शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

काँग्रेसला आणखी धक्के बसणार?; विखे पाटलांसह चार आमदार पक्षाचा 'हात' सोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 18:55 IST

चारही आमदार भाजपामध्ये जाण्याची शक्यता

मुंबई: लोकसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव पत्कराव्या लागणाऱ्या काँग्रेसला आणखी धक्के बसण्याची शक्यता आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह चार आमदार पक्षाचा 'हात' सोडणार असल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे. यामध्ये अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, नितेश राणेंचा समावेश आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात केवळ एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला आणखी धक्के बसणार आहेत. चार आमदारांनी पक्षाला रामराम केल्यास काँग्रेसला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद गमवावं लागू शकतं. लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीमुळे पक्षातील वरिष्ठ नेते राजीनामे देऊ लागले आहेत. देशातील 13 वरिष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधींकडे राजीनामे पाठवले आहेत. यामध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे. यानंतर आता काँग्रेसचे चार आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत. यात विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषवलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांचा समावेश आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटवर निवडूनदेखील आले आहेत.औरंगाबादचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सत्तार लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होते. मात्र पक्षानं त्यांना तिकीट दिलं नव्हतं. जूनमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसेल, असा इशारा त्यांनी एका व्हिडीओतून दिला आहे. तर मुंबईतील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावून पक्ष सोडणार असल्याचे संकेत दिले होते. ते लवकरच काँग्रेसला रामराम करुन भाजपात प्रवेश करू शकतात. तर नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणेदेखील भाजपात जाऊ शकतात. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष असलेल्या नारायण राणेंना भाजपानं राज्यसभेवर पाठवलं आहे. यासोबतच माणचे आमदार जयकुमार गोरेदेखील काँग्रेसला हात दाखवून हातात कमळ धरू शकतात. 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलKalidas Kolambkarकालीदास कोळंबकरJaykumar Goreजयकुमार गोरेAbdul Sattarअब्दुल सत्तारcongressकाँग्रेसBJPभाजपा