शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

२०१४ मध्ये झाला तसा धोका होऊ नये म्हणून स्वबळाची तयारी : नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 07:23 IST

Nana Patole : पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी दिल्याचा दावा.

ठळक मुद्देपक्ष मजबूत करण्याची जबाबदारी दिल्याचा दावा

२०१४ मध्ये जसा मोठा धोका झाला तसा पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही स्वबळाची तयारी करत आहोत असे विधान करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आणखी एक नवा वाद तयार केला आहे. हायकमांडने मला पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी दिली आहे. ती मी पार पाडत आहे. मी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विरोधात काहीही बोलत नाही. मी भाजपविरोधी बोलतो. भाजपच्या नीतीवर प्रहार करतो, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला नाना पटोले का गेले नाहीत? असा प्रश्न महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारला असता, त्यांची पूर्वनियोजित बैठक असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, असे उत्तर त्यांनी दिले होते. मात्र पटोले यांनी,  पवार यांच्या भेटीचे आमंत्रण नव्हते, त्यामुळे आपण गेलो नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेसचा अंतर्गत विसंवादही समोर आला आहे. काँग्रेसचे नेते महाविकास आघाडी सरकारमधील विसंवाद कमी करण्याचा प्रयत्न करत असले तरी, पटोले यांच्या विधानामुळे नवीन वाद तयार होत आहेत. 

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१४ मध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली. कालच्या बैठकीत शरद पवार यांनी काँग्रेसची तयारी काय आहे अशी विचारणा केली होती. तेव्हा २०१४ सारखी परिस्थिती झाल्यास तयारी असावी म्हणून आणि स्वबळाचे नियोजन करत आहोत, असे उत्तर दिल्याचे पटोले म्हणाले. वेळ आली तर मी स्वतः शरद पवार यांना भेटेन. मात्र आता तशी वेळ आलेली नाही. शरद पवार सरकारचे रिमोट कंट्रोल आहेत. ते आमच्यासाठी आदरणीय नेते आहेत, असे ते म्हणाले. 

राज्यपालांना भेटणारमहागाईतून जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकार इंधनाचे दर दररोज वाढवत आहे. आजही सीएनजी व पाईप गॅसचे दर वाढवून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. याच्या निषेधात काँग्रेस आंदोलन करत आहे. गुरुवारी आम्ही राज्यपालांना भेटून निवेदन  देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी