शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

"पवार साहेब, दारूवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच, पण...", अनिल बोंडेची पत्राद्वारे शरद पवारांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 13:39 IST

Anil Bonde : अनिल बोंडे यांनी शरद पवारांना लिहिले हे पत्र सध्या सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहे.

ठळक मुद्देमजुरी नाही, रोजगार नाही. रोजच्या खाण्यापिण्याचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे गोरगरिबांचे वीज बिल माफ करण्यासाठी पत्र लिहा, अशी विनंती अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना पत्राद्वारे केली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील परवानाधारक हॉटेल व बार मालकांना करसवलत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. यावरून माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शरद पवारांना पत्र लिहिले आहे. "पवार साहेब मुख्यमंत्री फक्त तुमचेच ऐकतात. दारूवाल्यांसाठी तुम्ही कळकळीने पत्र लिहिले. दारूवाले तुम्हाला त्यांचे आशीर्वाद देतीलच, किंबहुना दारूवाल्यांच्या आशिर्वादांवरच तुमची मदार असेल, परंतु महाराष्ट्रातील 150 लाख शेतकरी कुटुंब सारे अडचणीत आहे. शेतमजूर सुद्धा सरकारकडे आशेने बघत आहे. बारा बालुतेदारांनाही जगण्यासाठी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे. यासर्व शेतकरी, शेतमजूर व बारा बलुतेदारांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा", अशी विनंती अनिल बोंडे यांनी शरद पवारांना पत्राद्वारे केली आहे. अनिल बोंडे यांनी शरद पवारांना लिहिले हे पत्र सध्या सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहे. (Former Minister Dr Anil Bonde Writes Open Letter To NCP Chief Sharad Pawar)

अनिल बोंडे यांनी पत्रात म्हटले आहे की, "गावखेड्यातील शेतमजूर, वाजंत्रीवाले, नाभिकांसह सर्व बारा बलुतेदार आज आर्थिक संकटात आहेत. स्वतःचं कुटुंब पोसण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मायबाप सरकार पुन्हा लॉकडाऊन वाढवणार आहे. अशा वेळी या सर्वांना मदतीची गरज आहे. करोनाच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान मोदींनी सहा हजार रुपये टाकले. महाराष्ट्रातील अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक अशा ९४ लाख शेतकऱ्यांना त्यामुळं आधार मिळाला. पण, ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही टाकली नाही. ९४ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची माहिती ठाकरे सरकारकडे आहे. या खात्यांमध्ये त्यांनी सहा हजार रुपये टाकणे गरजेचे आहे. त्यासाठी  पवार साहेबांनी पत्र लिहावे."

("आता केवळ आत्महत्या करणे बाकी आहे", व्हेंटिलेटर चालू नसल्यामुळे भाजपा आमदाराचा संताप)

याचबरोबर, "कोरोनामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. धान्य, कांदा, भाजीपाला सुद्धा विकता येत नाही. अवकाळीची नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला आणि १० हजार रुपये हेक्टरवर बोळवण केली. अतिवृष्टीचे निकष लावून अवकाळीनं बाधित शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आलं. गेल्या दोन महिन्यांत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा अवकाळी पाऊस, वादळे झाली. शेतकऱ्यांचा कांदा, आंबा याचे अतोनात नुकसान झाले. परंतु सरकारनं साधी दाखलही घेतली नाही. या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा."

(भारतातील कोरोना व्हेरिएंटचा जगात हाहाकार! 44 देशांमध्ये प्रादुर्भाव असल्याचे WHO ने सांगितले)

"कोरोना काळातील घरगुती वीज बिल माफ करू. अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र, पहिली लाट ओसरताच महावितरणनं निर्दयीपणे सर्वसामान्यांचे वीज कनेक्शन कापण्यास सुरुवात केली. ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तोंडाला कुलूप लावले. आणि आता तर पुन्हा लॉकडाऊन लावला. मजुरी नाही, रोजगार नाही. रोजच्या खाण्यापिण्याचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे गोरगरिबांचे वीज बिल माफ करण्यासाठी पत्र लिहा", अशी विनंती अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAnil Bondeअनिल बोंडेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा