शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुणेरी मिसळ - ‘माहेरवाशिणीं’ची चैत्रगौर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 20:00 IST

बारामतीच्या सुप्रिया सुळे आणि दौंडच्या कांचन कुल यांच्यात चुरशीची लढत होत आहे..

चैत्र सुरू झालाय. चैत्राच्या तिसऱ्या दिवसापासून अक्षयतृतीयेपर्यंत चैत्रगौर उत्सव सुरू होतो. हा खरं तर माहेरवाशिणींचा कौतुक सोहळा असतो. या काळात मंगळवारी, शुक्रवारी गौरीपूजनानंतर हळदी-कुंकू सोहळा आयोजित केला जातो. सध्या दोन माहेरवाशिणी बारामती मतदारसंघ गाजवत आहेत. प्रचार करताना बारामतीच्या आत्याबाई दौऱ्यावर आलेल्या दौंडच्या सासुरवाशीण भाचीला चैत्रगौरीच्या हळदी-कुंकू सोहळ्यात एका कार्यकर्तीच्या घरी भेटल्या. हा सुगावा लागल्यानं आम्ही तिथं पोहोचलो. त्या वेळचा संवाद खास आमच्या चाणाक्ष वाचकांसाठी... अशा बातम्या तुम्हाला आमच्याकडेच वाचायला मिळतील.(दोघीही हा हळदी-कुंकू सोहळा मोठ्या प्रेमानं करतात आणि बोलू लागतात...) बारामतीच्या ताई : घाम किती आलाय तुला. दमलीस काय इतक्यात? बराच पल्ला गाठायचाय. तुम्ही नव्या पोरी लवकर दमता. हे घे पन्हं. कूल वाटेल लगेच. दौंडच्या ताई : दमायला काय झालंय आत्याबाई? अहो, बाहेर वातावरण किती तापलंय पहा. त्यामुळं घाम आलाय. पण कसं ‘कुल’ व्हायचं हे समजतं आम्हाला.

बारामतीच्या ताई : हो ग हो. खूपच तापलंय वातावरण. पण मला सवय आहे. मी फिरतच असते. गेली दहा वर्षे हा मतदारसंघ पालथा घातलाय मी. तू नवीन आहेस अजून.दौंडच्या ताई : हो तुमचे ‘सेल्फी’ पाहायचे मी. खड्ड्यांसोबतचे तुमचे ‘सेल्फी’ मला फार आवडले आत्याबाई. त्यानिमित्ताने या मतदारसंघातील न सुटलेल्या बºयाच समस्या समजल्या.

बारामतीच्या ताई (विषय बदलतात) : एवढ्या गडबडीत तू आलीस,  हा मणि‘कांचन’ योगच म्हणायचा. शेवटी तू आमचीच. बारामतीचीच. भल्या-भल्यांच्या तोंडचं पाणी पळवतो आपण.  दौंडच्या ताई (उसळून) : आपण नाही; तुम्ही पाणी पळवता. आम्ही दौंडवाले तुमच्याकडे पाणी पाठवतो. बाकी नातं आपल्या ठिकाणी आहेच. पण राजकारणात आपलं जमायचं नाही.बारामतीच्या ताई : एवढं एक्साईट व्हायचं नाही बाई. अग, आमच्याकडून काही शिकलीस की नाही? सासरचे काय म्हणतील? कारण काही असलं तरी चिडायचं नाही. मला बघ, तुझ्या आजोबांना बघ. माझे ‘सेल्फी’ पाहिलेस; कामांचीही माहिती घे. शेवटी काम बोलतं बघ.

दौंडच्या ताई : माफ करा आत्याबाई. लहान तोंडी मोठा घास. पण आपल्याकडे बरीच कामं अजून व्हायचीत. ठराविक भागाचाच विकास झालाय. बारामतीच्या ताई : खिरापत घे खिरापत. (कार्यकर्तीकडून चैत्रगौरीची वाटलेली डाळ, बत्तासे, खिरापत देतात) ही घे खिरापत. असा खिरापतीप्रमाणे या भागात विकासकामांसाठी पैसा वाटलाय मी.सर्वदूर विकास केलाय मी. नुसते आश्वासनांचे बत्तासे नाही वाटले. 

दौंडच्या ताई : मग ‘त्या’ चाळीस गावांच्या गावकºयांना पाण्याविना डोळ्यांतून पाणी गाळावं लागलं नसतं. मागच्या वेळी आमच्या नेत्यांनीच इथल्या लढाईत ‘जान’ आणली होती. पण ‘कपबशी’नं घोळ केला. आमचे सगळे नेते म्हणतच आहेत, की इतिहास घडवण्याची यंदा संधी मलाच आहे.बारामतीच्या ताई : (छद्मीपणे) भले भले थकलेत. तूच राजकारणातून ‘इतिहासजमा’ नको व्हायला. बघ हं. काळजी घे. (दोघींना पाहून तिथं जमलेल्या बायका म्हणू लागल्या...)

गौराई आल्या... गौराई आल्या... कोणत्या पावलानं...हळदी-कुंकवाच्या, हिऱ्या -माणकाच्या...

...रुणझुणत्या पाखरा, जा माझ्या माहेरा...आल्या गौराई अंगणी त्यांना लिंबलोण करा..................... 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbaramati-pcबारामती