शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: “केंद्राला आरक्षण द्यायचे नसेल तर...”; नवाब मलिकांनी सूचवला महत्त्वाचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 13:44 IST

Maratha Reservation: ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि मराठा आरक्षण या दोन मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसतेय.

मुंबई: ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि मराठा आरक्षण या दोन मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसतेय. यावरून पुन्हा एका आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, केंद्राला आरक्षण द्यायचे नसेल, तर घटना दुरुस्ती करावी लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. (nawab malik says constitutional amendment is the last option for maratha reservation)

मराठा आरक्षणप्रकरणी दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना नवाब मलिक म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. आम्ही आधीपासूनच सांगत आहोत की, अनुच्छेद १०२ मधील घटना दुरुस्ती झाल्यानंतर सर्व अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. मराठा आरक्षण असेल किंवा एसबीसी कॅटेगरीतील आरक्षण असेल हे देण्याचा अधिकार राज्यांना राहिलेला नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 

देशाची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स शक्य! नितीन गडकरींनी सूचवला भन्नाट उपाय

केंद्राला आरक्षण द्यायचे नसेल तर...

केंद्राने घटना दुरुस्ती करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम करावे. केंद्राला आरक्षण द्यायचे नसेल तर घटना दुरुस्ती करून राज्यांना अधिकार द्यावेत. राज्य सरकार मराठा आरक्षण व इतर आरक्षण निश्चित रुपाने देईल, असे मलिक यांनी सांगितले. घटना दुरुस्ती करून राज्यांना अधिकार दिले, तर राज्य सरकार मराठा आरक्षण व इतर आरक्षण असतील, त्याबाबतीत निर्णय घेऊ शकते. परंतु घटना दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

“नव्या पिढीला आता भीती वाटतेय, तातडीने लक्ष घाला”; पवारांची पडळकरांविरोधात मोदींकडे तक्रार

दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ED) अजित पवारांवर केलेल्या कारवाईबाबत बोलताना मलिक यांनी सांगितले की, आमच्या नेत्यांना आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व परिवाराच्या बाबतीत ज्या पद्धतीने बातम्या पेरण्यात येत आहेत ते चुकीचे आहे, असा आरोप मलिक यांनी भाजपवर केला आहे.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणnawab malikनवाब मलिकCentral Governmentकेंद्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण