राम आहेत तर ते आपल्या सर्वांचे राम आहेत. कुराण फक्त आमचं नाही, सर्वांचं आहे. जर तुम्ही कोणती चूक केली तर आम्ही ती बरोबर करू आणि आम्ही काही चूक केली तर ती तुम्ही बरोबर कराल. असाच देश चालतो," असं फारुख अब्दुल्ला म्हणाले. मला भारतातच जगायचंय आणि मरायचंय"आज तुम्ही आम्हाला पाकिस्तानी म्हणता, खलिस्तानी म्हणता, चिनी म्हणता. मला भारतातच जगायचं आहे आणि भारतातच मरायचंय. मी कोणालाही घाबरत नाही. मला फक्त वरच्याला उत्तर द्यायचंय. आम्ही तुम्हाला कधीच शत्रू मानलं नाही. तुम्हाचा आमचाच भाग मानला. जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात असाल तेव्हा आम्ही तुमचा सन्मान करू आणि तुमच्यापेक्षाही अधिक करू," असंही त्यांनी नमूद केलं.  "राज्याला जोडण्याचं आणि तेथील लोकांचं हृदय जिंकण्याचं काम केलं पाहिजे. सर्वांनी काश्मीरच्या नागरिकांना आपल्या हृदयाजवळ घ्या. सर्वांना सोबत घेऊन पुढे जा. जगाला दाखवून द्या की आम्ही काय आहोत. मी संयुक्त राष्ट्रातही भारताबाबत वक्तव्य केलं हा आमचाच देश आहे," असंही अब्दुल्ला म्हणाले. आनंद केला व्यक्तकाश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा 4G सेवा पूर्ववत करण्यात आल्या. यावर अब्दुल्ला यांनी आनंद व्यक्त केला. १८ महिन्यांनंतर काश्मीरमध्ये 4G सेवा सुरू करण्यात आल्या आहेत याबद्दल आनंद आहे आणि त्या यापुढेही कायम राहो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकांच्या मदतीची गरज"जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली गेली पाहिजे. लॉकडाऊन आणि कोरोना संकटामउळे आपल्याकडे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आमच्या प्रदेशातही परिस्थिती बिकट आहे. सरकारनं लोकांची मदत केली पाहिजे," असं अब्दुल्ला यांनी नमूद केलं. आज जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. ही भारतीय परंपरा नाही. ही परंपरा सुरू करू नका. जे आपल्यात नाहीत त्यांचा सन्मान करण्याचं आवाहनही फारूख अब्दुल्ला यांनी आपल्या भाषणादरम्यान केलं. तसंच यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत सरकारनं शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि समस्यांचं निराकरण केलं पाहिजे असं मतही व्यक्त केलं. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरInternetइंटरनेटFarmerशेतकरीIndiaभारत