शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका, महाविकास आघाडीची नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण

By प्रविण मरगळे | Updated: December 17, 2020 12:56 IST

दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार या कायद्यात काही बदल करेल असा अंदाज आहे, त्यात शेतकरी हित असेल का? हे पाहू असंही अजित पवारांनी सांगितले.

ठळक मुद्देलवकरच केंद्रीय पथक अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात येत आहे,केंद्राकडून महाराष्ट्राला मदत होईल अशी अपेक्षा आहे, परंतु किती मदत होऊ शकते हे आत्ताचं सांगणे उचित होणार नाहीया बैठकीत प्राथमिक स्वरुपात चर्चा होईल, काही जणांचे म्हणणं आहे संपूर्ण विधेयक रद्द करा

मुंबई – कृषी कायद्याच्या संदर्भात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे, मात्र एका बैठकीतून हा प्रश्न सुटणार नाही, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे, कृषी कायद्याबाबत होणाऱ्या बैठकीपूर्वी अजितदादांनी माध्यमांशी संवाद साधला आहे, त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, देशात शेतकरी आंदोलन करत आहे, सुप्रीम कोर्टानेही केंद्राला चर्चा करण्याचं सांगितलं आहे, आमची भूमिका मान्य करा अशी आग्रही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे, दिल्लीत हे आंदोलन चिघळलं आहे, त्यामुळे कृषी विधेयकाबाबत काही प्रमाणात बदल करण्याचे निर्णय घेतले जातील, पण बिल संपूर्ण रद्द करावं ही शेतकऱ्यांची भूमिका आहे, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे, आज त्याचबाबत महत्त्वाची बैठक होत आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच या बैठकीत प्राथमिक स्वरुपात चर्चा होईल, काही जणांचे म्हणणं आहे संपूर्ण विधेयक रद्द करा, परंतु सगळ्यांशी चर्चा करू, मात्र एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले, त्याचसोबत दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार या कायद्यात काही बदल करेल असा अंदाज आहे, त्यात शेतकरी हित असेल का? हे पाहू असंही अजित पवारांनी सांगितले.

दरम्यान, यंदा ३१० लाख टन साखर तयार होईल, तेवढी साखर परदेशात निर्यात केली जाईल, पण साखरेचा दर ३१ रुपयांवरून वाढवावा त्यामुळे ५ लाख शेतकऱ्यांना फायदा होईल असं अजितदादांनी सांगितले, तसेच लवकरच केंद्रीय पथक अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात येत आहे, यात केंद्राकडून महाराष्ट्राला मदत होईल अशी अपेक्षा आहे, परंतु किती मदत होऊ शकते हे आत्ताचं सांगणे उचित होणार नाही असं अजित पवार म्हणाले, तर मेट्रो कारशेडबाबत संध्याकाळी ५ वाजता बैठक होईल अशी माहिती अजितदादांनी दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरी