शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

फारुख अब्दुल्ला म्हणाले, "श्रीराम सर्वांचेच, देव आणि अल्लाहमध्ये फरक करता येणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 20:44 IST

भगवान श्रीराम हे सर्वांचे आहेत. तसंच अल्लाह आणि देवात फरक केला तर हा देश विभागला जाईल, अब्दुल्ला यांचं वक्तव्य

ठळक मुद्देकाश्मीरमध्ये ४ जी सेवा सुरू केल्याबद्दल आनंद केला व्यक्तशेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचं सरकारला केलं आव्हान

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेत सहभाग घेतला. "आज भारतानं मोठा पल्ला गाठला आहे. केवळ आपल्यालाच नाही तर पूर्ण जगाला भारत धान्य पुरवत आहे," असं ते यावेळी म्हणाले. तसंच भगवान श्रीराम हे सर्वांचे आहेत. तसंच अल्लाह आणि देवात फरक केला तर हा देश विभागला जाईल, असंही ते म्हणाले. "प्रभू श्रीराम हे संपूर्ण जगाचे राम आहेत. जर ते संपूर्ण जगाचे राम आहेत तर ते आपल्या सर्वांचे राम आहेत. कुराण फक्त आमचं नाही, सर्वांचं आहे. जर तुम्ही कोणती चूक केली तर आम्ही ती बरोबर करू आणि आम्ही काही चूक केली तर ती तुम्ही बरोबर कराल. असाच देश चालतो," असं फारुख अब्दुल्ला म्हणाले. मला भारतातच जगायचंय आणि मरायचंय"आज तुम्ही आम्हाला पाकिस्तानी म्हणता, खलिस्तानी म्हणता, चिनी म्हणता. मला भारतातच जगायचं आहे आणि भारतातच मरायचंय. मी कोणालाही घाबरत नाही. मला फक्त वरच्याला उत्तर द्यायचंय. आम्ही तुम्हाला कधीच शत्रू मानलं नाही. तुम्हाचा आमचाच भाग मानला. जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात असाल तेव्हा आम्ही तुमचा सन्मान करू आणि तुमच्यापेक्षाही अधिक करू," असंही त्यांनी नमूद केलं.  "राज्याला जोडण्याचं आणि तेथील लोकांचं हृदय जिंकण्याचं काम केलं पाहिजे. सर्वांनी काश्मीरच्या नागरिकांना आपल्या हृदयाजवळ घ्या. सर्वांना सोबत घेऊन पुढे जा. जगाला दाखवून द्या की आम्ही काय आहोत. मी संयुक्त राष्ट्रातही भारताबाबत वक्तव्य केलं हा आमचाच देश आहे," असंही अब्दुल्ला म्हणाले. आनंद केला व्यक्तकाश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा 4G सेवा पूर्ववत करण्यात आल्या. यावर अब्दुल्ला यांनी आनंद व्यक्त केला. १८ महिन्यांनंतर काश्मीरमध्ये 4G सेवा सुरू करण्यात आल्या आहेत याबद्दल आनंद आहे आणि त्या यापुढेही कायम राहो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकांच्या मदतीची गरज"जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली गेली पाहिजे. लॉकडाऊन आणि कोरोना संकटामउळे आपल्याकडे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आमच्या प्रदेशातही परिस्थिती बिकट आहे. सरकारनं लोकांची मदत केली पाहिजे," असं अब्दुल्ला यांनी नमूद केलं. आज जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. ही भारतीय परंपरा नाही. ही परंपरा सुरू करू नका. जे आपल्यात नाहीत त्यांचा सन्मान करण्याचं आवाहनही फारूख अब्दुल्ला यांनी आपल्या भाषणादरम्यान केलं. तसंच यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत सरकारनं शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि समस्यांचं निराकरण केलं पाहिजे असं मतही व्यक्त केलं. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरInternetइंटरनेटFarmerशेतकरीIndiaभारत