शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

“बाळासाहेबांबद्दल राज ठाकरेंना किती आदर आहे हे समोर आलं, खेदजनक अन् वाईट वाटतं”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 17:45 IST

Shivsena Target MNS Raj Thackeray over Navi Mumbai Airport Name Issue: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणात भाष्य करत पत्रकार परिषद घेतली. मात्र मनसेच्या भूमिकेवरून शिवसेनेने जोरदार पलटवार केला आहे.

ठळक मुद्देसांताक्रुझ विमानतळाचं विस्तारीकरणाचा नवी मुंबई विमानतळ एक भाग असल्याचं राज ठाकरे म्हणाले होतेराज ठाकरेंच्या या तर्कावर शिवसेनेचा पलटवार, नवी मुंबई विमानतळ हे नवीन असल्याचा दावानवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाव देण्याचा जीआर निघाला आहे.

मुंबई – नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद पेटला आहे. या विमानतळाला शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावं अशी मागणी केली आहे तर स्थानिक भूमिपुत्रांनी आणि संघटनांनी ज्येष्ठ नेते दि. बा पाटील यांचे नाव द्यावं अशी मागणी केली आहे. या नामकरणाच्या वादावरून नवी मुंबईत संघर्ष पेटला असताना यात मनसेनं उडी घेतली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणात भाष्य करत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव असेल असं तर्क सांगितला. सांताक्रुझ विमानतळाचं विस्तारीकरणाचा नवी मुंबई विमानतळ एक भाग असल्याचं ते म्हणाले. परंतु राज ठाकरेंच्या या तर्कावर शिवसेनेने पलटवार केला आहे. नवी मुंबई विमानतळ हे नवीन असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. राज ठाकरेंचा केवळ तर्क आहे. नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाव देण्याचा जीआर निघाला आहे. बाळासाहेबांबद्दल राज ठाकरेंना किती आदर आहे हे समोर आलं. यामुळे खेदजनक आणि वाईट वाटतं असा टोला प्रवक्ते अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

त्याचसोबत ज्येष्ठे नेते दि. बा पाटील यांनी चांगलं काम केले यात वाद नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाची उंची संपूर्ण राज्यानं पाहिली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर राजकारण करू नये. या विमानतळाच्या नामकरणावर राजकारण बाजूला ठेवा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे. स्वत: बाळासाहेब ठाकरे हयात असते तर नाव देण्याचा प्रश्नच नसता असा पलटवारही अरविंद सांवत यांनी राज ठाकरेंवर केला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

'मुंबईत विमानतळाला असलेली जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे नवी मुंबईत विमानतळ उभारलं जात आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला आणि देशांतर्गत विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे नवी मुंबईतील विमानतळालादेखील शिवरायांचंच नाव दिलं जावं,' असं राज ठाकरे म्हणाले. 'बाळासाहेब ठाकरे आदरणीय आहेतच. दिवंगत दि. बा. पाटील ज्येष्ठ नेते होते. पण नवी मुंबईतील विमानतळ हे मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचाच भाग आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मुंबईत जागा नसल्यानं नवी मुंबईत विमानतळ उभारलं जात आहे. त्या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय कोडदेखील मुंबई विमानतळाप्रमाणेच BOM असा असणार आहे. त्यामुळे त्या विमानतळाला छत्रपती शिवरायांचं नाव देण्यात यावं,अशा शब्दांत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

'महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. परदेशातून येणारा माणूस हा शिवरायांच्या भूमिकेत येत असतो. त्यामुळे विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव संयुक्तिक असेल. आज बाळासाहेब असते, तर त्यांनी स्वत:देखील शिवरायांचंच नाव विमानतळाला देण्याचा सल्ला दिला असता. विमानतळाला शिवरायांचं नाव दिलं जाणार असेल तर कोणाचाही त्याला विरोध नाही. स्थानिकदेखील त्याला विरोध करणार नाहीत, असं प्रशांत ठाकूर यांनी मला सांगितलं आहे,' असं राज म्हणाले.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेArvind Sawantअरविंद सावंतBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेAirportविमानतळ