शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

राज्यातील भाजपा-मनसे युतीबाबत केंद्रीय नेतृत्वाची भूमिका आली समोर, युतीबाबत दिले असे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 11:16 IST

BJP-MNS alliance Update: काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे भाजपा आणि मनसे युती नक्की झाल्याचे बोलले जात होते. मात्र आता या युतीबाबत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका समोर आली आहे.

ठळक मुद्देभाजपाच्या राज्यातील आणि केंद्रीय नेत्यांच्या बैठकीमध्ये भाजपा मनसे युतीबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याची माहिती समोर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने बाळगले मौनभाजपा आणि मनसेच्या संभाव्य युतीला भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून सध्यातरी रेड सिग्नल मिळाला असल्याचे संकेत

नवी दिल्ली - राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे मोठा पक्ष बनूनही भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले आहे. एकीकडे अनेक मतभेद असूनही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारची राज्यातील सत्ता दिवसागणित अधिकाधिक भक्कम होत असल्याने राज्यातील भाजपाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्यातच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी मजबूत झाल्याने राज्यातील भाजपाच्या नेत्यांनीही युतीसाठी नव्या मित्रांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, पुढच्या काळाता महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. (BJP-MNS alliance) काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे भाजपा आणि मनसे युती नक्की झाल्याचे बोलले जात होते. मात्र आता या युतीबाबत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका समोर आली आहे. (The opinion expressed by the central leadership of BJP about the BJP-MNS alliance in Maharashtra)

दिल्लीत काल झालेल्या भाजपाच्या राज्यातील आणि केंद्रीय नेत्यांच्या बैठकीमध्ये भाजपा मनसे युतीबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. टीव्ही-९ मराठीने सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या बैठकीमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मौन बाळगले आहे.  त्यामुळे राज्यातील भाजपा आणि मनसेच्या संभाव्य युतीला भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून सध्यातरी रेड सिग्नल मिळाला असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याबरोबरच भाजपा आणि मनसे युती ही केंद्रीय नेतृत्वाला मान्य नसल्याचे तसेच ही भेट टाळता आली असती, अशीही भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका असल्याचे समोर येत आहे. 

तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचीही दिल्लीमध्ये भेट होऊ शकली नाही. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि बी. एल. संतोष यांची भेट घेतली. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांची भेट घेतली. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील भाजपाचे नेते केंद्रात तळ ठोकून असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि मनसे युतीचे बिगुल वाजेल अशी शक्यता वर्तवली जात होती. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाMNSमनसेchandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtraमहाराष्ट्र