शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Opinion Poll: राज्यात सेना-भाजपाला फटका बसणार; 'इतक्या' जागा घटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 20:31 IST

आता टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं सर्व्हे केला आहे. त्यात सेना-भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे.

नवी दिल्लीः देशात जोरदार प्रचाराचा धुरळा उडाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच आता टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं सर्व्हे केला आहे. त्यात सेना-भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे. मागच्या वेळच्या तुलनेत एनडीएच्या 4 जागा कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपा युतीला 38 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, काँग्रेस आघाडीला 10 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2014ला एनडीएला महाराष्ट्रात 42 जागा मिळाल्या होत्या, यूपीएला अवघ्या 6 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.गेल्या वेळच्या तुलनेत यंदा सेना-भाजपाच्या चार जागा घटण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 2014मध्ये सेना-भाजपाला 51.3 टक्के मतं मिळाली होती. तर काँग्रेस आघाडीच्या खात्यात 34.1 टक्के मतं जमा झाली होती. तर यंदा सेना-भाजपाच्या मतांच्या टक्केवारी घट होणार असून, त्यांना 48.15 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस आघाडीला 36. 88 टक्के मतं मिळणार आहेत, असं या सर्व्हेतून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर एबीपी-सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेतही सेना-भाजपाच्या जागा घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यातील 48 पैकी 35 जागांवर युती विजयी होईल, अशी शक्यता या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आली आहे. एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, यंदा राज्यात भाजपा-शिवसेना युतीला एकूण 35 जागांवर यश मिळू शकतं.यंदा भाजपा 25 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यातील 21 जागांवर त्यांना यश मिळेल, असा अंदाज आहे. मात्र गेली साडेचार वर्षे सरकारवर टीकेचे बाण सोडणाऱ्या शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. 23 जागा लढवणाऱ्या शिवसेनेला 14 जागांवर यश मिळू शकतं. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे 18 उमेदवार विजयी झाले होते. मात्र यंदा त्यांना 4 जागांवर फटका बसू शकतो. तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची केवळ एक जागा कमी होईल, असा अंदाज आहे. 2014 मध्ये युतीनं राज्यात 42 (भाजपा-22, शिवसेना-18, स्वाभिमानी-1) जागा जिंकल्या होत्या. त्यात यंदा सात जागांची घट होऊ शकते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस