शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

विकासासोबत राष्ट्रीय सुरक्षेची निवडणूक- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 5:45 AM

देशासाठी मतदान करण्याचे आवाहन; मोदींनी लष्कराला निर्णय स्वातंत्र्य दिल्याचा दावा

मुंबई : देशाला अंतर्गत खिळखिळे करण्याचा प्रयत्न शेजारील देशाकडून होत असताना त्यांना भारतीय सेनेची ताकद काय असते, याची जाणीव नरेंद्र मोदींनी करून दिली आहे. उरी व पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला मोदींनी धडा शिकवला आहे. असे असताना काँग्रेस मात्र जाहीरनाम्यामध्ये देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन देत आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक केवळ विकासाची नसून, विकासासोबत राष्ट्रीय सुरक्षिततेची आहे. त्यामुळे मुंबईकरांनी देशासाठी मतदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.उत्तर मध्य मतदारसंघातील भाजप उमेदवार पूनम महाजन यांच्या प्रचारार्थ कुर्ला येथील शिवाजी मैदानामध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात काँग्रेसवर व राहुल गांधींवर सडकून टीका केली. २००८चा दहशतवादी हल्ला असो की पाकची इतर आगळीक, तत्कालीन पंतप्रधान कणखर नसल्याने योग्य प्रत्युत्तर देण्यात आले नाही. मोदींनी मात्र लष्कराला निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले व पाकिस्तानला चांगला धडा शिकवला. मुंबईत सध्या प्रति माणसी सव्वा लाख रुपये विविध प्रकल्प उभारणीवर खर्च होत आहेत. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी त्याच्या पाव पटदेखील खर्च केला नाही. मुंबईत सुरू असलेले प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना धक्के खावे लागणार नाहीत. मुंबईचे चित्र बदलण्याचे काम आपल्या सरकारने केल्याचा दावा त्यांनी केला.मुंबईत एकात्मिक तिकीट प्रणाली राबविण्यात येणार असून मेट्रो, रेल्वे, मोनो, बस व जलप्रवास एकाच तिकिटावर करता येईल असा प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. विमानतळ परिसरातील झोपडीधारकांना आचारसंहितेनंतर व पावसाळ्यापूर्वी नवीन घराच्या चाव्या देण्याची ग्वाही देतानाच मुख्यमंत्र्यांनी महाजन यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार विनायक राऊत, लीलाधर डाके, आमदार आशिष शेलार, मंगेश कुडाळकर, पराग आळवणी, संजय पोतनीस, आर. एन. सिंह, सुधाकर देशमुख, तृप्ती सावंत, अविनाश महातेकर उपस्थित होते.‘काँग्रेसचा जाहीरनामा, उधारीचा मामला’काँग्रेसला पराभवाची खात्री वाटत असल्याने ते काहीही आश्वासन देत आहेत. राहुल गांधींच्या पणजोबा, आजी, वडील व आईला सत्तेची संधी दिली; मात्र जनतेची गरिबी हटली नाही. केवळ त्यांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची गरिबी हटल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेस नेत्यांना झोपेतदेखील मोदी दिसतात. त्यांचे जाहीरनामे, भाषणे सर्व उधारीचा मामला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.‘वडिलांच्या नावाची ढाल नव्हे, तर विकासकामांची तलवार’पूनम महाजन म्हणाल्या, वडिलांच्या नावाची ढाल नव्हे, तर मी विकासकामांची तलवार घेऊन लढाई लढत आहे. माजी खासदाराचा १० वर्षांतील विकासाचा अनुशेष भरून काढल्याचा दावा महाजन यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक