शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Maharashtra Politics: मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; शिवसेनेचा भाजपाला गंभीर इशारा

By प्रविण मरगळे | Updated: February 24, 2021 10:48 IST

Shiv Sena Sanjay Raut Target BJP: महाराष्ट्रात शिवसेना आहे, त्यामुळे नुसती उठाठेव करू नये, जे पेराल तेच उगवेल याचं भान ठेवावं असं त्यांनी बजावलं आहे,

ठळक मुद्देदिल्लीत जे लोक बसले आहेत, ते सत्ता आणि पैशाचा जो गैरवापर करत आहेत ते देशासाठी योग्य नाहीलोकशाही नसेल तर देश नसेल आणि देश नसला तर देशी ईस्ट इंडिया कंपनी बनेलशिवसेना घटक पक्षांनासोबत महाविकास आघाडीचं सरकार चालवत आहे,

मुंबई – काही दिवसांपूर्वी पुडुचेरीमध्ये काँग्रेसला(Congress) मोठा धक्का बसला, याठिकाणी पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं, त्यानंतर पुडुचेरीमधील काँग्रेस सरकार कोसळलं, मात्र या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा सुरु आहे, या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपाला(BJP) गंभीर इशारा दिला आहे.(Shivsena Sanjay Raut Statements on BJP Opertation Lotus)

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, पुडुचेरीसारखे(Puducherry) छोटे राज्यसुद्धा भाजपानं काँग्रेसकडून खेचून घेतलं, आता मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू करणार असल्याचं भाजपा पुढाऱ्यांनी जाहीर केलंय, महाराष्ट्र आणि पुडुचेरीमध्ये फरक आहे,  याठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आहेत, येथे शिवसेना(Shivsena) घटक पक्षांनासोबत महाविकास आघाडीचं सरकार चालवत आहे, महाराष्ट्रात शिवसेना आहे, त्यामुळे नुसती उठाठेव करू नये, जे पेराल तेच उगवेल याचं भान ठेवावं असं त्यांनी बजावलं आहे,

तसेच दिल्लीत जे लोक बसले आहेत, ते सत्ता आणि पैशाचा जो गैरवापर करत आहेत ते देशासाठी योग्य नाही, देशात विरोधी पक्ष नसेल तर लोकशाही नाही, आणि लोकशाही नसेल तर देश नसेल आणि देश नसला तर देशी ईस्ट इंडिया कंपनी बनेल अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे.

आपला माणूस असला तरी कारवाई करतील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीत काय झालं? हे माहिती नाही, पोहरादेवी गडावर जी गर्दी झाली, नियमांचे उल्लंघन झालं त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात कारवाई करण्याचे आदेश दिलेत, आपला माणूस असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडणार नाही, मुख्यमंत्री कायदा आणि सुव्यवस्थेबाबत खूपच कठोर आहेत. कायदा आपला काम करेल, संजय राठोडबाबत जे काही वक्तव्य आहे ते राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करू शकतात असं सांगत संजय राठोड प्रकरणात जास्त भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्याचसोबत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र नेहमी होत असतं, परंतु आम्हीदेखील सक्षम आहोत, त्यांना टक्कर द्यायला असंही राऊतांनी म्हटलं आहे.   

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत