शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

Maratha Reservation: “केंद्राला आरक्षण द्यायचे नसेल तर...”; नवाब मलिकांनी सूचवला महत्त्वाचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 13:44 IST

Maratha Reservation: ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि मराठा आरक्षण या दोन मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसतेय.

मुंबई: ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि मराठा आरक्षण या दोन मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसतेय. यावरून पुन्हा एका आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, केंद्राला आरक्षण द्यायचे नसेल, तर घटना दुरुस्ती करावी लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. (nawab malik says constitutional amendment is the last option for maratha reservation)

मराठा आरक्षणप्रकरणी दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना नवाब मलिक म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. आम्ही आधीपासूनच सांगत आहोत की, अनुच्छेद १०२ मधील घटना दुरुस्ती झाल्यानंतर सर्व अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. मराठा आरक्षण असेल किंवा एसबीसी कॅटेगरीतील आरक्षण असेल हे देण्याचा अधिकार राज्यांना राहिलेला नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 

देशाची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स शक्य! नितीन गडकरींनी सूचवला भन्नाट उपाय

केंद्राला आरक्षण द्यायचे नसेल तर...

केंद्राने घटना दुरुस्ती करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम करावे. केंद्राला आरक्षण द्यायचे नसेल तर घटना दुरुस्ती करून राज्यांना अधिकार द्यावेत. राज्य सरकार मराठा आरक्षण व इतर आरक्षण निश्चित रुपाने देईल, असे मलिक यांनी सांगितले. घटना दुरुस्ती करून राज्यांना अधिकार दिले, तर राज्य सरकार मराठा आरक्षण व इतर आरक्षण असतील, त्याबाबतीत निर्णय घेऊ शकते. परंतु घटना दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

“नव्या पिढीला आता भीती वाटतेय, तातडीने लक्ष घाला”; पवारांची पडळकरांविरोधात मोदींकडे तक्रार

दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ED) अजित पवारांवर केलेल्या कारवाईबाबत बोलताना मलिक यांनी सांगितले की, आमच्या नेत्यांना आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व परिवाराच्या बाबतीत ज्या पद्धतीने बातम्या पेरण्यात येत आहेत ते चुकीचे आहे, असा आरोप मलिक यांनी भाजपवर केला आहे.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणnawab malikनवाब मलिकCentral Governmentकेंद्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण