शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणावरील पार्थ पवारांची भूमिका राज्य सरकारविरोधी आहे का? खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

By प्रविण मरगळे | Updated: October 1, 2020 16:41 IST

NCP MP Supriya Sule Reaction On Parth Pawar, Maratha Reservation News: सर्व समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतंय असं त्या म्हणाल्या.

ठळक मुद्देमराठा आरक्षण असो वा धनगर, मुस्लीम आरक्षण असो या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मराठा आरक्षणाबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्याच चारही पक्षाच्या खासदारांनी हा प्रश्न एका मताने एका विचाराने संसदेत मांडलाएखादा व्यक्ती चांगल्या कामासाठी पुढाकार घेत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे

मुंबई – मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली, त्यानंतर राज्यभरात मराठा समाजाच्या संघटनांनी आंदोलन पुकारलं, यातच बीड जिल्ह्यातील एका तरुणाने आत्महत्या केल्याने यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारांनीही आता उडी घेतली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढील पाऊल उचलावे असं सांगत माझ्याकडे कोर्टात जाण्याशिवाय काही पर्याय नाही अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

या घटनेनंतर पार्थ पवार पुन्हा राज्य सरकारच्या विरोधात गेलेत का? अशीच चर्चा सुरु झाली आहे. पत्रकारांनी याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला, त्यावर त्या म्हणाल्या की, मराठा आरक्षण असो वा धनगर, मुस्लीम आरक्षण असो या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी, राष्ट्रवादी म्हणून आम्ही संसदेत करत असतो. मराठा आरक्षणाबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्याच चारही पक्षाच्या खासदारांनी हा प्रश्न एका मताने एका विचाराने संसदेत मांडला आहे. महाराष्ट्र सरकारही रोज त्याचा फॉलोअप घेऊन समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतायेत. धनगर समाजाची मागणी केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. धनगर समाजाला न्याय मिळाला यासाठी अनेक वर्ष मी हा मुद्दा लोकसभेत मांडतेय. सर्व समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतंय असं त्या म्हणाल्या.

त्याचसोबत  एखादा व्यक्ती चांगल्या कामासाठी पुढाकार घेत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, सरकारनेही मराठा समाजाबाबत पुढाकार घेतलाच आहे. त्यात काही गैर नाही असं सांगत सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांची पाठराखण केली आहे.

काय म्हणाले होते पार्थ पवार?

मराठा नेत्यांना जागं होण्याची, संघर्ष करण्याची गरज असल्याच पार्थ यांनी म्हटलंय. बीड तालुक्यातील केतूरा गावात १८ वर्षाच्या विवेक राहाडे या तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेतील मृत तरुणाचा फोटो आणि त्याने लिहिलेली चिठ्ठी शेअर करत, पार्थ पवार यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जागं होण्याचं आवाहन केलंय. विवेकने आपल्या मनात प्रज्वलित केलेली ज्योत संपूर्ण यंत्रणा पेटवू शकते. संपूर्ण पीढीचे भविष्य धोक्यात आले आहे. सध्यातरी, मराठा आरक्षणाच्या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. मी या पेटलेल्या मशालीला स्वत:च्या ह्रदयात स्थान देऊन विवेक आणि कोट्यवधी असहाय विवेक यांच्या न्यायासाठी दरवाजे ठोठावणार असल्याचे पार्थ यांनी म्हटले आहे. पार्थ यांनी आपल्या ट्विटर अकांऊंटवरुन सरकारलाही लक्ष्य केलंय.

पार्थ पवारांच्या भूमिकेवरून भाजपाचा ठाकरे सरकारला टोला

महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत आक्रमकपणे पुढे यावं, या पार्थ पवार यांच्या मागणीला महाविकास आघाडी गंभीरपणे दखल घेणार की कवडीची किंमत देणार? असा सवाल करत भाजपा आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकार आणि खासदार शरद पवार यांना टोला लगावला आहे.

टॅग्स :parth pawarपार्थ पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपा