शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

Maharashtra Politics: मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; शिवसेनेचा भाजपाला गंभीर इशारा

By प्रविण मरगळे | Updated: February 24, 2021 10:48 IST

Shiv Sena Sanjay Raut Target BJP: महाराष्ट्रात शिवसेना आहे, त्यामुळे नुसती उठाठेव करू नये, जे पेराल तेच उगवेल याचं भान ठेवावं असं त्यांनी बजावलं आहे,

ठळक मुद्देदिल्लीत जे लोक बसले आहेत, ते सत्ता आणि पैशाचा जो गैरवापर करत आहेत ते देशासाठी योग्य नाहीलोकशाही नसेल तर देश नसेल आणि देश नसला तर देशी ईस्ट इंडिया कंपनी बनेलशिवसेना घटक पक्षांनासोबत महाविकास आघाडीचं सरकार चालवत आहे,

मुंबई – काही दिवसांपूर्वी पुडुचेरीमध्ये काँग्रेसला(Congress) मोठा धक्का बसला, याठिकाणी पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं, त्यानंतर पुडुचेरीमधील काँग्रेस सरकार कोसळलं, मात्र या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा सुरु आहे, या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपाला(BJP) गंभीर इशारा दिला आहे.(Shivsena Sanjay Raut Statements on BJP Opertation Lotus)

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, पुडुचेरीसारखे(Puducherry) छोटे राज्यसुद्धा भाजपानं काँग्रेसकडून खेचून घेतलं, आता मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू करणार असल्याचं भाजपा पुढाऱ्यांनी जाहीर केलंय, महाराष्ट्र आणि पुडुचेरीमध्ये फरक आहे,  याठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आहेत, येथे शिवसेना(Shivsena) घटक पक्षांनासोबत महाविकास आघाडीचं सरकार चालवत आहे, महाराष्ट्रात शिवसेना आहे, त्यामुळे नुसती उठाठेव करू नये, जे पेराल तेच उगवेल याचं भान ठेवावं असं त्यांनी बजावलं आहे,

तसेच दिल्लीत जे लोक बसले आहेत, ते सत्ता आणि पैशाचा जो गैरवापर करत आहेत ते देशासाठी योग्य नाही, देशात विरोधी पक्ष नसेल तर लोकशाही नाही, आणि लोकशाही नसेल तर देश नसेल आणि देश नसला तर देशी ईस्ट इंडिया कंपनी बनेल अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे.

आपला माणूस असला तरी कारवाई करतील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीत काय झालं? हे माहिती नाही, पोहरादेवी गडावर जी गर्दी झाली, नियमांचे उल्लंघन झालं त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात कारवाई करण्याचे आदेश दिलेत, आपला माणूस असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडणार नाही, मुख्यमंत्री कायदा आणि सुव्यवस्थेबाबत खूपच कठोर आहेत. कायदा आपला काम करेल, संजय राठोडबाबत जे काही वक्तव्य आहे ते राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करू शकतात असं सांगत संजय राठोड प्रकरणात जास्त भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्याचसोबत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र नेहमी होत असतं, परंतु आम्हीदेखील सक्षम आहोत, त्यांना टक्कर द्यायला असंही राऊतांनी म्हटलं आहे.   

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत