शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

फारुख अब्दुल्ला म्हणाले, "श्रीराम सर्वांचेच, देव आणि अल्लाहमध्ये फरक करता येणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 20:44 IST

भगवान श्रीराम हे सर्वांचे आहेत. तसंच अल्लाह आणि देवात फरक केला तर हा देश विभागला जाईल, अब्दुल्ला यांचं वक्तव्य

ठळक मुद्देकाश्मीरमध्ये ४ जी सेवा सुरू केल्याबद्दल आनंद केला व्यक्तशेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचं सरकारला केलं आव्हान

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेत सहभाग घेतला. "आज भारतानं मोठा पल्ला गाठला आहे. केवळ आपल्यालाच नाही तर पूर्ण जगाला भारत धान्य पुरवत आहे," असं ते यावेळी म्हणाले. तसंच भगवान श्रीराम हे सर्वांचे आहेत. तसंच अल्लाह आणि देवात फरक केला तर हा देश विभागला जाईल, असंही ते म्हणाले. "प्रभू श्रीराम हे संपूर्ण जगाचे राम आहेत. जर ते संपूर्ण जगाचे राम आहेत तर ते आपल्या सर्वांचे राम आहेत. कुराण फक्त आमचं नाही, सर्वांचं आहे. जर तुम्ही कोणती चूक केली तर आम्ही ती बरोबर करू आणि आम्ही काही चूक केली तर ती तुम्ही बरोबर कराल. असाच देश चालतो," असं फारुख अब्दुल्ला म्हणाले. मला भारतातच जगायचंय आणि मरायचंय"आज तुम्ही आम्हाला पाकिस्तानी म्हणता, खलिस्तानी म्हणता, चिनी म्हणता. मला भारतातच जगायचं आहे आणि भारतातच मरायचंय. मी कोणालाही घाबरत नाही. मला फक्त वरच्याला उत्तर द्यायचंय. आम्ही तुम्हाला कधीच शत्रू मानलं नाही. तुम्हाचा आमचाच भाग मानला. जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात असाल तेव्हा आम्ही तुमचा सन्मान करू आणि तुमच्यापेक्षाही अधिक करू," असंही त्यांनी नमूद केलं.  "राज्याला जोडण्याचं आणि तेथील लोकांचं हृदय जिंकण्याचं काम केलं पाहिजे. सर्वांनी काश्मीरच्या नागरिकांना आपल्या हृदयाजवळ घ्या. सर्वांना सोबत घेऊन पुढे जा. जगाला दाखवून द्या की आम्ही काय आहोत. मी संयुक्त राष्ट्रातही भारताबाबत वक्तव्य केलं हा आमचाच देश आहे," असंही अब्दुल्ला म्हणाले. आनंद केला व्यक्तकाश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा 4G सेवा पूर्ववत करण्यात आल्या. यावर अब्दुल्ला यांनी आनंद व्यक्त केला. १८ महिन्यांनंतर काश्मीरमध्ये 4G सेवा सुरू करण्यात आल्या आहेत याबद्दल आनंद आहे आणि त्या यापुढेही कायम राहो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकांच्या मदतीची गरज"जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली गेली पाहिजे. लॉकडाऊन आणि कोरोना संकटामउळे आपल्याकडे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आमच्या प्रदेशातही परिस्थिती बिकट आहे. सरकारनं लोकांची मदत केली पाहिजे," असं अब्दुल्ला यांनी नमूद केलं. आज जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. ही भारतीय परंपरा नाही. ही परंपरा सुरू करू नका. जे आपल्यात नाहीत त्यांचा सन्मान करण्याचं आवाहनही फारूख अब्दुल्ला यांनी आपल्या भाषणादरम्यान केलं. तसंच यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत सरकारनं शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि समस्यांचं निराकरण केलं पाहिजे असं मतही व्यक्त केलं. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरInternetइंटरनेटFarmerशेतकरीIndiaभारत