शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"कितीही बंदी घाला, मुले जन्माला घालण्यापासून कुणी रोखू शकणार नाही,’’सपाच्या खासदाराने योगींना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 21:08 IST

UP Population Policy: उत्तर प्रदेशमध्ये नवे लोकसंख्या धोरण जाहीर झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरन २०२१-३० जाहीर केले आहे. अशाप्रकारे राज्यासाठी लोकसंख्या धोरण ठरवणारे उत्तर प्रदेश हे पहिले राज्य आहे. (UP Population Policy) दरम्यान, हे लोकसंख्या धोरण जाहीर झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क (Shafiqurrahman Burke) यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. कायदा बनवणं हे सरकारच्या हातात आहे. मात्र जेव्हा मुले जन्माला येतात तेव्हा त्याला कोण अडवू शकतो? असा सवाल शफीकुर्रहमान बर्क यांनी विचारला आहे. ("No matter how many bans are imposed, no one can stop children from being born," the SP MP Shafiqurrahman Burke told Yogi Adityanath)

आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या औचित्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण २०२१-३० जाहीर केले. तसेच यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वाढत्या लोकसंख्येच्या समस्येबाबत स्वत: तसेच समाजाला जागरुक करण्याचे आवाहन केले. दरम्यान समाजवादी पक्षाचे संभलमधील खासदार डॉ. शफीकुर्रहमान बर्क यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या या धोरणावर टीका केली आहे. कायदा बनवणे हे तुच्या हातात आहे पण जेव्हा मुल जन्माला येईल, तेव्हा त्याला कोण अडवू शकतो, असे बर्क म्हणाले.

यावेळी बर्क यांनी मुलांच्या प्रश्नावरून योगी, मोदी आणि मोहन भागवत यांच्यावरही निशाणा साधला. जिथपर्यंत योगी, मोदी आणि मोहन भागवत यांच्या प्रश्न आहे, तर यांना मुलंच नाही आहेत. त्यांनी लग्नच केलेलं नाही. आता सांगा संपूर्ण देशालाच मुलं जन्माला घालू देणार नसाल तर उद्या कुठल्या अन्य देशाचा सामना करण्यासाठी गरज पडल्यावर लोक कुठून आणणार, असा सवालही शफीकुर्रहमान बर्क यांनी विचारला.

इस्लाम आणि कुराण शरीफमध्ये सांगितले आहे की, हे जग अल्लाहने बनवलं आहे. तसेच जेवढे आत्मे अल्लाहने तयार केले आहेत. ते पृथ्वीवर येणार आहेत. मग कितीही बंदी घाला. कुठलीही कमिशन बनवा. मात्र मुले जन्माला घालण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, संपूर्ण जगामध्ये लोकसंख्येच्या विषयावर वेळोवेळी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र वाढती लोकसंख्या विकासामध्ये अडचण निर्माण करू शकते. या विषयावर गेल्या चार दशकांपासून चर्चा सुरू आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश राज्य विधी आयोग उत्तर प्रदेश राज्याच्या लोकसंख्येच्या नियंत्रण, स्थिरीकरण आणि कल्याणाबाबत काम करत आहे. तसेच त्यांनी एका विधेयकाचे प्रारूप तयार केले आहे. 

विधी आयोगाने या विधेयकाचे प्रारूप आपल्या संकेतस्थळावर अपलोड केले आहे. तसेच १९ जुलैपर्यंत जनतेकडून याबाबत मत मागवले आहे. या विधेयकाच्या प्रारूपानुसार यामध्ये दोनपेक्षा अधिक मुले झाल्यास सरकारी नोकरीपासून ते स्थानिक निवडणुका लढवण्यावर बंदी घालण्यापर्यंतच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. तसेच सरकारी योजनांचा लाभ न देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथSamajwadi Partyसमाजवादी पार्टी