शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Maharashtra Politics: मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; शिवसेनेचा भाजपाला गंभीर इशारा

By प्रविण मरगळे | Updated: February 24, 2021 10:48 IST

Shiv Sena Sanjay Raut Target BJP: महाराष्ट्रात शिवसेना आहे, त्यामुळे नुसती उठाठेव करू नये, जे पेराल तेच उगवेल याचं भान ठेवावं असं त्यांनी बजावलं आहे,

ठळक मुद्देदिल्लीत जे लोक बसले आहेत, ते सत्ता आणि पैशाचा जो गैरवापर करत आहेत ते देशासाठी योग्य नाहीलोकशाही नसेल तर देश नसेल आणि देश नसला तर देशी ईस्ट इंडिया कंपनी बनेलशिवसेना घटक पक्षांनासोबत महाविकास आघाडीचं सरकार चालवत आहे,

मुंबई – काही दिवसांपूर्वी पुडुचेरीमध्ये काँग्रेसला(Congress) मोठा धक्का बसला, याठिकाणी पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं, त्यानंतर पुडुचेरीमधील काँग्रेस सरकार कोसळलं, मात्र या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा सुरु आहे, या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपाला(BJP) गंभीर इशारा दिला आहे.(Shivsena Sanjay Raut Statements on BJP Opertation Lotus)

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, पुडुचेरीसारखे(Puducherry) छोटे राज्यसुद्धा भाजपानं काँग्रेसकडून खेचून घेतलं, आता मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू करणार असल्याचं भाजपा पुढाऱ्यांनी जाहीर केलंय, महाराष्ट्र आणि पुडुचेरीमध्ये फरक आहे,  याठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आहेत, येथे शिवसेना(Shivsena) घटक पक्षांनासोबत महाविकास आघाडीचं सरकार चालवत आहे, महाराष्ट्रात शिवसेना आहे, त्यामुळे नुसती उठाठेव करू नये, जे पेराल तेच उगवेल याचं भान ठेवावं असं त्यांनी बजावलं आहे,

तसेच दिल्लीत जे लोक बसले आहेत, ते सत्ता आणि पैशाचा जो गैरवापर करत आहेत ते देशासाठी योग्य नाही, देशात विरोधी पक्ष नसेल तर लोकशाही नाही, आणि लोकशाही नसेल तर देश नसेल आणि देश नसला तर देशी ईस्ट इंडिया कंपनी बनेल अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे.

आपला माणूस असला तरी कारवाई करतील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीत काय झालं? हे माहिती नाही, पोहरादेवी गडावर जी गर्दी झाली, नियमांचे उल्लंघन झालं त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात कारवाई करण्याचे आदेश दिलेत, आपला माणूस असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडणार नाही, मुख्यमंत्री कायदा आणि सुव्यवस्थेबाबत खूपच कठोर आहेत. कायदा आपला काम करेल, संजय राठोडबाबत जे काही वक्तव्य आहे ते राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करू शकतात असं सांगत संजय राठोड प्रकरणात जास्त भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्याचसोबत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र नेहमी होत असतं, परंतु आम्हीदेखील सक्षम आहोत, त्यांना टक्कर द्यायला असंही राऊतांनी म्हटलं आहे.   

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत