शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Rajasthan Political Crisis: राजस्थानात काँग्रेसचाच 'आवाssज'; अशोक गहलोत सरकारने 'विश्वास' जिंकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 16:37 IST

आजपासून सुरु झालेल्या राजस्थान विधानसभेत भाजपाने काँग्रेस सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला होता

ठळक मुद्देराजस्थानातील राजकीय सत्तासंघर्ष संपुष्टात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मारली बाजी विश्वासदर्शव ठराव जिंकून काँग्रेसने भाजपाला फटकारलं

जयपूर – गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थानात सुरु असलेल्या सत्तासंघर्ष नाट्यावर पडदा पडलेला आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि समर्थकांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात बंड पुकारलं होतं. त्यानंतर राजस्थानात काँग्रेस सरकारवर टांगती तलवार होती. सचिन पायलट यांची काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली होती.

आजपासून सुरु झालेल्या राजस्थान विधानसभेत भाजपाने काँग्रेस सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला होता. मात्र मुख्यमंत्री अशोक गहलोत(Ashok Gehlot) यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकत भाजपाला जोरदार झटका दिला आहे. जवळपास महिनाभर चाललेल्या राजकीय अनिश्चिततेनंतर पक्षश्रेष्ठींनी सचिन पायलट यांची समजूत काढल्याने राजस्थानमधील राजकीय नाट्य संपुष्टात आले होते. मात्र राजस्थानमध्ये सारे आलबेल झाले असे वाटत असतानाच भाजपाने खेळलेल्या एका चालीमुळे राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आला होता. राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता. मात्र सरकारविरोधातील अविश्वास ठराव भाजपा हरलं आहे.

राजस्थानमधील राजकीय संघर्ष

मुख्य विरोधी पक्ष भाजपाने सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या घोषणा केली होती. विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याच्या फक्त एक दिवस आधी सत्ताधारी कॉंग्रेसचे आमदार आणि मित्रपक्षांची बैठक झाली, भाजपा आणि तेथील घटक पक्षांचीही बैठक झाली होती. दरम्यान, कॉंग्रेसने आपले दोन आमदार विश्वेंद्रसिंग आणि भंवरलाल शर्मा यांचे निलंबन रद्द केले होते. गुरुवारच्या दिवशीचा सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची भेट झाली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन नेत्यांनी जवळपास एक महिन्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले होते. गहलोत आणि पायलट यांच्यासमवेत कॉंग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे प्रदेश प्रभारी अविनाश पांडे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा हे होते. यानंतर कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक मुख्यमंत्री निवासस्थानी झाली होती, त्यात गहलोत, पायलट तसेच कॉंग्रेस व त्यांचे समर्थक आमदारही हजर होते.

सचिन पायलटांचं बंड थंड करण्यात काँग्रेसला यश

'मी कधीही कुठल्याही पदाबाबत बोललो नाही. मी कुठल्याही पदाची मागणी केली नव्हती. मात्र आत्मसन्मानासाठी ही लढाई सुरू होती. माझ्या मनात कुठल्याही व्यक्तीबाबत द्वेषभावना नाही. आता पक्ष मला जी जबाबदारी देईल, ती मी सांभाळेन, असं सांगत सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण थंड केले. तसेच आधी काय झालं आणि पुढे काय होईल, याबाबत मी काही सांगू शकत नाही. माझ्यासाठी काही अशा शब्दांचा वापर केला गेला. ज्यामुळे मला वाईट वाटले. मात्र मी हा कडवट घोट प्राशन केला आहे. राजकारणामध्ये शब्दांचा जपून वापर केले गेला पाहिजे. कारण जनता आपले म्हणणे ऐकत असते. जेव्हा मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. तेव्हा माझ्यात सगळे गुण होते. मात्र आता मी निरुपयोगी झालोय, अशा शब्दात पायलट यांनी त्यांच्याविरोधातील वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.

अशोक गहलोत ठरले किंग

सचिन पायलट यांच्या बंडाला मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही कडवं आव्हान दिलं होतं. पायलटांचे अनेक समर्थक पुन्हा घरवापसी करत असल्याने सचिन पायलट एकटे पडत होते. त्यानंतर पक्षश्रेष्ठींशी बोलून पायलटही घरवापसीवर तयार झाले. या सर्वात महत्त्वाची भूमिका असणारे अशोक गहलोत राजस्थानात खऱ्याअर्थाने किंग ठरलेत. पायलट यांच्या घरवापसीनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले होते की, राजस्थानमध्ये जे घडले तो आता इतिहास झाला. तसेच पक्षात परत आलेल्यांच्या अडचणी दूर करु, त्याचप्रमाणे सीबीआय, ईडीचा गैरवापर करण्यात येत आहे. धर्माच्या नावाखाली राजकारण केले जात आहे. मात्र असं असलं तरी आमचं सरकार ५ वर्ष पूर्ण करेल आणि आम्ही पुढील निवडणूक देखील जिंकू, असा दावा अशोक गहलोत यांनी केला होता.

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपाAshok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलट