शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने..."; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, मोदींनाही सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 17:52 IST

Prithviraj Chavan Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीत मराठा-ओबीसी संघर्ष एक महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे. याबद्दल बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला. 

Prithviraj Chavan Maharashtra Vidhan Sabha 2024: मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदींना माझा सवाल आहे की, तुम्ही संविधान पूर्णपणे मान्य करून जाहीरपणे मनुस्मृती जाळणार आहात का?, असा सवाल करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. मराठा-ओबीसी संघर्षाबद्दल बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.  

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांची लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव आणि लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी विशेष मुलाखत घेतली. 

लोकसभेतील यश मिळाल्यानंतर काँग्रेसने रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जायला हवं होतं. काँग्रेस दिसली नाही? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आला होता. 

उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "लोकांचे प्रश्न अनेक आहेत. विशेषतः कृषी मालांच्या किंमतींचा विषय आहे. प्रश्न अनेक आहेत. लोक आपापल्या पातळीवर मांडताहेत. स्थानिक पातळीवर मांडताहेत. राज्यव्यापी आंदोलन करायला पाहिजे होतं की, नव्हतं, तो प्रश्न आहे. आता सगळेजण जागावाटपाच्या चर्चेत गुंतललेले आहेत."

लोकसभेला असलेले मुद्दे सुटले का? चव्हाणांचा सवाल

याच प्रश्नावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "मला वाटतं की, लोकसभेची निवडणूक पाच मुद्द्यांवर लढवली. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार आणि संविधान वाचवा, हे पाच मुद्दे होते. कुठला मुद्दा सुटलाय? सगळे मुद्दे अस्तित्वात आहेत. आता ही विधानसभेची निवडणूक आहे, लोकसभेची नाही; मग तुमचा संविधान बदलाचा मुद्दा कुठे आला, अशी मांडणी होतेय."

पंतप्रधान मोदी-मोहन भागवतांना पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

"याला आमचं उत्तर असं आहे की, ही मानसिकता आहे. ही विचारधारा आहे. तुम्हाला जरा दगडाखालचा हात निसटला, जरा तुम्हाला लोकसभेत चांगलं बहुमत मिळालं, तुम्ही हे करणार आहात? तुम्ही (भाजपा) जाहीरपणे मनुस्मृतीचा निषेध करता का? तुम्ही जाहीरपणे मनुस्मृतीचं दहन करता का? माझं भागवतांना, मोदींना सवाल आहे की, तुम्ही सांगता का की, राज्यघटना ही समता, न्याय, बंधुत्वावर आधारित आहे. ही आम्हाला पूर्णपणे मान्य आहे आणि जे काही मनुस्मृतीच्या नावाखाली चाललं होतं, ती चुकीची आहे आणि आम्ही तिचं दहन करतो, असं तुम्ही म्हणणार आहात का?", असे आव्हान पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाला दिले. 

फडणवीसांनी मराठा-ओबीसींमध्ये फूट पाडली -चव्हाण

"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने मराठा आणि ओबीसींमध्ये उभी फूट टाकलेली आहे. जी महाराष्ट्रात कधी नव्हती. शाहू महाराजांनी धनगर समाजात घरचा विवाह केला. कारण ते क्षत्रिय आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं. तुम्ही ओबीसी आणि मराठ्यांमध्ये फूट टाकली. तु्म्ही दलितांमध्ये बौद्ध दलित आणि हिंदू दलित फूट टाकली. तुम्ही ठिकठिकाणी अशी फूट टाकण्याचा प्रयत्न करताय. जास्तीत जास्त माणसं उभी करून मतं कशी विभाजित होतील, हे करताय. लोकसभेला आम्ही जिंकलो, याचं मोठं कारण होतं की, मोदींच्या विरोधातील मतांची विभागणी झाली नाही", असा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाmarathaमराठाOBCअन्य मागासवर्गीय जाती