शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

जाती-धर्माच्या नावावर देश तोडण्याचा नरेंद्र मोदी-अमित शहा यांचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 04:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे जनतेचे मोठे शत्रू आहेत. त्या दोघांनाही देशाचे तुकडे करायचे आहेत

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे जनतेचे मोठे शत्रू आहेत. त्या दोघांनाही देशाचे तुकडे करायचे आहेत असा गंभीर आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी केला आहे.येथे एका प्रचारसभेत ते म्हणाले की, जात, धर्म, वंश यांच्या आधारे देशामध्ये फूट पाडण्याचे काम मोदी व शहा करत आहेत. मात्र भाजपच्या चालींना बळी पडायचे नाही असे जनतेने ठामपणे ठरविले आहे. भावनात्मक मुद्दे उपस्थित करून लोकांचे लक्ष मुख्य प्रश्नांपासून दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. सर्वांना समान अधिकार व संधी देणाऱ्या राज्यघटनेचे स्वरूपच भाजपला बदलायचे आहे. कोणत्याही धर्माचा, श्रद्धांचा अंगिकार करण्याचे स्वातंत्र्य देणाºया याच राज्यघटनेने ३५ अ, ३७० कलमांन्वये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा दिला आहे. या तरतुदीला भाजपने नेहमीच विरोध केला आहे.जम्मू-काश्मीरला मिळालेला विशेष दर्जा खिळखिळा करण्यासाठी भाजप आपल्या हस्तकांचा वापर करत आहे, असा आरोप अब्दुल्ला यांनी केला. त्यांचा रोख पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, पीपल्स कॉन्फरन्स या पक्षांकडे होता. ते म्हणाले की, काश्मीरमध्ये बिगरकाश्मिरींना जमिनी, मालमत्ता विकत घेता यायला हव्यात यासारखे बिनमहत्त्वाचे प्रश्न भाजप मुद्दामहून उकरून काढत आहे. आमचे हक्क आम्ही कोणालाही छिनावून देणार नाही. भारत यापुढे धर्मनिरपेक्ष राहील वा नाही हे आगामी लोकसभा निवडणुकांनंतर ठरेल. मतदारांकडून यावेळी गफलत घडल्यास त्याचे गंभीर परिणाम भावी पिढ्यांना भोगावे लागतील. (वृत्तसंस्था)>‘हा तर आगीशी खेळ’फारुक अब्दुल्ला म्हणाले की,जम्मू-काश्मीरला मिळालेला विशेष दर्जा व अधिकार हे भाजपच्या डोळ््यांत सलत असल्याचे त्यांच्या जाहीरनाम्यावरून स्पष्ट झाले आहे. ३५अ, ३७० कलम रद्द करण्याचे आश्वासन या पक्षाने जाहिरनाम्यात दिले आहे. जम्मू-काश्मीरच्या लोकसंख्येचे सध्याचे स्वरुप त्यांना बदलायचे आहे. ही भूमिका घेऊन भाजप आगीशी खेळत आहे.>युवकांच्या चेहºयावरील दु:खाचा विचार करामोदी सरकारवर टीका करताना प्रियांका गांधी म्हणाल्या, की या सरकारचा प्रचार पाहिला तर असे वाटते, की या पाच वर्षांतच देशात साºया सुधारणा झाल्या. पण वस्तुस्थिती तशी नाही. उत्तर प्रदेशात दोन महिन्यांच्या प्रचारदौºयात अनेक युवकांच्या चेहºयावर बेकार असल्याचे दु:ख पाहायला मिळाले आहे. कर्जात बुडालेले शेतकरी दिसत आहेत. मोदी सरकार श्रीमंत उद्योगपतींना कोट्यवधी रुपये देत असेल तर आम्ही गरीबांना ७२,000 रुपये का नाही देऊ शकत? आम्ही आरोग्य, शिक्षणासहित सर्वच क्षेत्रात काम करूइच्छित आहोत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा