शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

...तर आदरणीय शरद पवारांना जाब विचारायला हवा; काँग्रेस नेत्याचा थेट हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 08:32 IST

congress leader sanjay nirupam takes dig at ncp chief sharad pawar: काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा थेट शरद पवारांवर निशाणा; काँग्रेस नेत्यांनी ठोस भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त

मुंबई: मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात खळबळ माजली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझेंना (Sachin Vaze) दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी पत्रात केला आहे. त्यांच्या या पत्रामुळे राज्यात भूकंप झाला आहे. तर अनिल देशमुख यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत."आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता"परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. शरद पवार यांना या सगळ्याची कल्पना होती, असं परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केलं आहे. यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. 'परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास, त्यांचे दावे खरे असल्यास आदरणीय शरद पवारजींना जाब विचारायला हवा. कारण तेच महाराष्ट्र सरकारचे शिल्पकार आहेत. तथाकथित तिसरी आघाडी हेच करणार आहे का?', असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसनं या विषयात ठाम भूमिका घ्यायला हवी, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. मनसुख हिरेन यांची हत्या?; अनिल देशमुख यांच्या ट्विटमधील 'त्या' शब्दाने भुवया उंचावल्याशरद पवारांच्या 'त्या' विधानाचा निरुपम यांच्याकडून समाचारकेरळमधील काँग्रेस नेते पी. सी. चाको यांनी १० मार्चला पक्षाला रामराम केला. चारच दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी शरद पवारांनी तिसऱ्या आघाडीवर भाष्य केलं. देशाला तिसऱ्या आघाडीची गरज आहे. यासंदर्भात काही नेत्यांशी माझं बोलणं झालं आहे. सीपीआय एमचे प्रमुख सीताराम येचुरी यांनी याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आहे, असं पवार यांनी सांगितलं होतं. आता निरुपम यांनी तिसरी आघाडी हेच करणार आहे का, असा सवाल करत थेट पवारांना लक्ष्य केलं आहे.वाझे प्रकरण म्हणजे सरकार पुरस्कृत वसुली कांडसंजय निरुपम यांनी आधीही सचिन वाझे प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. 'या प्रकरणात आयुक्तांची चूक होती या गृहमंत्र्यांच्या विरोधाभासी विधानामुळे सरकारची प्रतिमा आणखी मलीन होईल. वाझे प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासातून हे सरकार पुरस्कृत हफ्ता वसुली कांड असल्याचं दिसून येतं. याचे धागेदोरे शिवसेनेपर्यंत जातात का?', असा प्रश्न निरुपम यांनी ट्विट करून उपस्थित केला होता.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुखSanjay Nirupamसंजय निरुपमSharad Pawarशरद पवारShiv Senaशिवसेना