शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाजपाच्या ‘मिशन रिपीट’ला विरोधकांचा सुरुंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 06:19 IST

अनेक युद्धांचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या हरियाणात निवडणुकांच्या रणदुदुंभी वाजू लागल्या आहेत.

- सुहास शेलारअंबाला : अनेक युद्धांचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या हरियाणात निवडणुकांच्या रणदुदुंभी वाजू लागल्या आहेत. २०१४ साली एकहाती सत्ता स्थापन केलेल्या भाजपाचे ‘पानिपत’ करण्यास विरोधक सज्ज झाले आहेत. भाजपाने पुन्हा एकदा हरियाणा जिंकण्यासाठी ‘मिशन रिपीट’चा नारा लगाला आहे. मात्र, आठ दिवसांवर आलेल्या ‘जिंद’ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी आखलेले डावपेच, कुरघोडीचे राजकारण आणि प्रचार तोफांच्या फैरी पाहता यंदाची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपासाठी अवघड असल्याचेच चित्र सध्या आहे.भाजपाने स्थानिक पक्ष इंडियन नॅशनल लोक दल, हरियाणा जनहित काँग्रेस, तसेच काँग्रेस आणि बसपाला धूळ चारत लोकसभेच्या दहापैकी सात जागांवर विजय मिळविला. विधानसभा निवडणुकीतही ४७ जागा जिंकत सत्ता स्थापन केली.मात्र, गेल्या पाच वर्षांत चित्र पालटले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे संप, शेतकºयांचे आंदोलन, सराफ व्यापाºयांची नाराजी, जाट आरक्षणाचा प्रश्न थोपवताना झालेल्या हिंसेमुळे येथील सर्वसामान्य जनतेत भाजपाविषयी प्रचंड रोष आहे.नुकत्याच झालेल्या पाच महानगरपालिकांच्या निवडणुकांत भाजपाने वर्चस्व राखले आहे. त्यामुळे तीन राज्ये हातची गेल्यानंतर किमान हरियाणात तरी सत्ता राखण्याच्या भाजपाच्या आत्मविश्वासाला उभारी मिळाली आहे. तरी भाजपाला शिकस्त देण्यास विरोधकांनीही कंबर कसली आहे.हरियाणात यंदा आम आदमी पार्टी, जननायक जनता पार्टी, लोकतंत्र सुरक्षा पार्टी हे पक्षदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता अधिक आहे. या मतविभाजनाचा फायदा करून घेण्यासाठी स्थानिक पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत.काँग्रेसने रणजीत सिंह सुरजेवाला यांच्याकडे हरियाणाची अप्रत्यक्ष कमान सोपविली आहे. जिंद पोटनिवडणुकीसाठी दिग्गजांची नावे डावलून सुरजेवाला यांना दिलेली उमेदवारीही, याच रणनीतीचा एक भाग आहे. एकंदरीत हरियाणात भाजपाच्या गडाला सुरुंग लावण्यास विरोधकांनी तयारी केल्याचे दिसूनयेत आहे. मात्र, विरोधकांचे डाव हाणून पाडण्यासाठी भाजपा कोणते गनिमी कावे वापरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.>खट्टर यांची फौज मैदानातहरियाणातील पाच महानगरपालिका जिंकून भाजपाने ‘मिशन रिपीट’चा नारा लगावला आहे. विद्यमान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभा जिंकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार खट्टर यांनी शहर आणि ग्रामीण अशी विभागवार कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा