शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

...तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती; अमित शहा यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 06:57 IST

मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता; शहांनी स्पष्टच सांगितलं

- महेश सरनाईकसिंधुदुर्ग : मी बंद खोलीत राजकारण कधी करत नाही. जे करतो ते जाहीरपणे करतो. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द मी दिला नव्हता, असे सांगतानाच आम्हीही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमचा पक्षही संपला असता, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे शिवसेनेवर केली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे (ता. कुडाळ) येथील लाइफटाइम मेडिकल काॅलेजचे उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.शहा पुढे म्हणाले, राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला दिलेला जनादेश ठोकरून महाविकास आघाडीचे तीनचाकी सरकार बनले आहे. सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आलेल्या तिघांच्या दिशा मात्र वेगवेगळ्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांंचे सिद्धांत शिवसेनेने सत्तेसाठी तापी नदीत विसर्जित केले आहेत. आम्ही वचनाला जागणारे आहोत. बिहारमध्ये नितीशकुमारांच्या जागा कमी निवडून आल्यानंतर देखील, आधी शब्द दिल्याप्रमाणे त्यांनाच मुख्यमंत्री केले, असेही शहा म्हणाले.निवडणुकीच्या काळात प्रत्येक सभेत शिवसेनेच्याही पोस्टरवर मोदींचा मोठा फोटो होता. तेव्हा आम्ही सगळे सांगत होतो, फडणवीस मुख्यमंत्री बनणार. तेव्हा का विरोध केला नाही, असा सवाल करून शहा म्हणाले, ३७० कलम मोदींनी हटवले, अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिर बनवत आहोत. याचे स्वागत करतानाही शिवसेनेचे नेते दबकत होते.गरिबांना पाच लाखांपर्यंत उपचाराचा खर्च देणारआपण आरोग्य सेवेवर सर्वाधिक भर देत आहोत. ७० वर्षांत मेडिकल कॉलेज बांधले. त्याच्या ५० टक्के केवळ सहा वर्षांत बांधले. २ एम्स होते... आज २२ बांधतो आहोत. मेडिकलच्या जागाही वाढविल्या आहेत. आरोग्य क्षेत्राची तरतूद १३७ टक्के वाढवली आहे. पंतप्रधान जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजनेत सामान्यांना, गरिबांना पाच लाखांपर्यंत उपचार खर्च केंद्र देणार असल्याची घोषणाही अमित शहा यांनी केली.भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना त्रास महाराष्ट्रात इतके मोठे वादळ आले, तेव्हा मुख्यमंत्र्यांना कोणी पाहिले का इथे... ? देवेंद्रजी फिरत होते. हे सरकार भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना त्रास देत आहे; पण आमचे कार्यकर्ते घाबरणार नाहीत, असा टोलाही शहा यांनी लगावला. ‘भारतीय उपचार पद्धती जगाने स्वीकारली’अमित शहा म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात भारताने कोरोनाशी केलेल्या लढाईचे सगळ्या जगभरात स्वागत होत आहे. याआधी आपल्याकडे व्हेंटिलेटर, मास्क, पीपीई कीट इथे बनत नव्हते. अवघ्या १० महिन्यांत आपण पहिल्या क्रमांकाचे निर्यातदार झालो आहोत. जगभरात कोरोना लस भारत पुरवत आहे. आपण तयार केलेल्या उपचार पद्धतीची दिशा आज जगात स्वीकारली गेली आहे, असेही शहा म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेRam Mandirराम मंदिर