शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

...अन्यथा जनतेचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास संपेल; काँग्रेस आमदाराचं भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 13:37 IST

माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपाचे वरिष्ठ नेते कैलाश मेघवाल यांनी शनिवारी काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे समर्थन केले, त्यानंतर काँग्रेसचे कोटा जिल्ह्यातील सांगोद मतदारसंघातील आमदार भरत सिंह यांनी पत्र लिहिलं आहे

ठळक मुद्देआपल्या सगळ्यांना पक्षाच्या धोरणांपलीकडे जाऊन योग्य विचारांवर बोललं पाहिजेतुम्ही जे पक्षाच्या पलीकडे जाऊन धाडसी विधान केले त्याबद्दल धन्यवादकाँग्रेस आमदार भरत सिंह यांचे भाजपाचे ज्येष्ठ नेते कैलास मेघवाल यांना पत्र

कोटा – राजस्थानमध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षात विरोध आणि समर्थनाची रस्सीखेच सुरु आहे. यात माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपा नेते कैलाश मेघवाल यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना यांच्या सरकारचं समर्थन करत सरकार पाडण्याचं षडयंत्रावरुन भाष्य केले आहे. त्याचसोबत घोडेबाजार योग्य नाही सांगत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे समर्थन केले आहे. यानंतर भाजपात राजकीय वातावरण पेटलं आहे.

माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपाचे वरिष्ठ नेते कैलाश मेघवाल यांनी शनिवारी काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे समर्थन केले, त्यानंतर काँग्रेसचे कोटा जिल्ह्यातील सांगोद मतदारसंघातील आमदार भरत सिंह यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात भरत सिंह यांनी कैलास मेघवाल यांचे धन्यवाद मानले आहेत. माहितीनुसार भरत सिंह यांनी कैलास मेघवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, तुम्ही विधानसभेचे ज्येष्ठ आमदार आहात. त्याचसोबत विधानसभेचे माजी अध्यक्षही राहिले आहात. भाजपाचे सध्याचे आमदार आहात, तुम्ही भाजपा काँग्रेस सरकार पाडत असल्याबाबत विधान करुन त्याचा निषेध केला. लोकशाहीत राजकीय व्यवस्थेतील या पडत्या व्यवस्थेवर धाडसी विधान केले आहे. आपल्या सगळ्यांना पक्षाच्या धोरणांपलीकडे जाऊन योग्य विचारांवर बोललं पाहिजे, अन्यथा जनतेचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास संपेल, ते लोकशाहीसाठी घातक आहे असं ते म्हणाले.

काय म्हणाले होते कैलास मेघवाल?

ज्याप्रकारे गेल्या २ महिन्यापासून सरकार कोसळण्याचं वातावरण बनलं आहे, घोडेबाजार होत आहे, आरोप-प्रत्यारोप होत आहेत ते दुर्दैवी आहे. भाजपा कधी अशा लोकांची मदत करणार नाही. स्वातंत्र्यानंतर राजस्थानमध्ये अनेक सरकारे बदलली, विधानसभेच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेकदा वाद-विवाद झाले. पण सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाशी मिळून सरकार पाडण्याचं षडयंत्र जे आज होत आहे ते कधीच झालं नाही.

राजस्थानमध्ये काय सुरु आहे?

राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील तणाव वाढल्याने काँग्रेस सरकारवर संकट निर्माण झालं, पक्षविरोधी कारवाया केल्यानं सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं. सचिन पायलट यांनी अशोक गहलोत यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत काँग्रेसमध्ये बंडखोरी केली, त्यानंतर आपल्याला ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला, मात्र मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आमदारांचे शक्तीप्रदर्शन करत त्यांना दावा खोडून काढला. राजस्थानमध्ये काँग्रेसचे १०७ आमदार आहेत, तर इतर काही अपक्षांचा पाठिंबा आहे, काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपा षडयंत्र रचत आहे असा आरोप मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला होता, तर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी असून भाजपाने आरोप फेटाळले होते. सचिन पायलट यांनी मी कोणत्याही भाजपा नेत्यांच्या संपर्कात नसून मी भाजपात प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केले होते, पण अद्याप सचिन पायलट यांनी पुढची भूमिका जाहीर केली नाही, त्यामुळे अद्यापही राजस्थानमधील सत्तासंघर्षनाट्य सुरुच आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा मुख्यमंत्री अशोक गहलोत करणार ‘The END’?

रायगडावरील हत्ती तलाव १५० वर्षांनी भरला; छत्रपती संभाजीराजेंनी जलपूजन केलं अन् म्हणाले...

विश्व हिंदू सेनेचं आंदोलन की स्टटंबाजी?; नेपाळी सांगून ज्या युवकाचं मुंडन केलं, तो तर...

नववधू कोरोना पॉझिटिव्ह निघाली; कुटुंबातील ९ जण बाधित तर ८६ जणांना क्वारंटाईन केलं

वैद्यकीय चमत्कार! १३० दिवसांनी महिलेला मिळालं जीवदान; नर्स अन् डॉक्टरांचे मानले आभार

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा