शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने..."; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, मोदींनाही सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 17:52 IST

Prithviraj Chavan Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीत मराठा-ओबीसी संघर्ष एक महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे. याबद्दल बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला. 

Prithviraj Chavan Maharashtra Vidhan Sabha 2024: मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदींना माझा सवाल आहे की, तुम्ही संविधान पूर्णपणे मान्य करून जाहीरपणे मनुस्मृती जाळणार आहात का?, असा सवाल करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. मराठा-ओबीसी संघर्षाबद्दल बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.  

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांची लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव आणि लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी विशेष मुलाखत घेतली. 

लोकसभेतील यश मिळाल्यानंतर काँग्रेसने रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जायला हवं होतं. काँग्रेस दिसली नाही? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आला होता. 

उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "लोकांचे प्रश्न अनेक आहेत. विशेषतः कृषी मालांच्या किंमतींचा विषय आहे. प्रश्न अनेक आहेत. लोक आपापल्या पातळीवर मांडताहेत. स्थानिक पातळीवर मांडताहेत. राज्यव्यापी आंदोलन करायला पाहिजे होतं की, नव्हतं, तो प्रश्न आहे. आता सगळेजण जागावाटपाच्या चर्चेत गुंतललेले आहेत."

लोकसभेला असलेले मुद्दे सुटले का? चव्हाणांचा सवाल

याच प्रश्नावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "मला वाटतं की, लोकसभेची निवडणूक पाच मुद्द्यांवर लढवली. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार आणि संविधान वाचवा, हे पाच मुद्दे होते. कुठला मुद्दा सुटलाय? सगळे मुद्दे अस्तित्वात आहेत. आता ही विधानसभेची निवडणूक आहे, लोकसभेची नाही; मग तुमचा संविधान बदलाचा मुद्दा कुठे आला, अशी मांडणी होतेय."

पंतप्रधान मोदी-मोहन भागवतांना पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

"याला आमचं उत्तर असं आहे की, ही मानसिकता आहे. ही विचारधारा आहे. तुम्हाला जरा दगडाखालचा हात निसटला, जरा तुम्हाला लोकसभेत चांगलं बहुमत मिळालं, तुम्ही हे करणार आहात? तुम्ही (भाजपा) जाहीरपणे मनुस्मृतीचा निषेध करता का? तुम्ही जाहीरपणे मनुस्मृतीचं दहन करता का? माझं भागवतांना, मोदींना सवाल आहे की, तुम्ही सांगता का की, राज्यघटना ही समता, न्याय, बंधुत्वावर आधारित आहे. ही आम्हाला पूर्णपणे मान्य आहे आणि जे काही मनुस्मृतीच्या नावाखाली चाललं होतं, ती चुकीची आहे आणि आम्ही तिचं दहन करतो, असं तुम्ही म्हणणार आहात का?", असे आव्हान पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाला दिले. 

फडणवीसांनी मराठा-ओबीसींमध्ये फूट पाडली -चव्हाण

"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने मराठा आणि ओबीसींमध्ये उभी फूट टाकलेली आहे. जी महाराष्ट्रात कधी नव्हती. शाहू महाराजांनी धनगर समाजात घरचा विवाह केला. कारण ते क्षत्रिय आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं. तुम्ही ओबीसी आणि मराठ्यांमध्ये फूट टाकली. तु्म्ही दलितांमध्ये बौद्ध दलित आणि हिंदू दलित फूट टाकली. तुम्ही ठिकठिकाणी अशी फूट टाकण्याचा प्रयत्न करताय. जास्तीत जास्त माणसं उभी करून मतं कशी विभाजित होतील, हे करताय. लोकसभेला आम्ही जिंकलो, याचं मोठं कारण होतं की, मोदींच्या विरोधातील मतांची विभागणी झाली नाही", असा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाmarathaमराठाOBCअन्य मागासवर्गीय जाती