शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका, महाविकास आघाडीची नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण

By प्रविण मरगळे | Updated: December 17, 2020 12:56 IST

दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार या कायद्यात काही बदल करेल असा अंदाज आहे, त्यात शेतकरी हित असेल का? हे पाहू असंही अजित पवारांनी सांगितले.

ठळक मुद्देलवकरच केंद्रीय पथक अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात येत आहे,केंद्राकडून महाराष्ट्राला मदत होईल अशी अपेक्षा आहे, परंतु किती मदत होऊ शकते हे आत्ताचं सांगणे उचित होणार नाहीया बैठकीत प्राथमिक स्वरुपात चर्चा होईल, काही जणांचे म्हणणं आहे संपूर्ण विधेयक रद्द करा

मुंबई – कृषी कायद्याच्या संदर्भात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे, मात्र एका बैठकीतून हा प्रश्न सुटणार नाही, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे, कृषी कायद्याबाबत होणाऱ्या बैठकीपूर्वी अजितदादांनी माध्यमांशी संवाद साधला आहे, त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, देशात शेतकरी आंदोलन करत आहे, सुप्रीम कोर्टानेही केंद्राला चर्चा करण्याचं सांगितलं आहे, आमची भूमिका मान्य करा अशी आग्रही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे, दिल्लीत हे आंदोलन चिघळलं आहे, त्यामुळे कृषी विधेयकाबाबत काही प्रमाणात बदल करण्याचे निर्णय घेतले जातील, पण बिल संपूर्ण रद्द करावं ही शेतकऱ्यांची भूमिका आहे, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे, आज त्याचबाबत महत्त्वाची बैठक होत आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच या बैठकीत प्राथमिक स्वरुपात चर्चा होईल, काही जणांचे म्हणणं आहे संपूर्ण विधेयक रद्द करा, परंतु सगळ्यांशी चर्चा करू, मात्र एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले, त्याचसोबत दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार या कायद्यात काही बदल करेल असा अंदाज आहे, त्यात शेतकरी हित असेल का? हे पाहू असंही अजित पवारांनी सांगितले.

दरम्यान, यंदा ३१० लाख टन साखर तयार होईल, तेवढी साखर परदेशात निर्यात केली जाईल, पण साखरेचा दर ३१ रुपयांवरून वाढवावा त्यामुळे ५ लाख शेतकऱ्यांना फायदा होईल असं अजितदादांनी सांगितले, तसेच लवकरच केंद्रीय पथक अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात येत आहे, यात केंद्राकडून महाराष्ट्राला मदत होईल अशी अपेक्षा आहे, परंतु किती मदत होऊ शकते हे आत्ताचं सांगणे उचित होणार नाही असं अजित पवार म्हणाले, तर मेट्रो कारशेडबाबत संध्याकाळी ५ वाजता बैठक होईल अशी माहिती अजितदादांनी दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरी