शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

“बाळासाहेबांबद्दल राज ठाकरेंना किती आदर आहे हे समोर आलं, खेदजनक अन् वाईट वाटतं”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 17:45 IST

Shivsena Target MNS Raj Thackeray over Navi Mumbai Airport Name Issue: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणात भाष्य करत पत्रकार परिषद घेतली. मात्र मनसेच्या भूमिकेवरून शिवसेनेने जोरदार पलटवार केला आहे.

ठळक मुद्देसांताक्रुझ विमानतळाचं विस्तारीकरणाचा नवी मुंबई विमानतळ एक भाग असल्याचं राज ठाकरे म्हणाले होतेराज ठाकरेंच्या या तर्कावर शिवसेनेचा पलटवार, नवी मुंबई विमानतळ हे नवीन असल्याचा दावानवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाव देण्याचा जीआर निघाला आहे.

मुंबई – नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद पेटला आहे. या विमानतळाला शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावं अशी मागणी केली आहे तर स्थानिक भूमिपुत्रांनी आणि संघटनांनी ज्येष्ठ नेते दि. बा पाटील यांचे नाव द्यावं अशी मागणी केली आहे. या नामकरणाच्या वादावरून नवी मुंबईत संघर्ष पेटला असताना यात मनसेनं उडी घेतली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणात भाष्य करत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव असेल असं तर्क सांगितला. सांताक्रुझ विमानतळाचं विस्तारीकरणाचा नवी मुंबई विमानतळ एक भाग असल्याचं ते म्हणाले. परंतु राज ठाकरेंच्या या तर्कावर शिवसेनेने पलटवार केला आहे. नवी मुंबई विमानतळ हे नवीन असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. राज ठाकरेंचा केवळ तर्क आहे. नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाव देण्याचा जीआर निघाला आहे. बाळासाहेबांबद्दल राज ठाकरेंना किती आदर आहे हे समोर आलं. यामुळे खेदजनक आणि वाईट वाटतं असा टोला प्रवक्ते अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

त्याचसोबत ज्येष्ठे नेते दि. बा पाटील यांनी चांगलं काम केले यात वाद नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाची उंची संपूर्ण राज्यानं पाहिली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर राजकारण करू नये. या विमानतळाच्या नामकरणावर राजकारण बाजूला ठेवा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे. स्वत: बाळासाहेब ठाकरे हयात असते तर नाव देण्याचा प्रश्नच नसता असा पलटवारही अरविंद सांवत यांनी राज ठाकरेंवर केला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

'मुंबईत विमानतळाला असलेली जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे नवी मुंबईत विमानतळ उभारलं जात आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला आणि देशांतर्गत विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे नवी मुंबईतील विमानतळालादेखील शिवरायांचंच नाव दिलं जावं,' असं राज ठाकरे म्हणाले. 'बाळासाहेब ठाकरे आदरणीय आहेतच. दिवंगत दि. बा. पाटील ज्येष्ठ नेते होते. पण नवी मुंबईतील विमानतळ हे मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचाच भाग आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मुंबईत जागा नसल्यानं नवी मुंबईत विमानतळ उभारलं जात आहे. त्या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय कोडदेखील मुंबई विमानतळाप्रमाणेच BOM असा असणार आहे. त्यामुळे त्या विमानतळाला छत्रपती शिवरायांचं नाव देण्यात यावं,अशा शब्दांत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

'महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. परदेशातून येणारा माणूस हा शिवरायांच्या भूमिकेत येत असतो. त्यामुळे विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव संयुक्तिक असेल. आज बाळासाहेब असते, तर त्यांनी स्वत:देखील शिवरायांचंच नाव विमानतळाला देण्याचा सल्ला दिला असता. विमानतळाला शिवरायांचं नाव दिलं जाणार असेल तर कोणाचाही त्याला विरोध नाही. स्थानिकदेखील त्याला विरोध करणार नाहीत, असं प्रशांत ठाकूर यांनी मला सांगितलं आहे,' असं राज म्हणाले.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेArvind Sawantअरविंद सावंतBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेAirportविमानतळ