शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला आणखी धक्के बसणार?; विखे पाटलांसह चार आमदार पक्षाचा 'हात' सोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 18:55 IST

चारही आमदार भाजपामध्ये जाण्याची शक्यता

मुंबई: लोकसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव पत्कराव्या लागणाऱ्या काँग्रेसला आणखी धक्के बसण्याची शक्यता आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह चार आमदार पक्षाचा 'हात' सोडणार असल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे. यामध्ये अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, नितेश राणेंचा समावेश आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात केवळ एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला आणखी धक्के बसणार आहेत. चार आमदारांनी पक्षाला रामराम केल्यास काँग्रेसला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद गमवावं लागू शकतं. लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीमुळे पक्षातील वरिष्ठ नेते राजीनामे देऊ लागले आहेत. देशातील 13 वरिष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधींकडे राजीनामे पाठवले आहेत. यामध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे. यानंतर आता काँग्रेसचे चार आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत. यात विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषवलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांचा समावेश आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटवर निवडूनदेखील आले आहेत.औरंगाबादचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सत्तार लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होते. मात्र पक्षानं त्यांना तिकीट दिलं नव्हतं. जूनमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसेल, असा इशारा त्यांनी एका व्हिडीओतून दिला आहे. तर मुंबईतील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावून पक्ष सोडणार असल्याचे संकेत दिले होते. ते लवकरच काँग्रेसला रामराम करुन भाजपात प्रवेश करू शकतात. तर नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणेदेखील भाजपात जाऊ शकतात. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष असलेल्या नारायण राणेंना भाजपानं राज्यसभेवर पाठवलं आहे. यासोबतच माणचे आमदार जयकुमार गोरेदेखील काँग्रेसला हात दाखवून हातात कमळ धरू शकतात. 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलKalidas Kolambkarकालीदास कोळंबकरJaykumar Goreजयकुमार गोरेAbdul Sattarअब्दुल सत्तारcongressकाँग्रेसBJPभाजपा